Monday, December 27, 2021

 

इम्पॉर्टंट -Important

 

इम्पॉर्रटंट ! 
कित्येक वर्षांपूर्वी आम्ही इटलीतील फ्लोरेन्स हे अतिशय सुंदर नि रम्य शहर व्यवस्थित पाहण्या साठी एक ‘पॉला’ नामक इतालियन गाईडची मदत घेतली होती. मात्र तिचे इंग्रजी उच्चार विलक्षण (नि मोहक ! ) होते. ‘र’ या शब्दाचा वापर ती ‘र्र’ असा वारंवार करत असे, जसे कर्रारा मार्बल किंवा व्हेर्री व्ह्रेर्री इम्पॉर्रंटंट . तुरूतुरू चालत एका हातात उंच धरलेले कागदी भेंडोळे मिरवित ती सर्व चमूला आपल्या मागे जणूं धावत नेई. तिला सहज प्रश्न केला की इथली सर्व शिल्पें नि कलाकृती नग्नावस्थेंत का दाखवली आहेत. दोन मुलें असलेल्या तिने त्याचे उत्तर अतिशय ‘आध्यात्मिक’ दिले. ती म्हणली की ते शिल्पकार किंवा चित्रकार आपली कला जोपासतांना स्त्री-पुरूष असा भेद न करता जणू कालातीत होत त्यांना परमेश्वरा इतकी विशाल दृष्टी लाभत असते ! (ते विश्लेषण ऐकून सर्वजण गुडिगुप्प ! ) असो. 

खरेतर आपण सर्वजण बालपणापासून ‘इंपार्टंट’ हा शब्द ‘आय एम् पी’ असा थोडक्यात वापरत आले आहोंत. पुस्तकांत किंवा वहीवर ठिकठिकाणी आपण Imp. असे लिहून ठेवले असेल. सर्कारी फाईल्स सुध्दा ‘महत्वाचे’ असे दर्शवण्यासाठी हिरव्या किंवा लाल टॅग्ज लावलेल्या आपण पाहिल्या आहेत. त्यांतही ‘अति महत्वाचे’ किंवा ‘टॉप प्रायॉरिटी’ अशाही चकत्या चिकटवलेल्या आपल्याला माहीत आहेत. 

आतां, महत्वाचे किंवा इम्पॉर्टंट कशाला म्हणावे, त्यांतही अति महत्वाचे काय असावे याचा खोलात विचार करण्याचे मज रिकामटेकड्याला वाटणे निव्वळ साहाजिक नव्हे काय ! मात्र मी लिहीत असलेले वाचणे तुम्हाला अजिबात महत्वाचे नाही हे माहीत असूनही मी असाच लिहिणार आहे ! 

खरेतर ‘महत्वाचे’ याचे निकष स्थळकालानुरूप बदलणारे असतात. काल परवां महत्वाचे असलेले आजमितीस इम्पार्टंट असेलच असे नाही. किंबहुना एकाला महत्वाचे वाटणारे इतरांना तसे वाटेलच अशी सुतराम शक्यता नसते. म्हणजेच स्थलकाल, व्यक्तिविशेष किंवा प्रसंगोपात्त महत्व कमीजास्त होऊ शकते तर. 
विद्यार्थी दशेंत, गृहस्थाश्रमांत, सेवानिवृत्ति नंतर आणि आतांशा माझ्या स्वत:च्या प्रायोरिटीज् बदलत गेल्या आहेत हे आता मागे वळून पाहतांना प्रकर्षांने जाणवते आहे. आज माझी प्राथमिकता ईश्वर प्राप्तीची आहे काय ? मुळी सुध्दा नाही ! कारण मला आता कळले आहे की ईश्वराला ‘प्राप्त करणे’ अशी प्राथमिकता मला झेपणारी नाही. मला आत्तां केवळ निरामय, शान्त जीवन जगायचे आहे. ‘न घडो कुणाचा मत्सर, न घडो कुणाचे अहित, न होवो कुणाचा अपमान, कुणीही दुखावले जाऊ नये एवढीच माझी आता प्रायोरिटी आहे (असे मला वाटते ! ) 
सरते शेवटीं - “सर्वे भवन्तु सुखिन: / सर्वे सन्तु निरामय: / सर्वे भद्राणि पश्यन्तु / मा कश्चिद् दु:खभाग्भवेत् //“ हीच प्रार्थना महत्वाची ! ! 

रहाळकर
२७ डिसेंबर २०२१ 



Friday, December 24, 2021

 

Rewinding !

 “Rewinding” ! 

I was just toying with the word ‘rewind’ and was suddenly inspired to ‘rewind’ myself ! What if I go back to my entire life-span and discover some fascinating incidences where I could have corrected my actions for the better. 

At the outset let me admit that I was certainly very fortunate having been born in a noble household,  excellent parents and lovely siblings. However, I was too lazy all my life. I could have achieved much more if only I could cast off that trait in me. (It’s no use lamenting and saying I am no more lazy now ! ) 
My teachers  often remarked that I was brilliant enough but lacked zeal for hard work ! Well, that has been my greatest drawback no doubt. 

Then came a period when I could not overcome ‘stage fear’. I was too meek and shy to speak in public. In fact I could never win an argument even in a small gathering just because of shyness even when I had plenty of armour with me ! And that trait projected me as an ordinary, sub-normal individual (which I was not ! ) .  Inability to express myself properly was certainly unpleasant for me. 

Immediately after graduating from the medical college I should have opted for the Armed Services, which was definitely my dream, or at least pursue post-graduation right away. I did neither and thought of it quite later when my ‘brilliance’ was waxing and waning ! 
I could have at least excelled in general practice, but my inherent meekness could not master that art either ! 

I have had excellent friends and acquaintances having exceptional qualities but am afraid to say whether they also  had similar notions about me ! 

I dreamt of being a true scholar and erudite . Alas, I do not find myself even at the fringe ! 

No, I shall not enumerate my failures alone. I have achieved quite a lot during this life span. A lovely caring and prodding wife and equally wonderful children and grand children are the best asset I possess. And touch wood, am able to live a healthy comfortable life so far. 

Perhaps that’s the reason I can rewind myself at will. It’s like the legendary tortoise, which is mentioned so often in Dnyaneshwari ! 




Best wishes, 
Dr. Rahalkar
24 December 2021
 



Saturday, December 11, 2021

 

शुचीनां श्रीमतां गेहे………!

 Friends,

I woke up this morning from deep slumber reciting a particular stanza from the Bhagawat Geeta (chapter six, stanza no. 41 to be precise ) 
I vividly remember listening to at least a dozen discourses by a famous Saint, who had elaborated its meanings in depth. I am aware of my inadequacy to explain the same in simple words ; however, let me make an effort once again ! 

The actual stanza is like this - 
“प्राप्य पुण्यकृतां लोकान् , उषित्वा शाश्वती: समा:      ।
  शुचीनां श्रीमतां गेहे , योगभ्रष्टोsभिजायते              ॥६/४१॥ 

The Lord said - 
Look at the wonder Arjuna, even Indra the King of Gods has to strive to attain that state while performing hundreds of Yajnyas , whereas a ‘Mumukshu’ ,that is one who craves to attain Salvation 
by breaking shackles of ‘duality’, can achieve it easily.
You see, after enjoying entire infallible enjoyments the being becomes weary of those, he takes birth again in a wealthy, cultured and well-bred ancestry. Just as grains of rice germinate in fertile and well prepared soil, he blossoms in that new home. 

Parth, such a noble one , the योगभ्रष्ट (the one who could not complete Yoga Practices in earlier life ) takes birth in an excellent household where all the members behave with morality and righteousness ; those who speak true and sacred speech and follow injunctions of Vedas and Shastras ; where Divinity is patently manifest and overall conduct is exemplary ; where spiritual matters are discussed and where all family members are diligent and industrious ! 
A family possessing benign attributes and wealth of Divine traits,  propitious well disposed one, where there is ever increasing perennial joy and happiness by virtue of  good deeds done in previous lives, there, O Parth, he is born again ! 

(I hope that I could convey something at least, at least a desire to find the exact meaning therein ! ) 

Best wishes, 
Dr. P. S. Rahalkar
Pune 11 December 2021

Friday, December 10, 2021

 

मैं सब को आशीष कहूंगा !

 कुछ वर्ष पूर्व पढी हुई एक सुंदर कविता आपको भी खूब भाएगी इस विश्वास के साथ पुन: दोहरा रहा हूं, लुफ्त लीजियेगा ! इस काव्य मे एक गहरा दर्शन छुपा है, जिसे पीछली पीढी के बुजुर्ग कवी श्रीमान नरेन्द्र दीपकजी ने लिखा था और सभी को, उनके प्रतिद्वंद्वियों को भी, आशीष कहे थे. 

वह कविता कुछ इस प्रकार है - 

“मेरे पथ पर शूल बिछाकर दूर खडे मुस्काने वाले,
दाता ने अगर संबंधी पूछे , पहला नाम तुम्हारा लूंगा ! 
        
           आसूं , आहें , और  कराहें
            ये सब मेरे अपने ही हैं,
            चांदी मेरा मोल लगाए 
             शुभचिंतक ये सपने ही हैं. ! 

मेरी असफलता की चर्चा    घरघर तक पहुंचाने वाले,
वरमाला यदि हाथ लगी तो    उसका श्रेय तुम्हीं को दूंगा. !
             
             सिर्फ उन्ही का साथी हूं मैं
             जिनकी उम्र सिसकते गुजरी
             इसी लिये बस अंधियारे से
             मेरी बहुत दोस्ती गहरी.  !

मेरे जीवित अरमानों पर  -  हंस हंस कफन उढाने वाले
सिर्फ तुम्हारा कर्ज चुकाने - एक जन्म मैं और जीयूंगा  !   

              मैने चरण धरे जिस पथ पर
              वही डगर बदनाम हो गई
              मंजिल का संकेत मिला तो
              बीच राह मे शाम हो गई.  !

जनम जनम के साथी बनकर  मुझसे नजर चुराने वाले ,
चाहे जितना श्राप मुझे दो - मैं सबको आशीष कहूंगा - 
मैं सब को आशीष कहूंगा. ! ! 

प्रेषक - डॉ. प्र. शं. रहाळकर
पुणे १० डिसेंबर २०२१

Wednesday, December 08, 2021

 

आर्तवाणी

 प्रिय आत्मीय,

नुकतेच एक पुस्तक हातीं घेतले आणि त्यातील एक सुंदर कवन खूप आवडले. असे म्हणतात ना की आपल्याला झालेला आनंद इतरांना वाटून टाकला की त्या आनंदाचे मोल शतपटींनी वाढते. आणि म्हणून तें कवन जसेच्या तसे खालीं देत आहे. ‘मना’चे श्लोक’ म्हणताना आपण जसे एक ठेका धरून वाचतो तसे हे कवन वाचून पहावें. 

“अतां मागणे एवढें एक आहे ।
झिजावी तनू आंस ही पोटीं राहे ।
तुझे कारणीं चिंतनीं काळ जावो ।
सदासर्वदा त्वत् कृपालाभ होवो  ।।

तुझे संगतीचा सदा योग व्हावा ।
जगीं वागतां मोकळा भाव यावा ।
असे रंजले गांजले ते सुखी हो  । 
समस्तांस देवा तुझे प्रेम लाहो ।।

तुझा धर्म तो नित्य नांदो जगांत ।
जनां आकळो कोमला सत्य हेत ।
सदा सज्जनां सात्विकें वागतांना ।
तयांना न हो दु:ख क्लेषादि नाना    ।। 

मती दुर्जनांची बहू शुध्द होवो ।
अधर्मांतरीं जीव ना कोणी राहो ।
बहुतां मतां एकता यावी लोकीं ।
असंख्यात जे जीव होवो विवेकी  ।।

घडो एकता सांप्रदायीं मतांची ।
जडो प्रेमभावें स्मृती साधनेची । 
झडो द्वेष रागादिकें आत्मभावें ।
सदासर्वदा सौख्य लोकीं असावें    ।। 

(ग्रंथनाम - ‘मनोपदेश’ -पूज्य बाबामहाराज आर्वीकर, माचणूर सोलापुर) 

संकलन - रहाळकर ८ डिसेंबर २०२१

Tuesday, December 07, 2021

 

तकिया कलाम !

 ‘तकिया कलाम’ !

हा शब्द वाचून गोंधळलात की काही आठवणी ताज्या झाल्या ?
आमची इंदौरकर मंडळी हा शब्दप्रयोग अनेक वेळा करत किंवा ऐकत आलीं आहेत, म्हणून आज फक्त पुणेकरांना वेठीस धरणार आहे. इतर मंडळींना हायसे वाटत असले तरी त्यांनाही ओढून घेणार आहेच म्हणा ! 
तर, तकिया कलाम म्हणजे नक्की काय, केव्हा वापरतात ही फ्रेज, कशासाठी वगैरेंचा उलगडा थोडक्यात करीन म्हणतो. 
जेव्हा एखादा शब्द किंवा वाक्य विनाकारण नि वारंवार उच्चारले जाते तेव्हा त्याचा होतो ‘तकिया कलाम’. मग तें तोंडाने उच्चारले किंवा कृतीतून दर्शवले गेले तरीही तो तकिया कलाम कहलाता है. 
काही उदाहरणे पाहूं. तुम्ही प्राण या सो-कॉल्ड व्हिलन ॲक्टरचे अनेक सिनेमे पाहिले असतील (मी सगळे पाहिलेत) . प्रत्येक चित्रपटांत त्याने वेगवेगळ्या संवई दाखवल्या आहेत - जसे निरनिराळ्या लकबींत सिग्रेट पेटवणे किंवा ओढणे, हाता पायांच्या विशिष्ट लकबी वगैरे वगैरे. त्या त्या चित्रपटा पुरता तो त्याचा तकिया कलाम ! कुणाकुणाला बोलता बोलता अनेक फुल्या असलेल्या शिव्या घुसडायची आदत तर कुणी शिवी घालूनच एखाद्याचे स्वागत करत असे ! तो त्याचा तकिया कलाम. (काहींना वारंवार रामकृष्णहरी म्हणायची सुध्दा संवय असते म्हणा ! ) 
जरा आठवून तर पहा, तुम्हाला प्रत्येकांत एखादा तकिया कलाम सांपडेलच सापडेल ! 
सिनेमातले किंवा नाटकातले काही प्रसंग  तकिया कलाम मुळे अधिक उठावदार होतात, चिरस्मरणीय होतात. “इतना सन्नाटा क्यों है भाई” किंवा “मूंछें हों तो ……जैसी,” किंवा “गोब्राह्मण प्रतिपालक” वगैरे शब्द रूढार्थाने तकिया कलाम याच सदरांत मोडतात. 
पहा, वाढले की नाही एक पक्वान्न खूप वेळ चघळण्यासाठी ? म्हणून आत्तां तरी आवरते घेतो कारण आता तुम्हीच अनेक तकिया कलाम मला रिटर्न गिफ्ट म्हणून देणार आहांत ! 

रहाळकर
७/१२/२०२१ (पुणे ! ! )

Monday, December 06, 2021

 

“मार्गशीर्ष” !

 ”मार्गशीर्ष”

भगवंताने आपल्या मोजक्या विभूती सांगताना ‘मासानां मार्गशीर्षोहम्’ असे का म्हटले असावे याचा शोथ घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 
वर्षातील बारा महिन्यात मार्गशीर्षाचा नववा क्रमांक येतो. हिन्दींत या महिन्याला अग्रहायन असे म्हणतात (हायन म्हणजे वर्ष). कदाचित् खूप पूर्वीं नूतन संवत्सराचा प्रारंभ या महिन्यापासून होत असावा. त्याचे कारण याच महिन्यापासून उत्तरायण सुरू होते (साधारण २२ डिसेंबर

हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात.

मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर,डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो.मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो.हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतीशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते. या वेळी धनधान्याची सुबत्ता असते.



बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं

मासानां मार्गशीर्षोsहं ऋतूनाम कुसुमाकर:



भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवतगीतेमधील विभूतीयोग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे.सामवेदातली गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुति म्हणजे बृहत्साम छंदामध्ये गायत्री छंद , सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतुंमध्ये वसंत ऋतु जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्णवर्षातलं उच्च स्थान कसे आहे ते भगवत गीतेत वर्णिले आहे. याच महिन्यांत कित्येक सण साजरे केले जातात, जसे पहिल्या दिवशीं देव-दिवाळी, चंपाषष्ठी, श्रीदत्त जयंती, गीता जयंती, महालक्ष्मी व्रत वगैरे अनेक. आरोग्य दृष्ट्याही हा महिना अतिशय लाभप्रद ठरतो कारण पावसाळा संपून थंडी चांगलीच जाणवू लागते, एकूणच वातावरण चैतन्यमय असते, भूक देखील छान लागते आणि एकंदरच माहौल हवाहवासा वाटणारा असतो.
आज पुरवलेली माहिती तुम्हाला आधीच होती याची नम्र जाणीव असूनही पुन्हा तुम्हाला पाठवित आहे, गोड मानून घ्या - तसेही तिळगुळ घ्या गोड बोला असं वारंवार ऐकायचे आहे तुम्हाला !
रहाळकर६/१२/२०२१


This page is powered by Blogger. Isn't yours?