Thursday, November 23, 2017

 

आरोग्य धाम (खंड सहावा)

आरोग्य धाम (खंड सहावा)
जीवन महाशयांना स्पष्टपणे आठवतोय दोन प्रतिस्पर्ध्यां मधला वैरभाव. दोघेही जलद वाढणाऱ्या वृक्षांसारखे – एक दणकट साग वृक्षासारखा नि दुसरा कोंवळा तमाल वृक्ष जणू. पण तो नाजुक मुलगा भित्रा नक्कीच नव्हता !
नवग्रामच्या प्राथमिक शाळेतून जीवन कांदी गांवी गेला आणि कांदी राज हायस्कूलमधे भरती झाला प्रवेश परिक्षेची तयारी करण्यासाठी, ज्यायोगें त्याला बर्दवान्च्या मेडिकल स्कूलमधे ॲडमिशन घेतां आली असती. त्या काळीं स्वप्न होते जीवनचे – डॉक्टर रंगलाल सारखे डॉक्टर होऊन त्यांचेप्रमाणेच पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होत्साता, उंच कॉलरवाला लांब कोट घातलेला, खिशांत सोन्याची चेन असलेले सोन्याचे घड्याळ बाळगणारा नि सोबत डॉक्टरी बॅग लटकावलेला डॉक्टर जीवन दत्त !
सुदैवाने वडिलांची त्याचेवर माया होती नि घरात लक्ष्मी नांदत होती, म्हणून पैशांची वानवा नव्हतीं. उत्तम आरोग्य होते नि भीतीचा लवलेश नव्हता. शाळेतला रम्य काळ छान जात असला तरी त्याने आपले उद्दिष्ट कधीच नजरेआड होवूं दिले नाही. आपल्या खोलीतल्या कॉटवर पडल्या पडल्या तो आपण डॉक्टर जीवन दत्त झाल्याची दिवास्वप्ने रंगवीत राही.

मात्र आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अशा काही घडामोडी घडूं लागल्या की जीवन त्यांत गुरफटून गेले. एका गरीब शिक्षकाच्या मुलीच्या प्रेमांत जीवन अडकले ! त्यांचे वय तेव्हा होते अठरा नि ती फक्त बारा वर्षांची. त्याकाळीं मुलगी चौदा वर्षांची झाली की विवाहयोग्य मानली जायची, आत्ताच्या मॉडर्न सतरा वर्षांच्या मुली इतकी ! ही मुलगी खरं तर वयाच्या मानाने थोराड होती पण जीवनच्या दृष्टीने ती अकाली प्रौढ नक्कीच नव्हती. किंचित लवकर उमललेली, एवढेंच ! शिवाय पूर्ण स्त्री झाल्याची लक्षणेही तिच्यांत नव्हती.
तारूण्याची नव्हाळी तिच्या अंगप्रत्यंगांवर भरपूर प्रमाणात दिसायला लागली होती नि कॉलेज मधील षोडशा म्हणून ती सहज खपली असती. खांद्यापर्यंतच रूळणारे केस तिचे खरे वय सांगू शकले असते. षोडशीचे  केस कंबरेपर्यंत पोहोचल्याशिवीय तिचे वय दर्शवत नाहीत. मंजरी त्याला साक्षात लक्ष्मीसारखी भासली मागे केलेल्या डेकोरेशनविना असलेली लक्ष्मी!

कदाचित् अतिरंजित होतंय् हे. एखाद्या देवीसारखी ती दिसे हे खरे असले तरी रंगाने मात्र ती खूपच सावळी होती, ए ब्लॅक ब्युटी ! कदाचित् म्हणूनच ती आवडली होती जीवनला. खरं तर ती होती फांदीवर उमलूं पाहणाऱ्या चंपक कळ्यांसारखी.
किंचित थोराड असल्याने षोडषा भासणाऱ्या मंजरीला तिच्या आईने घरकाम तर शिकवले होतेच पण तिनेसुध्दा काही निवडक कला हस्तगत केल्या होत्या. वडिलांनी सुरूवातीला बंगाली भाषा शिकवली नि नंतर तिने बंगाली प्रायमर आत्मसात केले. इतकेच नाही तर तिने रामायण आणि महाभारत सुध्दा वाचून काढले होते. या व्यतिरिक्त घरीं असलेल्या जुन्या हस्तलिखितां मधून तिने जुन्या वैष्णव कवींची उत्तम काव्यें थेट भरत चंद्रां पर्यंत वाचली होती. लवकरच तिला बंकिमचंद्रांच्या साहित्याची गोडी लागली. तिचे कोंवळे मन प्रताप नि शैबालिनी तसेच जगत सिंह आणि आयेशा यांच्या व्यक्तिमत्तेवर पोसले गेले होते. बंकिम चंद्रांच्या कादंबऱ्या  प्रथम तिच्या बंकिम नावाच्याच भावाने आणून दिल्या होत्या.

हाच बंकिम शाळेत जीवन बरोबर शिकत होता. जीवनला ख़र्च करण्यासाठी नुकतेच भरपूर पैसे मिळूं लागले असल्याने तो पहिल्या वहिल्या उन्मेषाने पैशांची उधळण करत सुटला होता नि त्यामुळे मित्रमंडळ बरेच वाढले होते. त्यातून उंची तंबाखूची ओढ बंकिमला जीवनकडे आपसूक घेऊन आली. महागड्या तंबाखूमुळे दोघांची गट्टी जमली. त्याच्या हे देखील लक्षात आले कीं जीवनशीं त्याचे लांबचे नाते आहे म्हणून त्याने जीवनची आपल्या वडील नवकृष्ण सिन्हांशी ओळख करून दिली. त्यांना या नवीन नात्याचे काहीही अप्रूप नव्हते ; तथापि या मुलाचे त्यांनी कौतुक मात्र केले.
‘तूं दीनबंधू दत्त यांचा नातू नि जगत् महाशयांचा मुलगा आहेस तर ! वाहवा ! तुला ठाऊक आहे तूं मोशाय कुटुंबातला आहेस ते ? आणि आयर्वेद तर तुमचा खानदानी व्यवसाय आहे. मी असेही ऐकलेंय् की तुझे वडील आतां जमीनदार पण झालेत.’
अशी प्रशंसा ऐकून जीवनला बरे वाटले नि तो आदरपूर्वक गप्प राहिला.
नवकृष्ण बोलत राहिले, ‘आमचे सुध्दा त्या भागांत पिढीजात घर आहे. पण मी इथे काम करत असल्याने वर्षातून एखाद वेळींच पूजेच्या निमित्ताने  तिकडे जाणे होते. नाहीतर तुम्हा लोकांची ओळख झाली असती. ते राहूं देत, तुला भेटून बरं वाटलं. पण—’ ते किंचित त्रासून उद्गारले, ‘पण तूं इंग्रजी काय म्हणून शिकतो आहेस ?’
जीवनला त्यांच्या बोलण्याचा रोख कळला नाही. ‘क्षमा करा, मी नाही समजलो’ तो म्हणाला.
‘अरे, आयुर्वेद आता तुमचा वारसा आहे, आणि तोच मार्ग तू चोखाळला पाहिजेस. त्यासाठी तुला संस्कृत शिकणे अनिवार्य आहे बाळा. तुला इंग्रजीकडे कां वळावसं वाटलं ? आयुर्वेद म्हणजे निव्वळ ज्ञानाचे भांडार नसून तुम्हाला मिळालेल्या सर्व गोष्टींचा मूळ स्त्रोत आहे तो; तुमची संपदा, ‘महाशय’ हे बिरूद वगैरे सर्व.’
‘मला मेडिकलचा अभ्यास करायचाय्.’
‘छान, खूपच छान’ नवकृष्ण प्रभावित झालेसे वाटले. ‘हे तर उत्तमच आहे. बंकिम, याला तुझ्या आईकडे घेऊन जा. ती खरी नातेवाईक आहे याची नि तिच्यामुळे आपण. जा, आंत जा.’
आतल्या अंगणांत मंजरी तिच्या धाकट्या भावाशीं खेळत होती. दोघे खूप जोरात गोलगोल गिरक्या घेत होते एका गाण्याच्या चालीवर. मंजरी खूपच जोरात गिरक्या घेत असतांनाच जीवन बंकिमसोबत तिथे पोंचले. आपला भाऊ बंकिम समजून ती जीवनच्या अंगावर धाड्कन आपटली गिरकी घेतांना. मात्र आपली फजिती झालेली पाहून ती चांगलीच बावरली नि लाजून तिने घरांत पळ काढला. इकडे जीवन त्या अचानक घडलेल्या हल्ल्याने अचंभित झाले आणि आतून येणाऱ्या तिच्या हंसण्याने चक्क घायाळ झाले ! त्या काळी पौगंडावस्थेत प्रणयाची स्वप्नें दाखवायला असे प्रसंग पुरेसे असत !
तथापि हे सगळे तेवढ्यावरच थांबले नाही. बंकिमने आपल्या मित्राची आईशी ओळख करून दिली. जीवन जेव्हा तिला वाकून नमस्कार करू लागले तेव्हा तिने त्याला रोखले नि म्हणाली, ‘नात्याने तूं माझ्यापेक्षा वडील आहेस. असं पहा, तुझ्या आत्त्याच्या नातीबरोबर माझ्या भावाने लग्न केलंय् ; म्हणजे तूं माझ्यापेक्षा वरिष्ठ ठरतोस, कदाचित् माझा सासरा ! पण वयाने मी मोठी असल्याने आपण दोघेही एकमेकांन् नमस्कार करायला नको. ये, बसून घे.’
या नवीन शोधामुळे बंकिमला हर्ष झाला. जीवन जर माझ्या आईचा सासरा असेल तर माझीही पदोन्नती झाली की ! तो आजोबा नि मी नातू, म्हणजे नातू मैत्रीच्या अंगाने आजोबांच्या खोड्या काढू शकतो !
बंकिमची आई नाष्टा आणण्यासाठी किचन मधे गेली तसा बंकिमने मंजरीला तिच्या लपायच्या जागेवरून बाहेर बोलावले. जीवनला त्या दोघांतील संवाद ऐकू आला.
‘चल बाहेर मूर्ख कुठली ! आपल्या आजोबांशी तुझी ओळख करून देतो.’
‘कुणाला भेटायचंय् ?’ तिने हलक्या आवाजात विचारले.
‘तुझे आजोबा !’
‘शी:, तो तर डुक्करासारखा दिसतोय, लठ्ठ नि काळाकभिन्न!’
‘ओह गप्प बस. लाज वाटते मला तुझी. तो माझा चांगला मित्र आहे नि ते सुध्दा मोठा खानदानी.’
‘मग खानदानी मुलगा गलेलठ्ठ डुकरासारखा कां दिसावा ?’
‘मूर्खासारखं बडबडूं नकोस. तो पुरूष आहे, एक बलदंड पुरूष. तो रोज भरपूर व्यायाम करतो.’
‘तर मग त्याने नाटक मंडळीत फिरून भीमाचा रोल करावा ना. शाळेत कशाला जायला पाहिजे ? आपल्याला मस्त गदायुध्द पाहता आले असते. मी नाही भेटण्यार त्याला.’
बंकिम बाहेर आला रागाने धुसफुसत.
अपमानित झालेला जीवन डुकरासारखा बसून राहिला. ते शब्द नक्कीच निरूत्साही करणारे होते, विशेषत: त्या संवेदनशील वयात. त्याने निघण्याची तयारी केली, ‘मला जरा काम आहे’ असे म्हणत.पण तेवढ्यात फराळाची ताटली घेऊन आई बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, ‘मंजरी, आतून पाण्याचा ग्लास घेऊन ये’. त्यांचे व्यक्तिमत्व चांगलेच प्रभावी होते. जीवन नकार देऊ शकले नाही. इतकेच नव्हे तर हट्टी मंजरीला सुध्दा बाहेर यावे लागले, हातांत पाण्याचा ग्लास घेऊन. ‘त्यांना नमस्कार कर मंजरी’, आईने फर्मावले, ‘ते आजोबा आहेत तुझे’. मंजरी साडूचे टोक तोंडांत धरून हसत सुटली.
‘कां हसते आहेस अशी ? जा, नमस्कार कर त्यांना.’
‘आजोबा आहेत हे ?’
‘होतं असं कधी कधीं. काका आपट्याहून लहान असून शकतो. त्याने काय बिघडले ? तुळशीचं पान नेहमीच पवित्र असतं.’
तिने वाकून नमस्कार केला नि पुन्हा हसूं लागली.
‘पुरे आता मंजरी’, तिची आई रागावून म्हणाली. ती हसतच आत निघून गेली.
आमचा तरूण जीवन क्लीन-बोल्ड झाला होता; त्याला ती अचानक आवडून गेली होती ! पण वाटेत काटे विखुरले आहेत.

अशा रीतीने सुरू झाला एक संग्राम, ज्यामुळे त्याचा संपूर्ण जीवनक्रम ढवळून निघाला. त्याचा प्रतिस्पर्धी होता भूपतीकुमार बोस, जो भप्पी बोस म्हणून ओळखला जाई. तो होता एका अति-श्रीमंत बापाचा लेक नि त्या भागातला दादा ! त्याची चालण्याची ढब मस्तवाल हत्त्तीसारखी होती, डुलतडुलत संथ. एक पाऊल दमदारपणे टाकत तो चालायला लागला की लोक आपसूक बाजूला होत.
उंचापुरा नि देखण्या भप्पीने मुद्दाम वाढवलेले केस छानपैकी वळविलेले असत. तो देखील बंकिमचा मित्र होता नि मंजरीवर त्याचा डोळा होताच.

हे सरळ सरळ आव्हान होते वाघ नि अस्वला मधलें. मंजरी त्या दोघांना याच नांवाने संबोधणार आहे. दैवापाशीं खरोखर विलक्षण विनोद-बुध्दी असते हेच खरें !
आणि नाटकाचा पडदा वर गेला.

(क्रमश:…….


Sunday, November 19, 2017

 

आरोग्य धाम (खंड पाचवा)

आरोग्य धाम (खंड पाचवा)
परण खानची बायको आता बरी आहे, अर्थात् डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार जरा कमी. तिची लक्षणे नाडीप्रमाणे नाहीत. खरं तर आजारापेक्षा ती अधिक चिंताग्रस्त आहे. पोटात दुखणं, सर्व अंग ठणकणं वगैरे अनेक तक्रारी. हे लोक तर तिला अंथरूणावरून उठूंच देत नाहीत. गमतीची गोष्ट म्हणजे डॉक्टरला ती जितकी सुधारलेली दिसते तितकी ती आजारी असल्याचं भासवते ! आणि ही बाब त्यांच्या वैद्यक ज्ञानाच्या आवाक्यांतली नाही. खरं तर तिलाच बरे व्हायचे नाहीये. तिला कौटुंबिक जबाबदारी नको आहे; कदाचित नवऱ्याशी तिचे पटत नसावे. म्हणूनच डॉक्टरांना प्रसंगावधान ठेऊन कौशल्याने परिस्थिती हाताळावी लागते. ती आता बरी झाली आहे असे डॉक्टरही सांगत नाहीत, कारण वयस्क खानला खरे काय ते सांगितले तर तो तिच्यावरच भडकेल. शेवटी कौटुंबिक तणाव कुठल्याच लग्न झालेल्या जोडप्यासाठी सुखावह नसतो. डॉक्टर स्वत:च त्या आगींत होरपळलेले आहेत नि अजूनही त्या झळा सोसत आहेत. आजसुध्दा घरी पोहोचताच त्यांना त्या वणव्याची चाहूल लागली. पण त्या संतापाची त्यांना कल्पनाही नाही.
अतर बहू स्वत:शीच पुटपुटत बसल्या होत्या, मात्र त्या पुटपुटण्यांत जहर जाणवतंय्. आणि निशाण्यावर आहेत ते स्वत: नि भोंदू वैद्य शशी ! म्हणजे आज शशीने तेल ओतलंय् आगींत !! डॉक्टर व्हिजिटला गेले असतांना तो आला नि भरपूर तिखटमीठ लावून गावगप्पा करून गेलाय्. वऱ्हांड्यात त्याने ओढलेल्या विड्यांची थोटकं पडलीत. त्याने नक्कीच सकाळी झालेल्या डॉक्टरांच्या अपमानाबद्दल सांगितले असणार अतर बहूला !
खरं तर शशीने जीवन महाशयांकडून बरेच वैद्यक उचलले होते आणि त्याच्या आयष्याची सुरूवात इथूनच झाली नि नंतर बर्दवान् ला जाऊन त्याने कंपांऊंडरी ची परिक्षा दिली होती.  नवग्रामच्या खैराती दवाखान्याचा तो पहिला कंपांऊंडर. आपलं काम तो चोखपणे करी आणि वेळ पडल्यास उपचार पण.  नाडी परिक्षेवरून निदान करण्याचे कसब जीवन महाशयांनीच त्याला शिकवले होते. मात्र शशीच्या संवई फारच गलिच्छ ; दाढी करायचा त्याला विलक्षण कंटाळा. तो आंघोळ क्वचितच करी नि दात कधीच घासलेले नसत. आपले कपडे तर तो पंधरापंधरा दिवस बदलत नसे नि ते देखील दुर्गंधी सुटेपर्यंत ! तो सतत विड्या फुंके नि दारूचे पण त्याला व्यसन होते. विडीकाडीमुळे त्याची नवग्रामची नोकरी गेली. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. हुक्का नि त्याचे सर्व साहित्य तो कायम जवळ बाळगत असे आणि वर दिमाखात सांगत असे, ‘तुम्हाला माहीत आहे हुक्का ओढयला मला कोणी शिकवले ते ? माझ्या प्रत्यक्ष आजोबांनी ! मला त्याची लाजबीज वाटत नाही, सर्व काही खुल्लमखुल्ला ! मी तर माझ्या मुलांना पण सांगून ठेवलंय् की मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्याशेजारी हुक्का नि तंबाखू ठेवायला विसरू नका. काडेपेटी नाही ठेवली तरी चालेल. मी चितेच्या अग्नीवर काम भागवीन !’
नोकरी सुटल्यावर आपल्या तुटपुंज्या वैद्यकीवर तो थोडोफार कमावून धेई. आणि जरूर पडेल तेव्हा जीवन महाशयांचा सल्ला अवश्य घेत असे. त्यांना तो ‘गुरूजी’ म्हणून संबोधायचा.
काय करतोय शशी इथे ? मोतीच्या आईबद्दल सांगून त्याने अतर बहू ला काय म्हणून विचलित केलंय् ? जीवन यांना चांगलाच मनस्ताप होतोय. त्यांना माहीत आहे की या बातमीनुळे तिचा जुना राग पुन्हा उफाळून येईल. ‘हा म्हातारा कधीच शिकणार नाहीये काय ?’ तिची गुरगुर सुरू झाली होती. ‘ अहंकारी माणूस ! असले दु:खद् निर्णय सांगून काय मिळते यांना ? आणि ते काही उच्चशिक्षित डॉक्टर नाहीत. स्वत:च स्वत: शिकलेले एक वैदू आहेत हे. खूप कमीपणा नाही का हा ? त्यांनी नवग्रामचे डॉक्टर त्यांच्याबद्दल काय बोलतात ते ऐकायला हवे. अन् तो शशी ! मूर्ख कुठला. त्याची हिम्मत तर पहा या सगळ्याला बोगस म्हणण्याची !’

तर शशी त्यांना बोगस म्हणतोय ! जीवन महाशयांना वाटले त्याने तसे म्हणायला नको होते. त्यांच्या अडाणी पत्नीने त्या इंग्रजी शब्दाचा  दूरान्वयाने अर्थ काढलाय् नि तो तिला चांगलाच झोंबलाय्.
पण शशीला दोष देण्यांत काही हंशील नाही. कोणाजवळ बोलण्यावांचून त्याला तसेही राहवायचे नाही. त्या तरूण डॉक्टर प्रद्योत ने चांगलंच वादळ उडवून दिलंय्. शेवटी अन्यायाविरूध्द उभे राहण्याचा मानवी स्वभाव आहे नि एक उठला की बाकीचे त्याला येवून मिळतातच की.

नवग्रामच्या सर्व डॉक्टर्स साठी प्रद्योतने आपला इरादा स्पष्ट करून टाकला आहे नि त्यांच्यामार्फतच तो बाजारांत चर्चेचा विषय झालाय्. कुणाला तू लवकरच मरणार आहेस असे सांगणे म्हणजे रानटीपणाची परिसीमा झाली. मृत्यूशिवाय अधिक भयानक काय असू शकते ? तो अजूनही एक अनभिज्ञ प्रांत आहे. लोक तर रोजच मरतात पण मृत्यूची चाहूलसुध्दा बेचैन करतेच ना ? मृत्यूचे गूढ कोणाला उकलले आहे ? अजूनपर्यंत नक्कीच नाही. ‘तूं आतां मरणार’ असे इतर कुणी म्हटले तर ते धमकावणे आहे असे मानले जाणार नाही. पण तेच डॉक्टरने पेशंटला म्हटले तर ती मृत्युदंडाचीच शिक्षा ऐकणे नव्हे काय ?
नेमका हाच मुद्दा डॉक्टर प्रद्योत ने उचलून धरला होता. त्याला या असंवेदनशीलतेचा धक्का बसला होता. तर मग एका सामान्य मारेकऱ्यात नि या भोंदूबाबात काय फरक राहिला हा स्वाभाविक प्रश्न त्याला स्वस्थ बसूं देईना. त्याने या बाबतींत एक तक्रार-अर्ज जिल्हा न्यायाधिशांकडे देण्यासाठी डॉक्टर मंडळींकडून सह्या गोळा करायला सुरूवात केली होती.
डिग्रीप्राप्त असे तीन डॉक्टर्स नवग्राम मधे प्रॅक्टिस करीत होते नि प्रद्योतची नेमणूक सरकारी हॉस्पिटलात होती. उरलेल्या दोघातला डॉक्टर हरेन हा प्रद्योतला दोन वर्षांनी सीनियर नि या गावाचाच होता. मेडिकल स्कूलमधून पास झाल्यावर त्याने गावातच स्वत:चा दवाखाना सुरू केला होता. दुसरे डॉक्टर चारू बाबू हे सगळ्यांत वरिष्ठ.
आता पन्नाशी पार केलेले चारू बाबू पंचवीस वर्षांपूर्वी  आले नि स्थानिक रूग्णालयांत रूजूं झाले. गावातील डॉक्टर्स पैकीं एम्. बी. ही डिग्री मिळालेले ते एकमेव. दहा वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वत:चा खासगी व्यवसाय सुरू केला. आता तर त्यांनी प्रॅक्टिस सोडून यूनियन नि स्कूलबोर्ड च्या कामावरच सर्व लक्ष केंद्रित केलंय्. लोक तर असं म्हणतात की प्रॅक्टिस विशेष चालत नसल्याने त्यांनी हा मार्ग चोखाळलाय् तोंड लपवण्यासाठी ! त्यांचा मोठा मुलगा वरिष्ठ सरकारी अधिकारी आहे नि धाकटा मेडिकल स्कूलमधे शिकतोय्. तसे डॉक्टर चारू चांगले आहेत, मात्र अंमळ कंजूष ! दररोज संध्याकाळी ते दोन औंस ब्रॅंडी अगदी मोजून ग्लासातून घेतात.
बहुतेक डॉक्टर्सना पेशंट्स कडून काहीना काही येणे आहे पण चारू बाबू  त्याला अपवाद आहेत. त्यांचे अकाउंट पुस्तक अद्यावत असे. कुणालाच ते उधार औषध देत नसत. एक महिन्या आड त्यांचा कंपांउंडर युनियन कोर्टात जाऊन खटला दाखल करीत असे. निष्ठूरपणाचा कुणी आरोप केला तर ते जीवन महाशयांचा दाखला देत. ‘त्यांच्याकडे पहा. त्या म्हाताऱ्यानेच मला धडा दिलाय्. पन्नास हजार रुपये तो वसूल करू शकला नाही. त्याच्या हिशेबाच्या वह्या सडताहेत ; वाळवी लागलीय् त्यांना. मला वाटतं चूकभूल घ्यावीद्यावी या शिकवणीच्या बाहेर आलोंय मी.’
आणिक एक चक्रधर बाबू या नावाचे डॉक्टर होते एल्. एम्. एफ्. झालेले, बरेच वरिष्ठ. त्यांनी प्रॅक्टिस कधीच बंद केली होती नि ते खरेखुरे संन्यस्त जीवन जगताहेत भगव्या वस्त्रांचा अंगिकार करीत.
जेव्हा कधी एखादा पेशंट आपली नाडी तपासून घ्यायला येई तेव्हा ते नकार देत. ‘काय उपयोग आहे त्याचा’, ते उद्गारत. ‘डॉक्टरांना सगळे कळते असे कां वाटते तुला ,’ ते विचारीत. ‘खरं तर तो केवळ अंदाज असतो, एक अटकळ. ती खरी निघाली तर छानच, नाहीतर ईश्वरेच्छा ! डॉक्टरची फी काही बुडत नाही !! एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा ; आजार सहसा आपोआप बरे होत असतात. शरीर रचनाच तशी असते. डॉक्टर लोक महागडी नि जालीम औषधें वापरतात आपल्या ठोकताळ्यांवरून आणि पेशंटला वाटते औषधांमुळे गुण आला. अर्थात् असेही काही गुणी डॉक्टर आहेत जे निश्चित रोगनिदान करूं शकतात.’
हुक्का ओढतां ओढतां डॉक्टर चक्रधारींना त्या काळातल्या जुन्या प्रथितयश डॉक्टरांची आठवण झाली. सर नीलरतन, डॉक्टर बिधानचंद्र रॉय, डॉक्टर नलिनी सेनगुप्ता आणि इतर काही. काय दिवस होते ते ! आणि इथे या गावात मला पहायचे भाग्य लाभले डॉक्टर रंगलाल यांना !  कसला माणूस होता तो. अर्थात् जीवन महाशयांचे निदान अगदीं अचूक. त्यांचा मुलगा डॉक्टर वनविहारी, आमचा चांगला मित्र नि चांगला डॉक्टरसुध्दा. खूप मजा करायचे आम्ही, नि नशापण ! तो आजारी पडला मरणासन्न अवस्थेत. आम्हाला नाही उमगले ते, पण जीवन महाशयांना आधीच कळले होते……‘

त्यांचे अविरत बोलणे ऐकून पेशंट कंटाळून निघून जात. ते नुसतेच हंसत. ‘गोविंद गोविंद. फुकट नाडी तपासू ? खूप केलंय आधीं, आता नाही. ‘

मात्र प्रद्योत त्यांना मुळात डॉक्टर मानायला तयार नाही. त्याच्या मते गावात तीनच पात्र असे डाक्टर आहेत. हरेन आणि चारू बाबूंना डॉक्टर प्रद्योतचा मुद्दा कांहीसा पटतोय् पण ते गप्प राहणे सोयिस्कर मानतात. खरं तर एखाद्या आजारी माणसाला तो मरणार आहे असे सांगणे नक्कीच संवेदन शून्यता आहे हे त्यांनाही पटतेंय. असं काही ऐकून रोग्याला  जगण्याची आशाच शिल्लक राहणार नाही. हरेनला प्रद्योतचा राग समजूं शकतो पण तो मान्य करायला धजावत नाहीये.
प्रद्योतने हरेनला खडसावून विचारले, ‘ तू स्पष्टपणे का बोलत नाहीस ? डॉक्टर म्हणून तुझे काही पवित्र कर्तव्य आहे की नाही ? तुला या मृत्यूबद्दलची भविष्यवाणी आणि साधा ज्योतिष सांगणाऱ्यात काहीच फरक वाटत नाही का ? माझ्या मतें हे चक्क चेटूक होय.’
ही सरबत्ती चालू असतांना हरेन पूर्ण वेळ दोन्ही हात जोडून उभा होता.
‘क्षमा करा, पण मी त्यांच्या गावाचा आहे. खरं तर त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत. मी लहान असतांना त्यांनी माझे प्राण वाचवले आहेत.’ थोडे थांबून तो पुन्हा बोलू लागला, ‘ एकेकाळीं ते विलक्षण यशस्वी डॉक्टर म्हणून नावारूपाला आले होते. माझ्या तुटपुंज्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारें मी निश्चितपणे सांगू शकतो की त्यांचे रोगनिदान केवळ अद्भूत होते. आणि ते सुध्दां नुसत्या नाडी परिक्षेवरून ! आता म्हातारपणामुळे कदाचित् ते कौशल्य थोडे कमी झाले असेलही. असं म्हणतात ना, की मोठाल्या ऋषींकडून देखील चुका होवूं शकतात ते !  शिवाय किशोर दा सुध्दां बाहेरगांवी गेलेत. ते परत आल्यावर आपण निर्णय घेऊया. ‘

‘किशोर बाबू !’ प्रद्योतला संताप अनावर झाला. ‘कोण आहे हा तुझा किशोर बाबू ?’ तो ताड्कन उद्गारत चालायला लागला.
 ‘तूं तापट तरूण आहेस’, चारू बाबू म्हणाले. ‘इथे स्थायिक होणे तुझ्यासाठी अवघड आहे. तुझी लवकरच बदली होईल इथून नि मग तू जाशील परदेशांत निघून, उच्च शिक्षण घेण्यासाठी. मला वाटतं तू इथे फक्त अनुभव घ्यायला आला आहेस सांसर्गिक रोगांचा उपचार करण्याच्या निमित्ताने. तुला त्या वयस्क डॉक्टरशी बंगा घेणे शोभत नाही. तू हे सर्व विसरून जायला हवे. तुझ्या त्या तक्रार अर्जामुळे त्यांचे तर नुकसान होईलच, पण इतरांनाही त्याचा फटका बसेल. असं म्हणतात की एक डॉक्टर व्हायला शंभर जणांना मारावे लागते नि चांगला डॉक्टर होण्यासाछी हजार जणांना ! एखादा भोंदू आपल्या परीने काही थोडे कमवीत असेलही, पण काही जणांना तर त्याचा फायदा होतोच ना . करू देत की त्यांना हवे तें, तूं का त्रास करून घेतोस ? तुझी इच्छा असेल तर मी सांगतो त्यांना भविष्यांत असे भाकीत न वर्तवण्याविषयीं . तुला माहीत आहे, जुन्या काळीं एक गाणे खूप गाजले होते – “तुम्हाला जे काही करायचे असेल ते काळवेळ पाहून करा !”
‘फार उतावळेपणा बरा नाही, त्याने गोष्टी बिघडूं शकतात,’ चारू बाबू मनापासून हंसत बोलले.

प्रद्योतला हा सद्गृहस्थ आवडला. तो इथे येताच त्यांच्याशी जुजबी ओळख झाली होती त्याची पण आत्तापर्यंत निव्वळ हाय-हॅलोपुरती. चारू बाबू आज जरा जास्तच प्रेमात आलेले भासले त्याला. त्यांचे ते गाणेसुध्दा आवडले त्याला. “जे काही करायचे ते काळवेळ पाहून करा”. वाहवा !

तो जरा नरम पडला नि किंचित् लज्जायमान पण. खरं तर चारू बाबुंनी योग्य तेच सांगितलंय्. त्याने त्या वयस्क डॉक्टरांवर इतका राग धरायला नकोच.
‘ठीक आहे, मी तुमच्या सांगण्याप्रमाणे वागायला तयार आहे, पण एका बिंदूपर्यंतच,’ प्रद्योत म्हणाला, ‘ते जे काही करताहेत ते नक्कीच निष्ठूर आहे नि अवैज्ञानिक सुध्दा. आणि त्यांना ताकीदपण द्या. काय मूर्खपणा आहे हा ! म्हणें वात, पित्त, कफ, श्लेष्म, नि नुसता हात पाहून सांगितलेली मृत्यूची भविष्यवाणी ! ‘
‘ तर मग मलाही काही सांगू देत. एक काळ असा होता की त्यांची ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरत असे,’ चारू बाबू सावकाशपणे बोलू लागले, ‘नि तसे अजूनही घडतेंय्.’ त्यांनी आपला स्वर अजून खालीं आणला, ‘तूं जरा काळजी घे. मला वाटतं तूं ठरवल्याप्रमाणे मोतीच्या आईला बर्दवान् किंवा कलकत्त्याला पाठवायला हवे. त्यांची भविष्यवाणी खरी ठरण्यापूर्वीं !’
‘तसे नक्कीच घडणार नाही’ प्रद्योतने ठासून सांगितले. सायकलवर बसतां बसताच त्याने निश्चय करून टाकला त्या भोंदूचे बिंग फोडण्याचा. हे तर सरळ सरळ चेटुक आहे. तो आपला मुद्दा नक्की सिध्द करणार. शेवटी त्याचे कर्तव्य आहे ते. नुसते पैसे मिळवण्यासाठी डॉक्टर झालेला नाही तो.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ‘डॉक्टर प्रद्योत जीवन महाशयांना जेलमधे धाडणार ! जीवन महाशयांनी मोतीच्या आईला एक बिघडलेली केस म्हणून जाहीर करून टाकलंय्, तिचा मृत्यू नजीक आलाय नि तसे त्यांनी तिला सांगून पण टाकलंय्. पण प्रद्योत डॉक्टर तिला वाचवणार आहे. गरज पडली तर तो खटला दाखल करेल मॅजिस्ट्रेट कडे अर्ज करून. कदाचित कमिशनर साहेब किंवा थेट मंत्री महोदयांकडे देखील ! अर्जात सर्व प्रकारच्या भोंदू वैद्यांवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली जाईल.’
या बातमीमुळे बी.के.मेडिकल स्टोर मधे चांगलीच खळबळ उडवून दिली.

बिनॉय च्या मालकीचे बी.के.मेडिकल स्टोर या भागातले अतिशय भरभराट झालेले दुकान. या भागातले सर्व डॉक्टर्स बिनॉयच्या दुकानातून एकगठ्ठा औषधें खरेदी करतात. स्टोरचा नावलौकिक पण चांगला होता.
बिनॉय काही डॉक्टर बिक्टर नव्हता पण तो सगळ्या डॉक्टर मंडळींना आणि कवीराजांना अंतर्बाह्य ओळखत असे. शिवाय कुटाळक्या नि लावालावी करण्यात तर त्याचा हातखंडा होता. त्याने शशीला हरिजन वस्तीकडे जातांना पाहिलं नि त्याला हाक मारली. ‘या डॉक्टर, आंत या ! एकेक झुरका होऊन जाऊ देत.’ ‘आतां तुमचे दिवस भरत आलेत हे कळले असेल ना तुम्हाला ? ‘ त्याने हवेंत बाण मारला. ‘तुला माहिताय् डॉक्टर प्रद्योत काय म्हणालाय ते ? तुम्हा सगळ्यांना तो भिकेला लावणार आहे, त्याच्या मतें भोंदूंना ! तुम्हाला खरं तर जेलमधे टाकायला हवे असे म्हणाला तो.’ त्यानंतरची चर्चा बरीच तापली.
काही वेळातच ही बातमी जीवन महाशयांच्या पत्नीला, अतर बहूच्या कानांवर शशीने घातली. ‘इतरांचे मरण कधी येणार वगैरे सांगायची, तेही फुकटात, काय गरज आहे यांना. मोतीच्या आईला हे सांगून काय मिळवले यांनी ? शेवटी आता विज्ञानयुगात वावरतेय हे जग, उच्च शिक्षित डॉक्टरांचा जमाना आलाय. एकें काळी ते वात, पित्त, कफ वगैरें वरचे उपचार चालून जात असत, पण आता नाही. काळ बदललाय्. आश्चर्य म्हणजे महाशयांना तें उमगत नाही.’

हाच एक कच्चा दुवा आहे जीवन महाशयांच्या आयुष्यांतला, जिथून नैराश्य उफाळून येते एखाद्या ठसठसणाऱ्या व्रणासारखे. इथून सुरूवात होते संसर्गाची नि शरीरभर ते पसरायला लागते. हे नक्कीच विधिलिखित असले पाहिजे. अन्यथा त्याचे स्पष्टीकरण दुसरे काय असणार ?
ते आपली डॉक्टरीची डिग्री नक्कीच मिळवू शकले असते ; इतपत त्यांची बुध्दी नि पैसा देखील भरपूर होता. पण त्यांना मधेच तो अभ्यासक्रम सोडून द्यावा लागला. पूर्ण डिग्रीप्राप्त डॉक्टर झाले असते तर कितीतरी फरक पडला असता नि अतर बहू तूं माझ्या आयुष्यांत आलीच नसतीस !


तो एक विलक्षण प्रसंग होता. त्यांनी दीर्घ नि:श्वास सोडला.

ती स्त्री होती, एक जीवघेणी लबाड बाई, जिने त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केलाय्. तिच्यावरूनच त्यांनी एका श्रीमंत, बिघडलेल्या मुलाशी वैर विकत घेतले होते. तो मुलगा त्यांच्याच कायस्थ जातीतला होता जमीनदार कुटुंबातला.

ओह ! तरूण वयातल्या त्या घोडचुका ! हातांत लुटुपुटीची लाकडी तलवार उगारत महाभयंकर राक्षसावर तुटून पडण्याचे धैर्य नि आगाऊपण ! एक साधासुधा गवळ्याचा पोर राजपुत्राशीं भांडण उकरून काढायला धजावतो म्हणजे काय !!

(क्रमश: ———-


Friday, November 17, 2017

 

चांगदेव पासष्टी (Sixty Five Verses)

Sixty five Gems (चांगदेव पासष्टी)

Sri Dnyaneshwar Maharaj most eloquently addressed the legendary yogi Changdev very quintessence of Self-Knowledge, Atma-Jnyana  or Brahma-Jnyana. In fact, Changdev had mastered entire Vedas, Upanishads, the sixfold Darshana, eighteen Puranas besides of course the eightfold yogic practices (Ashtanga –Yoga) whereby he could even dodge old age and death ! He was alive for fourteen hundred years and entire animate objects were under his control. He came to know about extraordinary prowess of Dnyaneshwar Maharaj and wished an audience with him. And in order to seek an appointment he began writing ; but he was unable to decide as to the way Dnyanadev could be addressed, since Dnyanadev was quite young in years as well as a repository of Knowledge. Unable to decide thus, he sent the blank paper unto Dnyaneshwar Maharaj. Sri Dnyanadev quickly grasped predicament on the part of Changdev and wrote back on the same piece of paper sixty five verses, now famous as “Changdev-Pasashti” or the sixty five Gems doled out to Changdev. Indeed, in spite of possessing entire worldly knowledge and  control over things and beings, he did not possess Experience of the Self, Atma and Paramatma, bliss of Self-Knowledge Brahmanandam or whatever ! Sri Dnyanadev granted him that Vision and guided him through the good offices of Muktabai ( Dnyanadeva’s younger sister) attain Liberation. ( One can visit Changdev Samadhi on the banks of river Godavari near Puntamba, district Ahmednagar in Maharashtra India ) .
It would be interesting and enlightening to get an overview of those Sixty five Gems !

स्वस्ति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥ १ ॥
प्रगटे तंव तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो   ॥ २ ॥
बहु जंव जंव होये । तंव तंव कांहीच न होये ।
कांहीं नहोंनिं आहे । अवघाचि जो       ॥ ३ ॥

Sri Vatesha Changdeva ! May welfare be with you ! Let happiness prevail in your life. May you experience exact Form of the Lord. The Lord is immanent everywhere in subtle form. He deludes presence of the world while Himself remaining discrete. The Lord is seen pervading everything if viewed through subtle vision and several objects in the world are seen through gross vision. If we try to see through subtle vision, we can experience His Omniscience and illusion of the world shall vanish altogether.  //1//
We are one with the Lord when He manifests Himself and therefore we are unable to ‘see’ Him. The Lord is invisible while we are aware of the world. If viewed logically, the Lord neither hides nor manifests. Both traits of hiding or manifesting can never touch Him. He remains as Himself eternally, for ever.    
//2//
We will understand phoney-ness of the world while we begin experiencing presence of the Lord. In fact, there is nothing like ‘world’, only the All-pervasive Lord exists. All is Brahmam. We will experience Omniscience of the Lord while our conscience awakens.   //3//

सोनें सोनेपणा उणें । न य येतांचि झालें लेणें ।
तेंवी न वेचितां जग होणे । अंगें जया     ॥४॥
कल्लोळकंचुक । न फेडितां उघडें उदक ।
तेंवीं जगेंसी सम्यक् । स्वरूप जो        ॥५॥
परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां ।
तेंवी विश्वस्फूर्ति इयां । झांकवेना जो     ॥६॥

Ornaments are made out of gold; however, gold-ness does not diminish in spite of different shapes of the ornaments. Gold has changed its shape but original gold remains as it is. Likewise, even while the Lord manifests in different forms, shapes and colours His original Status as Lord does not diminish even a whit. //4//
Waves form incessantly over the surface of water, which delude one that those are enveloping water as a cover. In reality waves are just water alone. It is water all the way before waves form, sustain and disappear in water itself. Similarly, the Lord persists before the world is formed, during its presence and even after destruction of the world.
//5//
The earth is composed of various forms of particulate matter. Atoms or particulate matter constitute the earth in essence. Thus, earthiness of the earth does not destroy. In the same context, formation of the world does not undermine presence of the Lord. Even while the world possesses innumerable forms, all those are just the Lord alone. The attribute-less, formless Nirgun-Nirakar (Brahman) is not disturbed by the various names and forms constituting the world with attributes and forms Saguna-Sakara.
//6//

कळांचेनि पांघुरणं । चंद्रमा हरपों नेणें ।
काय वन्ही दीपपणें । आन नोहे.            ॥७॥
म्हणौनि अविद्यानिमित्तें । दृष्य द्रष्टुत्व वर्ते ।
तें मी नेणें आइतें । ऐसेंचि असे.            ॥८॥
जेंवी नाममात्र लुगडें । येऱ्हवीं सुतचि तें उघडें।
कां माती मृद्भांडें । जयापरी.               ॥९॥

The Moon cannot be extinguished even if covered by its entire sixteen phases. Full Moon becomes totally effulgent by virtue of its intrinsic sixteen phases on a full-moon night. Even while entire phases of the moon are effulgent, the moon itself being self-effulgent those phases cannot overshadow it and so it appears all the more effulgent. Similarly, fire does not appear separate from its brilliant flames. Radiance of both fire and its flames is same. Flames do not alter original brilliance of fire ; on the contrary it becomes all the more radiant.                            //7//

O Changdev ! Ignorance and perverted knowledge make Jnyana personified Atma to appear separate and the viewer too as distinct. It is an absolute delusion ; I do not subscribe to that notion. I do not reckon distinction whatever.     //8//

A loin-cloth is identified by virtue of its name and form; however, it is only its name. In fact it is only the thread that is interlaced. Likewise, a mud-pot is made of mud inside out. We name it as mud-pot because of its form.                          //9//

तेंवी द्रष्टा दृष्य दशे । अतीत दृड्गमात्र जें असे ।
तेंचि द्रष्टादृष्यमिसें । केवळ होय            ॥१०॥
अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें     ।
नाना अवयवें संभ्रमें । अवयविया जेंवीं       ॥११॥
तेंवीं शिवोनि पृथ्वीवरी । भासती पदार्थांचिया परी ।
प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे.             ॥१२॥

Viewer is the one that views and view is the thing to be viewed. Principle of the Super-natural (परमात्म-तत्व), which is nothing else but Supreme Knowledge (ज्ञान) transcends both view and viewer.
That very Principle manifests as world with attributes and form, verily the view and viewer. Moreover, these two can be experienced as such.                                   //10//

Gold manifests naming itself as ornaments. Even when the name changes it is gold all the way. Change in its shape does not destroy its gold-ness. Body possessing various parts such as hands, feet, head, mouth, ears etc presents as conglomeration of organs and even while the body manifests through these organs, the body-ness does not destroy.                             //11//

Right from the formless Divine  ‘Shiva-Swaroopa’ up to entire objects on earth appear in different forms and names. All these can be cognised through Jnyana alone. That exact knowledge dons various names and forms. That very one is inspired to appear as view.                                                 //12//

नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती   ।
प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें.              ॥१३॥॥
बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाची गोडी  ।
तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण           ॥१४॥
घडियेचेनि आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें      ।
तेंवी विश्वस्फूर्ति स्फुरें । स्फूर्तिचि हे         ॥१५॥

If one views a portrait painted over a wall carefully and feels it, it is wall all the way. It is the wall alone that supports the portrait through and through. Likewise, Para-Brahma suffused with Jnyana manifests in the form of the world.                  //13//

Sweetness of jaggery pervades entire jaggery in a very subtle form. Now, even when the jaggery is moulded in the form of lump the sweetness does not become lumpy. Or else, breaking the lump does not break its sweetness. Shape of the lump makes or breaks; however, there is no change in sweetness. Likewise, awareness being extremely subtle as well as all-encompassing does not compare with subtle as well as gross form of the world. //14//

Entire sky becomes effulgent at Sunrise. Likewise, Para-Brahma is inspired to become patent through its latent urge ‘I Am One, let Me become many’ , thus manifesting as various names and forms. Indeed, Para-Brahma ‘becomes’ the world and therefore there is nothing as ‘world’ apart from Para-Brahma the Lord.
//15//

न लिंपतां सुखदु:ख । येणें आकारें क्षोभोनि नावेक ।
होय आपणिया सन्मुख । आपणचि जो.            ॥१६॥
तया नांव दृष्याचें होणे । संवित्ति द्रष्ट्रुत्वा आणिजे तेणे ।
बिंबा बिंबत्व जालेपणे । प्रतिबिंबाचेनि.             ॥१७॥
तेंवी आपणचि आपुला पोटीं ( आपणया दृष्य दावित उठी ।
द्रष्टादृष्यदर्शन त्रिपुटि । मांडे तें हे               ॥१८॥

Even though Paramatma momentarily inspires to manifest as this universe through primal urge, ‘It’ does not ‘attach’ Itself to traits of joys or sorrows of ‘beings’ in the universe. Joys or sorrows never ever touch fringe of the Eternal, Pristine and Blissful Lord. ‘He’ remains in His majestic aloofness all alone. He Himself is the View, Vision and Visionary.
//16//
Just as one sees himself through his image in water or mirror, the image in turn begets the epithet of image-ness and original form. It is ignorance that confers ‘viewer’ status to Jnyana personified Paramatma. The Primal Urge or Inspiration brings it face to face, thus manifesting as View.
//17//
It is Omni-Self (आत्मत्त्त्व) that creates the three-some View, viewer and vision. The Lord Himself takes up the role of the three-some. Although these three entities exhibit distinct names, all those are one with the only one, the Lord.
//18//

सुताचिये गुंडे । आंतबाहेरी नाहीं दुजें ।
तेंवी तीनपणेंविण जाणिजे । त्रिपुटी हे.    ॥१९॥
नुसधें मुख जैसें । देखिजतसें दर्पणमिसें ।
वायांचि देखणें ऐसें । गमों लागे.       ॥२०॥
तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा  ।
हेंचि जाणे प्रसिध्दा । उपपत्ती इया.     ॥२१॥

Thread entangles and converts into a ball. There is nothing else inside out except thread. Likewise, view, viewer and vision are  form of Paramatma alone. Therefore Para-Brahma, the world and distinction between the two is illusory. In fact when seen logically, only Jnyana embodied Omni-Self exists.
//19//
We see our original face in mirror but we are equally aware that the image seen in mirror is not true. Since we see it anyways, we are aware of we being the viewer. The act of viewing is vision and we are viewing ourselves. Thus we ultimately experience that the threesome is phoney.
//20//
Changdeva, it is ignorance to distinguish between view, viewer and vision. Logically, there is none of such distinction and one should consider this very tenet. The Lord is impassive to these  distinctions; however, those delude as present with Him.
//21//

दृष्याचा जो उभारा । तेंचि द्रष्टृत्व होय संसारा ।
या दोहींमाजिला अंतरा । दृष्टि पंगु होय      ॥२२॥
दृष्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्टि घेऊनि असे काई ?
आणि दृष्येंविण कांही । द्रष्टृत्व असे ?       //२३॥
म्हणौनि दृष्याचे जालेपणें । दृष्टि द्रष्टृत्व होणें ।
पुढती ते गेलिया जाणें । तैसेचि दोन्हीं.       ॥२४॥

The canvas that depicts picture of the world is the view. The one viewing the same is Visionary. Both are manifestations of one single Paramatma. Vision is the distinguishing factor between the two, namely view and viewer. Since all the three are forms of Para-Brahma alone, the distinction becomes lame, that is, it disappears altogether.
//22//
If there is no view at all, whom would Jnyana illumine ? Is it possible for viewer-ship to exist if there is no view ? The threesome, namely view viewer and vision persist only as long as one does not Experience Self-Knowledge. Dawn of Atma-Jnyana results into disappearance of the threesome and remains is perpetual effulgence of Chaitanya all the way.
//23//
Viewing and vision exist only when there is View. Absence of view causes both to disappear. All forms of duality vanishes, distinctions set to rest and homogeneous effulgence spreads all around.
//24//

एवं एकचि झालीं ती होतीं । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ति ।
तरी तिन्हीं भ्रांति । एकपण सात              ॥२५॥
दर्पणाच्या आधि शेखीं । मुख असतचि असे मुखीं  ।
माजीं दर्पण अवलोकीं । आन कांही होये ?       ॥२६॥
पुढें देखिजे तेणें बगें । देखतें ऐसे गमों लागे ।
परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे.             ॥२७॥

O Changdev ! One single Para-Brahma manifested as the threesome. Visionary being the Lord, view as the world and the distinction between the two, namely vision along with Jnyana constitutes the threesome. Annihilation of this threesome (Triputi) leads to Realisation of the Eternal, Exuberant, Subtle, Affable and True Form of the Lord Divine.
//25//
Mirror held in front of the faces reflects our face therein. Face was always present before the mirror was held and remains so even after removing it. Also, is the face any different while looking into the mirror ? Likewise, Para-Brahma is homogeneous before, during and after evolution.
//26//
We see our own face in the mirror. It looks as if we possess viewer ness to the face  by virtue of vision. However it amounts to deceit of Jnyana. Considering phoney things as true is indeed deception of Jnyana.
//27//

म्हणोनिया दृष्याचिये वेळे । दृष्यद्रष्टुत्वा वेगळें ।
वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं             ॥२८॥
वाद्यजातेंविण ध्वनी । काष्ठजातेविण वन्ही    ।
तैसें विशेष ग्रासुनी । स्वयेंचि असे.          ॥२९॥
जें म्हणतां नये. ।  कांहीं जाणे नये कैसेही  ।
असतचि असे पाही । असणें जया.           ॥३०॥

O Changdev, we consider formation of view and viewer ness follows to view it. In fact, nothing exists except Brahmam, the Omni-Self. Therefore know it well that Jnyana embodied Omni-Self views us all the way.
//28//
Natural sound exists even before sound from an instrument originates. Or else, before fire manifests clearly from firewood natural fire exists anyway. Likewise, even while entire views etc disappear, the very Basis, namely Brahmam persists. Indeed, Para-Brahma encompasses entire things and beings, while Itself  remaining aloof.
//29//
Para-Brahma can not be ‘seen’, ‘heard’ or described. Even subtle characteristics of senses can not discern It. It can not be understood through Yoga, penance or rituals. Speech, mind, intellect, senses etc are attributes that are inert. The ‘being’ is vibrant, self-evident and verily form of Para-Brahma. It is Truth, Conscience and Bliss and present everywhere all the time.

आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा    ।
तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो          ॥३१॥
जें जाणणेंचि कीं ठायीं । नेणणें कीर नाहीं.      ।
परी जाणणे म्हणोनियाही । जाणणे कैचें.       ॥३२॥
यालागीं मौनेंचि बोलिजे । कांही नहोनि सर्व होइजे ।
तव्हतां लाहिजे । कांहींच नाहीं               ॥३३॥

The eye can see everything but is blind when it comes to see oneself. It is because ‘seeing’ is the attribute of vision. Likewise, Paramatma being Jnyana embodied, it can not be matter for Jnyana.
//31//
Paramatma remains with us as eternal consciousness. There is neither ignorance nor forgetting the Self. In fact Jnyana is related to A-Jnyana or ignorance. Para-Brahma transcends both Jnyana and A-Jnyana and remains bland.
//32//
Para-Brahma is beyond relative knowledge and ignorance. It ‘knows’ ‘Itself’ as it is. It can not be ‘known’ differently. It cannot be described through words. Silence or mute-ness is its exact description. Speech along with mind returns back unable to describe it. Indeed, abandoning entire ‘non-self’ things results in its acquisition ! One cannot attain it without transcending entire paraphernalia.
//33//

नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणेकरुन एकें   ।
नाना कल्लोळमालिके. ।  पाणी जेवीं.             ॥३४॥
जें देखिजतेविण   ।  एकलें देखतेपण.    ।
हे असो आपणिया आपण । आपणचि जें           ॥३५॥
जें कोणाचे नव्हतेनि असणें । जे कोणाचे नव्हतां दिसणें ।
कोणाचें नव्हतां भोगणे । केवळ जो.             ॥३६॥

Changdeva ! Water alone is the basis for entire waves. Waves contain water alone inside out. Likewise, Para-Brahma is the basis for entire attributes such as Satva-Raja-Tama besides the knowledge expounded by Vedas such as Sagun-Nirgun, Sakar-Nirakar.
//34//
Para-Brahma dwells in its own majestic self. It is impossible to describe it adequately since every description proves too meagre. It is singularly extremely expansive as well as subtlest of subtle, which pervades everything.
//35//
Since Para-Brahma is verily existence itself it is not dependent upon existence of anything else. Entire universe forms, sustains and dissolutes, but that does not disturb existence of Para-Brahma. On the contrary it is the basis for entire universe. It is not subject matter for anything, being Self-effulgent. While trying to ‘know’ it, one comes face to face with oneself. Moreover, it is an ever blissful state irrespective of any other enjoyable entity. That blissful state neither increases nor decreases, it is eternally blissful.
//36//t

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा    ।
चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके.     ॥३७॥
ज्ञानदेव म्हणें । तुज माझा बोल ऐकणे        ।
ते तळहाता तळीं मिठी देणे । जयापरि.       ॥३८॥
बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे.  ।
कां उजविडे देखिजे । उजिडा जेंवि.          ॥३९॥

Changdeva, you are the son of that Para-Brahma, which means you are its fraction. Just as  a particle of the immaculate white and fragrant camphor is part and parcel of it, you too are verily form of Paramatma. Moreover, just as there is unity between you and Paramatma, there is unity between me and Paramatma including you ! Entire universe is non-dual.
//37//
Just as you are verily form of Paramatma, so I Am ! There is no distinction between us two. There is absolutely no difference in the basic principle. Therefore, your listening to my advice amounts to listening to your own. It is like joining palm of this hand with the other. Indeed, we are part and parcel of one single Lord.
//38//
Just as word would listen to itself or taste tastes itself or effulgence itself see its radiance, Changdeva, you are listening to my narration of Omni-Self ! While advising you thus I am advising myself, since there is no distinction between us two.
//39//

सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा ।
मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि.                ॥४०॥
गोडिये आपली गोडी ।  घेतां काय न माये तोंडीं.      ।
आमहां परस्परें आवडी । तो पाडु असे.            ॥४१॥
सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे        ।
कीं सिध्दभेटी विसकुसे । ऐंशिया बिहे             ॥४२॥

Gold itself becoming touch-stone in order to test its own purity; or else, face becoming mirror to  see own face, O Chakrapani, this dialogue between you and me is just one single entity. Just as your Omni-Self is attribute-less, dispassionate and eternal, so is mine. Therefore it amounts to speaking or listening to our own selves and so this dialogue between us two is just like that.
//40//
While sugar tastes its own sweetness, will it ever be possible not to accommodate it within itself ? It means sweetness and sweet are one only and not two entities. Same is the case with the joy between us two. Your affection unto me and mine towards you is identical. The same blissful divine form pervades both of us. //41//
O Dear Dear Changdeva ! The intense desire to meet you makes me ecstatic. However, a query crops in suddenly ; am I and Changdev any different ? And since we are just one, a single principle pervades us both, meeting the Siddha (Enlightened) is already in place. In addition, actual meeting of us two is likely to create duality and disturb this blissful state of unison is my latent fear.
//42//

घेवो पाहे तुझे दर्शन । तंव रूपा येवों पाहे मन       ।
तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमें लागे.        ॥४३॥
कांही करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी ।
ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेती उमसू          ॥४४॥
चांगया ! तुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें     ।
हें काय म्हणें परि न धरवें । मीपण हें.          ॥४५॥

Changdeva, I do desire to see and meet you. However, while thinking of you the mind disappears and inner conscience awakens. In fact, you and me are one from Omni-Self point of view. Therefore I reckon that it is not likely to meet you from unison viewpoint. It may not be true Darshan.
//43//
Even while you engage in bodily activity, utter something through speech, think through mind or do not do any of these; that is, either act or do not act, those are not concerned with your true self. Your True Self exists with itself as eternal omni -Self. There is no duality of knowing and knower with the omniself.
//44//
Changdeva, there is no interaction of doing or not doing with the omniself. I cannot hold my ‘Me-ness’ which is related to body while advising you. The names Changdev and Dnyanadev are attributable to the outer sheath, the body. There is no duality with omniself.
//45//
लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो.   ।
तंव तेंचि नाहीं मा काय घेवो । माप जळा.        ॥४६॥
तैसें तुज आत्मयातें पाही । देखों गेलिया मीचि नाही  ।
तेथे तूं कैचा काई । कल्पावया जोगा.            ॥४७॥
जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवी मुके    ।
तेंवि तूंतें देखेनि मी ठाके । कांही नहोनि.         ॥४८॥

If a lump of salt dives into the ocean to gauge its depth, it perishes as lump of salt since entire salt has dissolved therein. In that case, how can it measure the ocean’s depth ?
//46//
Likewise, while I begin to think of your exact nature, I lose my epithetic ‘me-ness’; therefore I do not reckon you as any different from me anymore. Your omniself is identical to my own eternal, Pristine, enlightened and liberated Self. Therefore we two are not any distinct from each other; there is no duality whatever between us.
//47//
When someone after awakening from sleep decides to see the sleep, it just cannot be seen. Likewise, I end up as the main viewer while viewing your omniself since there is no distinction between us . We are just one.
//48//

अंधाराचें ठायीं । सूर्यप्रकाश तंव नाही ।
परी मी आहे हे कांही । न वचेचि जेंवीं.  ॥४९॥
तेंवीं तूंतें मी गिंवसी । तेथें तूंपण मींपणेंसी ।
उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे.         ॥५०॥
डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें ।
आणि तेणेंचि तो देखे । न डंडळिता.     //५१//

We do not see ourselves during a dark non-illumined night where there is neither sunlight or any other source of light. However, we can not forget of our being there.
//49//
Likewise, while I think of your omniself the ‘you-ness’ with you and ‘my-ness’ with me disappears completely and what remains is the pure, unsullied unison of omniself of us both resulting into un-interrupted Blissful state alone.
//50//
If we press lower lid of our eye with fingertip firmly enough, we experience the eye as radiant circles with weird formations. Nevertheless, the eye has not taken up bizarre shapes, it just demonstrates that absurdity. The eye hasn’t become many but is seeing many-ness.
//51//

तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टी ।
मीतूंवीण भेटी । माझी तुझी.        ॥५२//
आतां मी तूं या उपाधी । ग्रासुनी भेटी नुसधी. ।
ते भोगिली अनुवादी । घोळघोळू.     ॥५३॥
रूचतियाचेनि मिसें । रूचिते जेविजे जैसें ।
कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेवीं.   ॥५४॥

Similar is the dialogue between us. And even while dialogue is taking place there is no disparity in vision; there is no obstruction in unified vision. It is because our meeting is taking place without any distinction of ‘you-ness’ and ‘my-ness’. Entire ego with us two has vanished altogether by virtue of this feeling of oneness and thus this affectionate unison.
//52//
Changdeva, I have experienced the pure, unsullied Omni-Self that devours entire ‘me-ness’ which is basically body-sense and its paraphernalia, such as the senses, Prana, mind and intellect as well as outer visible world that connotes ‘you-ness’. I have tried to explain the same to you. I therefore exhort you to experience the same omni-Self yourself.
//53//
If a person likes the taste of a particular dish, very taste of the dish makes him relish the same. It means taste itself enjoys the taste. Or else, the viewer views himself by virtue of mirror.
//54//

तैसी अप्रमेयें प्रमेयें भरली । मौनाची अक्षरें भलीं ।
रचोनि गोष्टी केली । मेळियेचि.             ॥५५॥
इयेचे करूनि व्याज । तूं आपणयातें बुझ       ।
दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसे        ॥५६॥
तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी       ।
आपणिया आपण भेटी । आपणामाजीं.       ॥५७॥

I have written dialogue between us in the form of this letter, which is indeed a poetry that highlights unison of your omniself with mine. It is evident that being absolutely benevolent knowledge it demonstrates pristine pure, Jnyana personified Divine Form, which is unfathomable through intellect and which is self-evident. This is indeed a dialogue of unity between us two.
//55//
Just as a flame experiences its effulgence through its own intrinsic effulgence, unison of our omniself is depicted herein through this poetry. Do understand very Principle in this poem, which is, “I Am Very Form Of Brahmam”. This is truly awakened state and therefore the best and greatest Siddhi (Realisation).
//56//
Changdeva, let your Jnyana-Drishti kindle through the Principle of omniself as narrated to you and enlighten yourself accordingly. Abandon every form of ego and pride and remain ever aware of your Omniself. It will manifest your own True Self thereby.
//57//

जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव   ।
गिळि आपुला उगव । तैसें करी.               ॥५८॥
ज्ञानदेव म्हणें नामरूपें विण । तुझें साच आहे आपणपें ।
तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई.             ॥५९॥
चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ती.   ।
वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसे            ॥६०॥

During total deluge everything gets water-logged and entire streams along with their origins too disappear. Likewise, you should remain as Para-Brahma jettisoning entire epithets. Let body consciousness, senses and their activities, inter-play of entire Prana, all sorts of imaginations, awareness at the level of intellect etc merge into the ocean ‘I Am Form of Brahmam’.
//58//
Your eternal omniself is Truth, Conscience and Bliss, which is devoid of name and form. Original status sans name and form. You should be absolutely blissful by virtue of that joy. Your basic nature is blissful alone. Nevertheless, illusion causes you to think that you are the body. Manifest your absolute blissful state by getting rid of that delusion.
//59//
Changdeva, before concluding this letter let me assert that the being and Para-Brahma merge as one single entity while  pure, attribute-less self-knowledge sprouts within the conscience. Dichotomy of Knowledge  and Knowing disappears on that occasion and what remains is Sat-Chid-Ananda Form all the way. You must attain that status.
//60//

चांगदेवा तुझेनि व्याजें । माऊलिया श्रीनिवृत्तिराजें ।
स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें.          ॥६१॥
एवं ज्ञानदेव चक्रपाणि ऐसे । दोन्ही डोळस आरिसे  ।
परस्पर पाहतां कैसे । मुकले भेदा           ॥६२॥
तियेपरी जो इयां । दर्पण करील ओंविया      ।
तो आत्मा एवढिया । मिळेल सुखा.          //६३॥

Changdeva, Sri Guru Nivrutti has not only advised you under the pretext of this letter, it ha suffused entire nectarine advice with overwhelming bliss. He has lovingly fed that divine self-experience to me as sweats. Moreover, while advising you, I was ever aware of me being verily Brahmam, so also entire universe as Brahmam.
//61//
Changdeva, both of us saw each other as ‘I am Jnyandev and you are Chakrapani’ while holding two mirrors representing pure self-Knowledge. In fact, we have transcended this notion of me as Jnyandev and you as Changdev since we are nothing other than Chaitanya. Indeed this is the Divine Sport of the Lord exhibiting Transcendental Divine Love.
//62//
Whoever undertakes Sadhana desiring Knowledge of the Self and peeps into the mirror representing this letter will certainly be able to view his original, exact omniself. If one contemplates over the subtle tenets put forth herein shall experience his entire being changed for the better. He will be able to discard the false notion of him being the body and shall ever remain aware of him being nothing other than Brahmam.
//63//

नाहीं तेंचि काय नेणों असे । दिसें तेंचि कैसें नेणों दिसें ।
असें तेंचि नेणों आपैसें । तें कीं होइजे.             ॥६४॥
निदेपरौतें निदेजणें । जागृति गिळोनि जागणें         ।
केलें तैसें गुंफणें । ज्ञानदेवो म्हणें                 ॥६५॥

It is not possible to describe Para-Brahma being such and such or this much and that much. It is infinite, eternal. No scripture in the world can describe its exact nature. Words fall short to describe it. Is it not a wonder that the low-witted cannot Experience it in spite of it being resplendent, ever blissful entity ! If ever one looks through subtle vision, he will not see anything apart from the Lord. Because there is nothing other than the Lord pervading everything and being. We just ascribe different names to things and beings constituting the universe, which is basically Form of the Lord alone.
//64//
Indeed, the notion of ‘I am the body’ is verily slumber. The natural dispassionate ness transcends this slumber, which is Yoga-Nidra the Transcendental slumber or sleep. It is the exact form of Para-Brahma. Moreover, annihilating awareness of body consciousness and experiencing omniself itself is true awakening. I have described unison of the being and form of the Lord through these Sixty Five Verses.

                    “Hari Om Tat Sat”

Epilogue : -
One is ever engaged in acquiring knowledge of the outer world, newer inventions etc. However, one pays very little attention to discover nature of one’s own self. It always remains enigmatic, un-answered.
These Sixty Five Verses will help discover the latent knowledge of the Self becoming patent. Many queries and doubts will resolve. Ignorance about one’s true nature is the root cause of unhappiness and despondency.
We are indeed repositories of Chaitanya the Effulgent, Blissful, Enlightened ones. That awareness shall make us experience the bliss, love, enlightenment pervading entire universe.

Jai Sairam !

Dr. P. S. Rahalkar
Pune
17 November 2017
























Monday, November 06, 2017

 

आरोग्य धाम (खंड चवथा)

आरोग्य धाम (खंड चवथा)
जवळ जवळ दहा व्यक्ती, अधिकतर मुसलमान, मोडकळीस आलेल्या इमारतीच्या बाहेर वाट पाहात बसले होते. त्यांच्या तीन पिढ्यांपासून मोशाय कुटुंबाकडे पेशंट म्हणून ते येत आलेत, थेट वृध्द दीनबंधू मोशाय पासून. आता बरेचसे थकलेल्या जीवन महाशयांना खरं तर हा पारंपारिक वारसा पुढे चालवण्याची फारशी इच्छा नाही, पण लोक अजूनही त्यांच्याकडे आवर्जून येतात. वाढते वय नि घरातले अप्रिय वातावरण त्यांच्या शरीरावर दिसूं लागले आहे. त्यांचा एकुलता एक डॉक्टर मुलगा कालवश झालाय. शिवाय नव्याने अवतरलेले वैद्यक शास्त्र नि त्याचा फापटपसारा शेवटचा धागा ठरतोय. त्यांना कधीपासूनच निवृत्त व्हायचंय, पण काहीना काही कारणांनी तें घडत नाहीये. आज मात्र त्यांनी निश्चय केला आहे ;  डाक्टरकी चा आजचा शेवटला दिवस असणार आहे त्यांचा.

तशीही औषधें मिळत नाहीत आता इथे ;; डॉक्टरांनी  औषध साठा करायचे कधीच बंद केलंय. ते फक्त प्रिस्क्रिप्शन लिहीतात नि पेशंट्स तीं नवग्रामच्या बी. के. मेडिकल स्टोअर मधून खरेदी करतात. दर दोन महिन्यांनी किंवा जवळपास डॉक्टरांचे वाजवी कमिशन त्यांचेकडे पाठविले जाते.  
मोडक्या कपाटांच्या वर अकाऊंट पुस्तकांचे ढीग रचलेले दिसतील. मात्र त्यांचे पुष्टे झिजलेत नि कागदांना वाळवीने पोखरून टाकले आहे. डॉक्टर खिन्नपणे हसले. लोकांकडून येणे असलेल्या जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपयांचे हिशेब आहेत त्यांत ! त्यांनी आपल्या तीन पिढ्यांची येणीं त्यांत जोडली तर हा आकडा लाखाच्यावर सहज जाईल.

त्यांचे आजोबा दीनबंधू महाशय नवग्रामला आले नि तिथेच स्थायिक झाले. तिथल्या रॉय चौधरी कुटुंबाच्या अखत्यारीत त्यांनी एक प्राथमिक शाळा सुरूं केली आणि तिथल्या शिकवणीबरोबरच ते रॉय चौधरींच्याच मंदिराचा आर्थिक व्यवहार पाहात असत नि त्यासाठी त्यांना वसूलीसाठी देखील जावे लागे.
महान् कविराज कृष्णानंद सेन हे त्या कुटुंबाचे फॅमिली फिजिशियन होते. नंतर त्यांनी दीनबंधूंना आपला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे घटना घडत राहिल्या. रॉय चौधरींचा एकुलता एक मुलगा टायफॉईड ने आजारी पडला. सर्वांनी आशा सोडल्या होत्या. पेशंटचे वडील छातीवर दगड ठेवून हा आघात सहन करीत होते तर दु:खाने व्याकूळ त्याची आई नि तरूण बायको अश्रूंचे पाट वाहात होत्या. केवळ कविराज खंबीर होते. ‘मला एका स्थिर आणि भक्कम परिचारकाची गरज आहे, जो कठीण परिश्रम करायला तयार असेल’. दीनबंधू स्वेच्छेने तयार झाले. अठ्ठेचाळिसाव्या दिवशीं ताप उतरला. ‘तुला अजून सुट्टी नाही,’ कविराज दीनबंधूंना म्हणाले, ‘तुला अजून चोवीस दिवस रूग्णाची काळजी घ्यावी लागेल. हाच काळ अतिशय महत्वाचा असतो. जवळचे आग्रही नातेवाईक त्याला बोलायला लावतील आणि गरजेपेक्षां जास्त खाऊं घालतील. तुला डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागेल.’ दीनबंधूंनी आपले कर्तव्य चोख पार पाडले, अत्यंत प्रभावीपणे.
कृतज्ञ बापाने त्यांना भलें मोठे बक्षीस देऊं केले पण त्यांनी ते नम्रपणे नाकारले.
‘मात्र मी तुला एक मौल्यवान वस्तू भेट देणार आहे, नाकारूं नकोस’ कविराज म्हणाले. ‘तुझ्यात एक सच्चा डॉक्टर व्हायची पात्रता आहे. तुला बुध्दी तसेच विलक्षण संयमाची देणगी लाभली आहे आणि तुला कसली हाव पण नाही. मी तुला पारंपारिक वैद्यक विज्ञान शिकवीन.’

आपला अभ्यासक्रम पूर्ण करून दीनबंधू नजिकच्या या लहानशा नि शांत खेड्यात येवून स्थायिक झाले. त्यांना नवग्राम मधे राहाण्याची इच्छा नव्हती कारण तिथले श्रीमंत जमीनदार एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मग्न असत. शिवाय तिथल्या बाजाराचा गोंगाट त्यांना सहन होत नव्हता. या श्रीमंत लोकांचे समाधान करणे अवघड असते, ते म्हणत. त्यांचा चट्कन अपमान होई. एक लहानशी चूक जन्मभर केलेल्या सेवेवर पाणी टाकायला पुरेशी असे. त्यातून बाजार हा तर व्यावसायिकांसाठी असतो, निवान्तपणे ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी सर्वथैव अयोग्य !

दीनबंधूंनी ‘महाशय’ हे बिरूद कमावलेले होते नि तेच पुढच्या पिढ्यामध्ये कायम राहिले. बिनकाठाचे धोतर नि पायांत चप्पल चढवून ते खेड्यापाड्यांतून फिरत असत आजारी नि रोगी व्यक्तींवर उपचार करीत. जवळच्या गावांमधला प्रत्येक मुलगा त्यांना ओळखत होता. आजारी पडल्यास ते त्यांचेवर उपचार करीत आणि जेव्हां कधीं ते भेटत तेव्हा आपल्याजवळ कायम असलेल्या बरणीतून त्यांना मध वाटीत.

त्यांची अजून एक आवडीची गोष्ट म्हणजे साधू संतां बद्दल असलेला जिव्हाळा. अनेक साधूंकडून ते विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीं बद्दल शिकले त्यांची मनोभावें सेवा करता करतां. कित्येक प्रकारचे मुष्टियोग आणि रहस्यमय उपचार त्यांच्याकडून ते शिकले. अर्थात त्यांतले काही लबाड नि भोंदू देखील निघाले, पण त्यांची पर्वा महाशयांनी केली नाही. अशा भोंदूंकडून फसवले गेल्याबाबत कोणी त्यांची टर उडवू लागला तर ते ताडकन् उसळून म्हणत, ‘पण मी तर नाही ना फसवले त्याला ?’

त्यांनी काही आदिवासी जमातींकडून सुध्दा अज्ञात जडीबुटींची माहिती मिळवली होती.
आपल्या असामान्य वडीलांप्रमाणेच असामान्य अशा ‘जगत् बंधू दत्त’ यांनी वडिलांकडून ही सगळी विद्या प्राप्त करून घेतली होती.

 मृत्युशय्येवर पडलेल्या दीनबंधूंनी त्यांना म्हटले होते,” मी तुझ्यासाठी मोठी प्रॉपर्टी सोडून जात नसलों तरी मनाचें मोठेपण नि दिलदारी हा मोठा वारसा ठेवून जातोय्. मोशाय कुटुंबाच्या प्रतिष्ठेला कमीपणा येऊं देऊ नकोस. त्या योगें तुझे संपूर्ण आयूष्य सार्थकीं लागेल नि पुढचें देखील !” ते त्यांचे शेवटले शब्द होते.

जगत् बंधू आपल्या वडिलांच्या अपेक्षांवर खरे उतरले. स्नेहमय बिरूद ‘मोशाय’ त्यांच्या नांवापुढे कायमचे चिकटले. वडिलांनी ते बिरूद कमावले होते ; मुलाला तें वारश्याने मिळाले नि तो उत्तम वारसा त्यांनी समर्थपणे जोपासला.
आयुर्वेद उत्तमप्रकारें शिकण्यासाठी त्यांनी ‘संस्कृत’ भाषेचा कष्टपूर्वक सखोल अभ्यास केला होता. फिजिशियन या नात्याने आयुर्वेद या ज्ञान-शाखेत त्यांचा हातखंडा होता. शिवाय ते आपल्या रूग्णांशी अत्यंत सौजन्याने वागत नि पैशांचा तर त्यांना अजिबात मोह नव्हता. त्यांचा स्वाभिमान त्यांच्या प्रेमळ स्वभावाला पूरक होता, जे त्यांच्या बोलीभाषेवरून, घडून गेलेल्या प्रसंगांवरून आणि त्यांच्या विनोद- बुध्दीवरून सहज जाणवायचे. त्यांच्या हजरजबाबीपणा नि विनोद-प्रियतेच्या आख्यायिका अजूनही स्थानिक रहिवासी रंगून सांगतात. मात्र त्यांच्या कोपरखळ्या कधीच दुखावणाऱ्या नसत. इतकेच नाही तर ज्याची थट्टा होई तो देखील हसून तिचे स्वागत करत असे.
नवग्राम नि त्यांच्या गावाला जोडणारा लाल खडीचा रस्ता जगत् बंधूंच्या विनोद-बुध्दीचा परिचायक ठरायचा. अनेक गमतीदार प्रसंग आठवून ते लोक हसून बेजार होतात.
पंचेचाळीस वर्षांपूर्वी आताचा हा गुळगुळीत रस्ता अतिशय खडबडीत, वेडेवाकडे उंचवटे नि खड्ड्यांनी भरलेला केवळ बैलगाडीसाठी उपयुक्त असा होता. पावसाळ्यात तर ते खड्डे अधिकच भयानक होत, ज्यांत एखादे लहान मूल सहज गडप होणे अशक्य नसायचे.
देवीपूरचे रहिवासी अजूनही त्या खड्ड्यांना विसरलेले नाहीत. कोणत्याही वयस्क इसमाला विचारा, तो ‘चोर-खड्डा’ नाव जरूर घेईल. तो खड्डाच असा होता की एखादा चोर त्यांत अडकून पडत असे. दुसरा एक खड्डा होता पशु-मारक. ब्रज न्हाव्याची म्हातारी गाय त्यांत पडून गतप्राण झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे दु:खद् प्रसंगसुध्दा हसायला लावीत. ब्रजने गाईच्या मृत्यूबद्दल प्रायश्चित्त घेणे आवश्यक होते पण त्यासाठी त्याचे डोके कोण भादरणार ? न्हावी असल्याने त्याच्याजवळ वस्तरा तर होता, पण त्याच्यावर तो कोणी फिरवायचा? अखेर आपले डोके आपल्याच हातांनी कुणालाच भादरतां येणार ! शेवटीं जगत् बंधू महाशयांना ते करावे लागले. बेशुध्द अवस्थेतल्या एखाद्या रूग्णांचे केस ते स्वत: काढीत कारण न्हाव्यावर ते काम सोपवणे धोक्याचे असे.
त्यांनी जेव्हा ब्रज न्हाव्यासमोर बसून त्याचे डोके दोन्ही हातात धरले तेव्हा त्यांना हसूं आवरेना. “चांगला तावडींत सापडलास आज”, ते म्हणाले.
“तावडींत सापडलास म्हणजे ?”
“तूं इतक्या जणांचे रक्त काढले आहेस आजवर हजामत करताना ; आज माझी पाळी. कसें ?”

या रस्त्याला सुधारण्याचे श्रेय जीवन महाशयांना जाते. आपल्या नावाची  लाकडी पाटी त्यांनी आपल्या दवाखान्यावर लावली होती. ‘जगत् बंधू’ कविराज होते पण ‘जीवन महाशय’ कविराज आणि डॉक्टर पण. त्याकाळीं लोकांकडे पर्याय असे ‘जगत्’ नि ‘जीवन’ यांच्यांत. तुम्हाला कुठल्या प्रकारचा उपचार हवाय् ? जगत् बंधू आयर्वेदिक उपचार करतील तर जीवन महाशय नवीन प्रणालीचा.

‘निघून जाऊ देत लोकांच्या आठवणीतील त्या संकल्पना’, जीवन महाशय खिन्नपणे पुटपुटले.

त्या आठवणींनी त्यांना चांगलाच मनस्ताप झाला होता. जड अंत:करणाने ते दवाखान्यात परतले आणि काहीच न पाहता ते शून्यांत बघत राहिले.
आजचा दिवस ! होय, आज शेवटला दिवस असणार आहे महाशय परंपरेच्या डॉक्टरकीचा ! ठीक आहे, तसं का होइना !!

‘बाबू मोशाय’ !

‘मोशाय महोदय !’ म्हाताऱ्या शेख मक्बूल ने पुन्हा दारात येऊन हाक दिली. जीवन महाशयांनी दीर्घ निःश्वास टाकला. मक्बूल कडे वळत ते पुन्हा भानावर आले.
‘कोण आहे ते ?’
‘कृपा करून माझा हात पाहाता का महाशय ? मला खूप त्रास होतोय नि या वयात ते सहन होत नाहीये. प्रत्येक अंगप्रत्यंग ठणकतंय नि ताप पण ओसरत नाहीये. मला ठाऊक आहे मला लवकरच मातींत मिळावं लागणार आहे. पण हे दुखणे !! काही करता येणार नाही काय ?’
महाशयांनी नकारार्थी मान हलवली. ‘कृपया माझ्याकडे येऊ नकोस मकबूल. मी उपचार करणे बंद केलेय्. तू हॉस्पिटलच्या नवीन डॉक्टरांकडे का जात नाहीस ? ते कितीतरी चांगले आहेत.’
मकबूलच्या कानांवर विश्वास बसेना. जीवन महाशय, जगत् बंधूंचे पुत्र नि दीनबंधूंचे नातू असे कसे बोलूं शकतात ? जीवन महाशय, ज्यांच्या बोटांनी रूग्णांचे मनगट हातात घेताच आजार अर्धा गायब होतो, ते आज उपचाराला नाही म्हणताहेत ?
डॉक्टर खिन्नपणे स्मित करीत म्हणाले, ‘थकलोय् मी आता मकबूल. मी म्हातारा होत चाललोंय् नि माझ्या हातून चुका पण व्हायला लागल्यात.’
‘असं कसं म्हणतां तुम्ही डॉक्टर ?’ अतिशय कष्टाने कामदेवपूरचा दान्तू घोषाल म्हणाला. ‘ तुम्ही जर उपचार करायचे थांबवले तर आमचे कसे होणार ? कृपा करून आमची नाडी बघा नि आम्ही लगेचच निघून जाऊं. तुमच्याकडून चूक ? अन् तशी झालीच तर ते आमचे दुर्दैव समजू. आमचा नवीन डॉक्टरांवर, नवीन उपचारांवर आणि सगळ्या मूर्खपणावर  भरौसा नाय् ! शिवाय आमच्यासाठी ते फार महागडे आहेत.
त्याचे हे बोलणे खूपच लांबल्यामुळे त्याला अचानक धाप लागली नि तो खोकल्याने कासावीस झाला.
क्षणभर असं वाटलं की हा आता गुदमरणार ; डाक्टरांनी जवळपास पंखा किंवा तत्सम काही दिसतंय् का ते पाहिलं, त्या बिचाऱ्याला मोकळ्या वाऱ्याची खूप गरज होती. तो घामाघूम झाला होता. पण त्यांना काहीच सापडेना. तो चोरटा नंदू ! हातीं लागेल ते पळवणारा; मग त्या बाटल्या असोत, ग्लासेस, थर्मामीटरची डबी, स्टेथोस्कोपच्या टाकाऊ नळ्या वगैरे मिळेल ते !
काहीच न सापडल्याने डाक्टरांनी हिशेबाची एक वही ओढून काढली नि तिचा पुष्ठा फाडून त्या बिचाऱ्याला वारा घालायला सुरूवात केली. खरं तर त्या वहींत वसूल न झालेल्या पैशांचा हिशेब लिहिलेला होता. त्यांनी दुसऱ्या एका पेशंटला, ‘ आत जाऊन पटकन् ग्लासभर पाणी घेऊन ये ‘ असे सांगितले.
कामदेवपूरचा दान्तू घोषाल अजिबात बदलला नव्हता. तो चांगलाच खादाड होता आणि एकही मेजवानी तो चुकवीत नसे. ‘खाणे’ एवढे एकच उद्दिष्ट त्याच्या आयुष्यात होते. पण शरीराला पुष्ट करण्याऐवजी त्याची प्रकृती ढासळत चालली होती. त्याच्याशिवाय त्याला गांजाचे व्यसन जडले होते, पक्का गांजेकश झाला होता तो. तरूण वयात भूक वाढवण्यासाठी त्याने सुरूवात केली होती जेवणापूर्वी एकाद-दुसरा झुरका मारण्याची. त्याने त्याचे पोट फुगायचे अधिक अन्न मावावे म्हणून ! एकदां जीवन महाशयांकडच्या मेजवानीत तो बादलीभर अन्न खाऊन गेला नि त्या नंतर सत्तेचाळीस रसोगुल्ल्यांवर त्याने ताव मारला होता ! एका उन्हाळ्यात तर त्याने एकट्याने आख्खा फणस फस्त केला होता आणि शेवटी व्हायचे तेच झाले, प्रचंड पोटदुखीने कासावीस झाला. चार चार वेळा कॉलऱ्यासारख्या लक्षणांनी मरणासन्न झाला होता पण ‘पेटूगिरी’ त्याला कमी करता आली नाही. अपचनाबरोबरच दम्याने त्याला ग्रासलेले नि गांजा तर सुटत नव्हता, गांजा नि हुक्का दोन्ही ! आठवड्यातून किमान दोनदा डाक्टरांकडे येऊन तो म्हणें ,’ मला काहीतरी उत्तमातलं उत्तम औषध द्या डॉक्टर, मला अजिबात सहन होत नाहीये !’
त्याला सर्वोत्तम औषध तर हवे असायचे पण तेही फुकट !! तो डाक्टरांचा जुना वर्गमित्र होता खेड्यातल्या प्रायमरी स्कूल मधला आणि अनेक दंगा-मस्तीतला सवंगडी ! म्हणून त्याचा हक्क नव्हता का मोफत इलाजावर ?
शिवाय दान्तू पडला एक ब्राह्मण जो काही विशिष्ट कुटुंबांत पूजा करायला जात असे, भलेही त्याचे संस्कृत उच्चार चुकीचे असले तरी !
या त्याच्या विशिष्ट स्थानामुळे तो फुकट उपचाराचा धनी होता. बाहेरची डाक्टर मंडळी या हक्काला मान देत नसत पण जीवन महाशय देत. आणि का देऊं नये ? शेवटी हा हक्क त्याला त्यांच्या आजोबांपासून मिळत आलाय्.
तरी पण, दान्तूचे एक स्वभाव-वैशिष्ट्य होते. जेव्हा कधी त्याला एखाद्या होऊ घातलेल्या मेजवानीची कुणकुण लागे, तो तात्काळ यजमानांच्या मदतीसाठी आपण होऊन पुढाकार घेत असे. त्यावेळीं तो मन लावून सगळी कामे बिनबोभाट मार्गांवर लावी, मस्तपैकी पोटभर जेवून मगच घरी जाई. या स्वेच्छा कामासाठी त्याला पैशांची अपेक्षा नसायची, पण दोनचार आण्यांचा गांजा मात्र तो कृतज्ञतापूर्वक स्वीकारत असे ! अंत्ययात्रेच्या वेळी तो आवर्जून हजर राहात असे.
एक जुनी म्हण आहे – “जो कुणी मेजवानी किंवा अंत्ययात्रेच्या वेळी तुमच्या शेजारी असेल किंवा राज दरबारीं अथवा कोर्टात, तो खरा मित्र.”
एका दृष्टीने दान्तू सर्वांचा आदर्श मित्र म्हणायला हवा कारण तो कोर्टकचेऱ्यांत व्यायसायिक साक्षीदार म्हणून उभा राहायच !

खूप कष्टाने दान्तूला एक दोन ढेकर देतां आल्या आणि त्यामुळे त्याला जरा बरे वाटले. एक मोठा श्वास आंत घेत तो उद्गारला, ‘आता बरं वाटतंय्. तुम्ही या बाकीच्यांना तपासून घ्या डाक्टर, मला वाटतं मला थोडी विश्रांती हवीय्. ‘
मकबूल पुढे सरकला नि त्याने आपला हात पुढे केला. डॉक्टरांनी त्याचे मनगट धरतांच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. डॉक्टरकी सोडण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी ही मंडळी काही ते करू देणार नाहीत, हे मकबूलसारखे लोक. नव्याचें भय वाटते यांना नि परवडणार पण नाही बहुतेकांना. पैशांचे राहू देत, मानसिकताच नाही त्यांची. शिवाय त्यांची प्रकृती अशी विलक्षण आहे की नव्या औषधांना ते भलत्याच तऱ्हेने प्रतिसाद देतील. मकबूलला केवळ एक ग्रेन क्विनीन् दिले तरी तो घामाघूम होतो, नाडी क्षीण होते. म्हणून त्याला विदेशी औषधें मरणप्राय वाटतात.
डॉक्टरांनी अखेर सर्व पेशंट्स पाहिले नि मग ते दान्तू घोशाल कडे वळले. दान्तू आता बऱ्यापैकी स्थिरावला होता. त्याने जेव्हा डॉक्टरांकडे हात केला तेव्हा ते म्हणाले, ‘ काही उपयोग आहे का दान्तू ? तू कधीच पूर्ण बरा होणार नाहीयेस. कारण खूप सोपे आहे, तू खाण्याच्या बाबतींत फार हावरट आहेस. खरं तर तेच तुझा शत्रू आहे नि तेच मूळ कारण देखील. हावरटपणा घालवण्याचे माझ्याजवळ कुठलेच औषध नाही. त्याशिवाय गांजा ! मला वाटतं तब्येत बरी नसतानाही तू सकाळीच दम मारून आला आहेस.
अजिबात न डगमगतां दान्तू उत्तरला, ‘गांजा नव्दे डॉक्टर, विडीमुळे त्याची सुरूवात झालीय्. तुझ्या घराबाहेर तुझी वाट पाहतांना मला ताहेर शेख भेटला विडी ओढत बसलेला. मला खूपच गरज होती विडीची म्हणून मागितली एक. पण एकच झुरका घेतला नि ही स्थिती झाली माझी. त्यानंतर खूप बोललो पण तुझ्यापाशी !’ त्याने असा आव आणला जणू  काहीच चूक नव्हती त्याची. भाबड्यासारखे सुस्कारे सोडत तो बोलत राहिला, ‘ तुला कळणार नाही पण सगळा माझ्या नशीबाचा खेळ आहे हा ! आत्तां निदान ही खोकल्याची उबळ कमी होण्यासाठी काहीतरी दे. मी रोज दोन उकडलेली झुरळं घेतोय् चहासोबत सकाळ-संध्याकाल, पण काहीच फरक पडला नाही.
‘तू विडी नि गांजा सोडला पाहिजेस ताबडतोब’, डॉक्टर म्हणाले. ‘मेजवान्या सुध्दा बंद. नुसता साधा भात नि पिठलं, नाहीतर औषधांचा काही उपयोग नाही नि मी देणार पण नाही. ‘
‘ठीक आहे ; तर मग माझी नाडी बघ नि सांग तुझी भविष्यवाणी, जी तुझी खासियत आहे असं म्हणतात ! मी तर असेही ऐकलंय् की लोहाराच्या बायकोला तू अंतिम निर्णय सांगून टाकला आहेस नि तिला गंगेवर नेण्याचा सल्ला पण देऊन बसला आहेस ! आतां मला जे काही सांगायचं असेल ते सांगून मोकळा हो !
डॉक्टरांना धक्का बसला नि त्यांना सकाळचा प्रसंग आठवला. चट्कन विषय बदलत ते म्हणाले, ‘जरा गप्प बसतोस काय दान्तू ?’
एका कागदावर प्रिस्क्रिप्शन लिहून तो कागद त्याच्या हातांत कोंबला. ‘हे धर. बहुतांश वनस्पतीच आहेत, उरलेल्या गोष्टी किराण्यातून घे आणि चूर्ण करून सेवन कर.’
ते उठले, खूर्ची मागे सरकवली नि खोलीबाहेर पडले.
अमरकुरीचा पराण खान आपली बैलगाडी घेऊन बाहेर थांबला होता. त्याने महाशयांना सलाम केला आणि अदबीने उभा राहिला. त्याची तिसरी बायको गेले सहा महिने आजारी आहे एका मृत अर्भकाला जन्म देऊन. परण डॉक्टरांना घ्यायला आठवड्यातून दोनदां येत असे. आज जायचंय् . परण एक सधन शेतकरी आहे नि तो डॉक्टरांची ‘फी’ ताबडतोब आदा करतो.
डॉक्टर विषण्णपणे हसले कारण त्यांना आठवले ते कटु सत्य. अखेर जगण्यासाठी पैसा तर लागतोच ना ! जेव्हा ते पेशंट्सना आपला निर्णय सांगत होते तेव्हा या वस्तुस्थितीचा त्यांना विसर पडला होता. शिवाय त्यांना तर ते मोफत तपासत होते. शेवटीं स्वत:साठी, घरखर्चासाठी नि तडजोड न करणाऱ्या पत्नीसाठी काहीतरी कमावणे आवश्यक आहेच की !
‘तुम्ही तयार आहांत का डॉक्टर, का अजून काही लोक तपासायचे राहिलेच ?’
‘अरे नाही. चल निघूया !’
‘थोडा वेळ आतच थांबाल का ? मी आणलेल्या भाज्या घेऊन नंदू आंत गेलाय्. रिकामी टोपली आणताच निघू .’
परणखान एक जुन्या चालीरीती सांभाळणारा इसम आहे जो आपला स्नेह त्याच्याच तलावांतली मासळी आणि शेतांतले उत्पन्न भेट देवून दर्शवतो. आणि आता तर त्या भेटवस्तू वरचेवर पोंचविल्या जातात, त्याच्या बायकोच्या आजारापासून. डॉक्टरांच्या वरचा त्याचा विश्वास तसुभरही कमी झालेला नाहीं. हल्लीच्या नवीन औषधांवर त्याचा भरवसा असेल किंवा नसेल. पण नवीन तरूण डाक्टरांवर तर अजिबात नाही.
परण ची तिसरी बायको तरूण नि सुस्वरूप पण आहे आणि तो जरा संशयी वृत्तीचा ! बायकोच्या उपचारांसाठी अमाप पैसा खर्च करण्याची त्याची तयारी असली तरी त्याला आत्मसन्मान सर्वात महत्वाचा वाटे. त्या सन्मानासाठी मृत्यूदेखील कस्पटासमान होता. मात्र त्याला पांढऱ्या केसांच्या, सुसंस्कृत, वयस्क जीवन महाशयां बद्दल कधीच संशय येणार नाही. त्यांची नजरच मुळी एका पित्यासमान स्निग्ध नि प्रेमळ आहे किंवा हिवाळ्यातल्या गंगाजळाप्रमाणे शुध्द वि पवित्र.

बैलगाडी खडखड करीत निघाली.
मोकळ्या मैदानात येताच त्यांना रस्त्याच्या कडेला गच्च भरलेली भातशेती दृष्टीस पडली. एकेकाळीं तीं सर्व मोशाय कुटुंबाच्या मालकीची होती, आतां बिराट पांजाच्या मालकीचे तळें आणि घोष कुटुंबाचा बगीचा. जगत् बंधूंनी ही सर्व जमीन खूप पैसे वेचून खरेदी केली होती तळ्यासकट नि झमीनदाराच्या एक सोळांश हिश्श्यातून.

भूतकाळाच्या आठवणींत रमून गेलेत जीवन महाशय.
नवग्रामच्या प्रायमरी स्कूलमधे ते शिकत होते, बहुधा शेवटच्या वर्गांत. त्याकाळी जमीनदारांचा तोरा काही और असायचा. जमीनदारी मिळताच बडेजाव मिरवणें साहजिकच घडत असे. जमीनदारीचा अर्थ होता देवी लक्ष्मीला आपल्या कुटुंबात कायमची बांधून ठेवणे !
लहानपणी जीवन महाशय दिसायला छान वगैरे नव्हते. दणकट शरीर-यष्टी, काळासावळा रंग, फुगीर चेहेरा आणि चमकदार डोळ्यांमुळे ते उठून मात्र दिसत. आपला कासोटा घट्ट आवळून ‘हुतुतु’ च्या खेळात ते जेव्हा प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करत तेव्हा एकाच वेळी अर्धा संघ गारद करूनच परत येत. मुलें तर चक्क पळून जात नि ‘तो पाहा वाघ’ म्हणून त्यांना चिडवत.
घराच्या मागे एक कुस्तीचा आखाडा होता आणि तिथे जीवन महाशय खूप व्यायाम करीत. मुदगल नि डंबेल्सचा नियमित सराव करीत. एक जोडी तर अजूनही पडलीय् घरात !
हा ढाण्या वाघ कदाचित् नरभक्षक झाला असता, जर पैशांचा अजिबात लोभ न करणारे वडील जगत् बंधू त्यांना न आवरते. त्यांना घराण्याचे चांगले नांव खराब होऊ द्यायचे नव्हते. त्यांना जमीनदारीची बिलकुल हाव नव्हती, पण केवळ इतर जमीनदारांचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांनी एक आयुध म्हणून जमीनदारीत थोडी भागीदारी घेतली होती.

त्यावेळचा एक प्रसंग त्यांना स्पष्टपणे आठवतोय.

मालकीहक्काच्या कागदांवर सह्या करण्याच्या दिवशीं त्यांचा मित्र ठाकुरदास मिश्राने काही बोचरे बोल सुनावले होते जगत् बंधूंना. एकें काळी याच मिश्राने “आरोग्य प्राप्ती हाच सर्वोत्तम लाभ” असे ठळक अक्षरात लिहिले होते दवाखान्याच्या भिंतीवर. ‘अच्छा, तर तूं आता जमीनदार झालास म्हणायचा ! म्हणजेच आध्यात्माच्या वैभवावर लक्ष्मी वरचढ झाली तर’, कुत्सितपणे म्हणाला होता. ‘जे लोक तुला मोशाय म्हणून आदरपूर्वक संबोधायचे ते आता अधिकच वाकतील ‘जमीनदार मोशाय’ समोर !’ या मिश्राला संधिवातातून बरे केले होते जगत् बंधूंनी !  पण ते खूप वर्षांपूर्वीं !
जगत् बंधूंनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ‘मी सांगतो तुला ठाकुरदास. आपण तलवार नि ढाली चे उदाहरण घेऊया. तशी दोन्ही शस्त्रेच. दोन्ही असतील तुमच्याकडे तर तुम्ही योध्दा म्हणवले जातां. मात्र तलवार-धारक नि केवळ ढाल ठेवणाऱ्यांत एक महत्वाचा फरक आहे, जो आपले शीर वाचवण्यासाठी ढाल बाळगतो. मला या मोठ्या जमीनदारांना तोंड देणे अवघड जात होते त्यांच्या कायम उगारलेल्या तलवारींमुळें. म्हणून मला ढाल घेण्याशिवाय पर्याय नव्हता. खरोखर सन्मानाने वावरणे कठीण होऊन बसले होते. रॉय चौधरींनी त्यांच्या तलवारींचे पातें कधीच गमावले आहे पण त्याची मूठ तितकीच त्रासदायक आहे. नवश्रीमंत असलेल्या ब्रजलाल बाबूचा हिस्सा अर्धी आहे पण रुबाब किती ! गेले सहा महिने तो मला चपराश्यामार्फत बोलावणे धाडतो. अर्थात तो चपरासी नम्रपणेच बोलतो. “सलाम डॉक्टर बाबू. तुम्हाला यावे लागेल”, तो म्हणतो. आता या रॉय चौधरींशी रस्त्यावर येऊन तर भांडतां येत नाही ना. ते हुकुम सोडतात त्यांचेकडे जाऊन तपासण्याचा. त्यांतले मोठे बंधू निदान माझी फी तरी देतात पण इतर सर्व ती चक्क डावलतात. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता ढाल बाळगण्यावाचून ! पण लक्षात ठेव, ही तलवार नव्हे. मी आता एका हातांत ढाल घेऊन सज्ज आहे तर दुसऱ्यात माझी औषधांची पेटी. आपण असे म्हणूया की छत्रीचा तो पर्याय आहे.”

आपल्या शब्दाला ते कायम जागले ; त्यांनी आपल्या संपत्तीचा कधीच बडेजाव मिरवला नाही दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठीं. उलट त्यांच्या छत्रछायेखाली अनेकांना सावली मिळत राहिली.
जीवन दत्तांनी शेजारच्या खोलीतून अभ्यास करताना हे संभाषण ऐकले होते.
तथापि, संपत्तीचा मद हळूहळू चढू लागतोच. ते स्वाभाविक असते म्हणा. ज्योतीजवळ कुठलीही वस्तु आणा, ती तापतेच. निसर्ग नियम आहे तो. सरतेशेवटी जीवन यांना पाश्चिमात्य औषधोपचारांचे आकर्षण वाटू लागले, जरी ते आपल्या वडिलांकडून आयुर्वेद सहज शिकू शकले असते. एखादा पदार्थ गरम झाला की प्रसरण पावतो. जमीनदाराचा मुलगा तो, त्याला पारंपरिक संकुचित वातावरणाच्या बाहेर पडायची घाई झाली होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच त्याने संस्कृत विद्यालयातून उत्तम संस्कृत नि व्याकरण शिकावे म्हणजे आयुर्वेद शिकणे शक्य होईल असा सल्ला जगत् महाशयांनी दिला. पण जीवन ने निषेध करून बंडच पुकारले. “मला मेडिकलला जायचे आहे ; पाश्चिमात्य मेडिसीन.” तो म्हणाला होता.
“मेडिकलचे शिक्षण ?”
“का नाही? तेच आता प्रचलित होतंय्. लोकांना कविराजी वर विश्वास राहिला नाही. बर्दवान् ला नवीन मेडिकल स्कूल उघडलंय, मी तिथे जाऊ शकतो.”
त्याने बरोब्बर निशाणा साधला होता. पाश्चिमात्य मेडिसीनचा पूर्ण शिरकाव झालेला होता. कोलकात्याचे मेडिकल कॉलेज नि हॉस्पिटल आणि बर्दवान् चे मेडिकल स्कूल. प्रत्येक जिल्ह्यात उभी राहणारी हॉस्पिटल्स, सगळीकडे खैराती दवाखाने. इंग्रज डॉक्टर्स नि त्यांचे हिंदी सहायक डॉक्टर्स त्यांच्या उंच गळ्याच्या जॅकेट, फुलपॅन्ट नि गोल हॅट्स, चेनच्या पॉलिश केलेल्या डॉक्टर बॅग्ज, नव्याने चिटकवलेल्या लेबलच्या बाटल्यांतली रंगीबेरंगी औषधें. खरंच एक नवीन युग अवतरतंय् !

प्रांताच्या या भागांत कविराजांचाच बोलबाला आहे पण उत्तर नि दक्षिण-पूर्व भागांत दोन नवीन मॉडर्न डॉक्टर्स आलेत, जणू रयतेवर हल्लाबोल करायला. उत्तरेकडील भाग डॉक्टर भुवन गाजवतोय्. मांडीपर्यंत चोळणा (ब्रीचेस) चढवणारा नि उंच कॉलरवाला कोट घालणारा भुवन एका लाल घोड्यावरून फिरतो. दुसरे डॉक्टर रंगलाल पालखीतून प्रवास करतात चार मैलांवरील त्यांच्या घरापासून. ते रेशमी पॅंट, लांब कोट, चेनने बांधलेले पॉकेट वॉच परिधान करतात. या भागांत नवीन उपचार प्रणाली आणणारे ते पहिलेच. एक स्वयं-शिक्षित विलक्षण बुध्दी असलेले नि अक्षरश: अवलिया असे हे विचित्र व्यक्तिमत्व. नदी काठच्या घाटांवरून किंवा जळक्या चिते वरची प्रेतें ते उचलून आणीत आणि पुस्तकाच्या निर्देशानुरूप त्यांची चीरफाड करीत. अशा प्रकारे ते ‘ॲनॅटॉमी’ (शरीर रचना शास्त्र) शिकले स्वत:च स्वत:पासून. या कठोर परिश्रमाचे फळ होते  असाधारण यशप्राप्ती हेच. दूरवरच्या हुगळीहून ते आले होते राज इंग्लिश स्कूल मधे शिकवायला शिक्षक म्हणून. त्यांचे इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. आपल्या असाधारण आत्मविश्वासाच्या जोरावर ते राज इंग्लिश स्कूलच्या नामांकित हेडमास्तर शिवबाबूंच्या इंग्रजीला आव्हान देऊ शकत. मात्र एकाएकी त्यांना मयुराक्षी नदीलगतच्या एका खेड्याने ओढून घेतले आणि आपला पूर्ण वेळ त्यांनी मेडिसीनच्या अभ्यासासाठी झोकून दिला. सरते शेवटी त्यांनी मेडिसीनची प्रॅक्टिस करण्याचा मनोदय जाहीर करून टाकला. त्यांची ख्याती लवकरच पसरू लागली डॉक्टर म्हणून आणि एवढेच नाही तर त्यांची कीर्ती एक निष्णात पाश्चिमात्य डॉक्टर म्हणून दूरदूरवर पोहोचली. या नवीन शास्त्राने काही लोकांचे मनें काबीज केली होती हे नि:संशय.
जीवनच्या आयुष्याला महत्वाचे वळण देणारा हा कालखंड होता. नवीन मेडिकल शास्त्राने त्यांच्यावर मोहिनी घातली. त्यांना नाव, कीर्ती, यश, पैसा नि लोकांचे प्रेम देखील हवे होते. त्याचे वडील आता जमीनदार असल्याने ते शिक्षण परवडण्या सारखे होते. म्हणून प्राथमिक शाळेतून ते कांदीच्या राज हायस्कूलमधे दाखल झाले. ते तेथून प्रवेश परिक्षा देतील, मग एफ. ए. ची, मेडिकल स्कूलच्या प्रवेशासाठी. ……………

बैलगाडी थांबताच ते भानावर आले. ते आत्तां परम खानच्या घराच्या बाहेरच्या खोलीसमोर उभे होते.

(क्रमश:…………




Sunday, November 05, 2017

 

Sri Dasbodh (2.8) सद्विद्या निरूपण

Sri Dasbodh (2.8) सद्विद्या निरूपण
(Description of hallmarks of Excellent Knowledge)

As per Sri Samartha,  society can be divided into three categories of people. Those are either Benign (सत्व), Pleasure loving (रज) or Indolent and lazy (तम).
People belonging to the first category undertake pursuits conducive to spiritual way of life and living. They are selfless, ever ready to help beings and society at large.

The second category people indulge in activities that pamper the ‘body’ since those are pleasure loving. They are selfish and do not see anything beyond happiness for themselves .

Third category people exhibit excessive indiscrimination. They are extremely selfish, mean and possessing destructive mentality. Those are lazy, indolent and nurture entire despicable traits.

All these three categories require some form of enlightenment for their own betterment. Characteristics of excellent learning or knowledge are described in this chapter, which the ideal person possesses in full measure. A society having such persons must be considered extremely fortunate. It is common experience that his sublime biography keeps enthusing and inspiring generation after generations.
It is extremely pleasant and satisfying to listen to characteristics of a person possessing traits of excellent knowledge. He is always loyal, affable, peaceful, compassionate and very humble. He is always ready to help others ; his speech is soft, sweet and truthful.

Sri Samartha enumerates some interesting pairs of qualities that are usually antagonistic to each other. However, the one possessing both qualities in the pair must be unique, indeed very hallmark of an ideal being !

For example, he is handsome as well as clever (सुंदर आणि चतुर पण !) ; very powerful yet serene and docile (!) ; wealthy yet  generous ; very knowledgeable but deeply devoted ;  highly erudite but detached ; great ascetic yet  very peaceful ; great orator yet not greedy ; treats others with respect in spite of being all-knowing ; very humble in spite of being great. He is religious in spite of occupying sovereignty; valiant yet discriminative. He follows code of conduct in spite of his youth. He obeys directives of parents while following ancestral rituals. He consumes food in regulated quantity and quality but does not fall prey to passions. He is successful yet philanthropic. He undertakes great tasks but is egoless. A good singer yet devoted unto the Lord. In spite of being very wealthy he worships the Lord. He is fully detached in spite of him being philosopher.
Such an ideal person is both pure at heart and righteous too. He is highly learned and therefore he is able to offer definitive opinion. He possesses discretion as whom to respect and how much. He takes every care with regard to money and women by virtue of morality.

The one endowed with excellent knowledge is a repository of joy and contentment. He is truly fortunate and ever successful. He nurtures entire virtues and is ever blissful. He is both great thinker as well as righteous in his conduct. He is ever truthful , wealthy and courageous.

Before concluding this chapter Sri Samartha emphasises that the one making all-out efforts can certainly acquire all the virtues mentioned above.

                              “Hari Om Tat Sat”


Wednesday, November 01, 2017

 

Sri Dasbodh (2.7) सत्वगुण लक्षण

 Sri Dasbodh (2.7)  सत्वगुण लक्षण
If we consider entire universe pervaded by the three attributes, human existence over this planet must also be suffused with the threesome. Satva, Raja and Tama are verily form of Shakti alone. Shakti per se is neither good or bad. She just offers result as per her use made by humans.
The reason for distinguishing the three attributes as Pure and Mixed (शुध्द आणि शबल) is that  persons with firm conviction of them being the body (देहबुध्दी ) and selfishness exhibit Mixed Traits, whereas those convinced of being Atma alone and are unselfish exhibit Pure Traits in their life.
For instance, watching battles or fighting or even killing are traits of Tamo Guna. However, Bhagavan Sri Ram learnt art of battle and even indulged enthusiastically. Moreover, He killed Bali, Ravana, Tratika as well. Even Arjun was reluctant to fight but Bhagavan Sri Krishna counselled him through eighteen chapter Geeta and induced him to fight. In spite of that, no one will ever accuse both the Incarnations as Tamo Guni. Both fought or killed as a matter of Duty. Naturally those actions were Satvik in nature undoubtedly.
Life engrossed with body sense is Prapancha or Samsar (worldly), whereas life engrossed with Atma consciousness or God consciousness is Paramartha or spirituality.
All three attributes with worldly outlook exhibit Mixed forms, whereas those with spiritual ones are Pure.

Both Pure and Mixed traits can be compared thus : -
1. Worldly traits possess the notion of creation of world for their sake and exhibit selfishness.
Whereas spiritual traits nurture the notion of them being ‘for’ the world. They are selfless.
2. The worldly ones regard  inert visible objects as everything and so nurture sensuality. Whereas spiritual ones consider the subtle unmanifest as everything and nurture attitude of renunciation.
3. The worldly are Action-prone by virtue of subservience to desires, whereas the spiritual ones are introspective and meditative and therefore detached, being desire-less.
4. Worldly ones hanker after sensuality for entire life being indulgent, whereas spiritual ones engage in acquiring Lord’s love by virtue of uprooting desires and passions, leading to Knowledge of the Self (आत्मज्ञान).
5. Worldly beings indulge in passion, anger, malice, envy etc , which leads to perpetual discontentment .
Spiritual persons are endowed with discriminative faculty and therefore they are ever contented.
6. The powerful ones, wealthy, artistes, pleasure loving and happy-go-lucky people are regarded as ideal; one craves to be like them, a sign of worldly being indeed.
The spiritually oriented ones regard Saints, Sages, great Souls (महात्मा) , Yogins, Renunciate (त्यागी) and Lord’s devotees as ideal; therefore they wish to be like those.
7. Worldly persons possess narrow vision, therefore perverted vision and calumny leading to antagonism with others.
Spiritual ones possess magnanimity leads to affection unto others ; they view only their noble qualities.
8. Worldly ones are indifferent to pain and travails of others. Moreover, they are happy to know their suffering. They have no inclination for philanthropy.
The spiritual ones cannot stand suffering of others ; they possess penchant for philanthropy (परोपकार) and they are happy witnessing joy of others.
9. Worldly beings are happy in worldly matters, while unhappy during suffering.
  The spiritual ones are not perturbed by joy or suffering, being stable and equipoised.
10. The worldly consider their body as God and therefore are ever engrossed in body sense.  Therefore forget God.
The spiritual ones consider GOD as everything and therefore remember Him perpetually.

Be it so ! Sri Samartha explains spiritual aspect of the three attributes while discussing Satva Guna during this chapter.

This Satva Guna is the very beauty of spirituality that grants extremely blissful state  by virtue of annihilating ignorance. It induces the person to be charitable, to undertake vows and penance, to help places of worship while himself striving to serve the Lord. Humans love festivals as their inborn traits. Satva Guna enhances devotion through meticulously organised festivities, which are usually quite disciplined.
Satva Guna kindles inspiration, sharpens the intellect, Divine virtues such as peace, compassion and forgiveness stabilise within one’s conscience; passion gets sublimated and greed is controlled.

Indeed, acquiring pure Brahma-Jnyana by virtue of incessant Sadhana is the greatest feat Satva Guna accomplishes. Such an enlightened being is entirely free from passions, is egoless, is extremely compassionate. He is very humble and ever engages in philanthropy. A truly large hearted Jnyani endures faults in others and leads them unto the Lord.

This Satva Guna found in a Satvik person helps cross the ocean representing the world, which kindles discretion the very essential step in Jnyana-Marga. Satva Guna alone leads to the ultimate Sayujya -Mukti.

I have tried to explain the status of Satva-Guna as per my ability. The audience is requested to be attentive for the next chapter.

                  “Hari Om Tat Sat”


This page is powered by Blogger. Isn't yours?