Monday, September 27, 2021

 

शिळोप्याच्या गप्पा !

 

शिळोप्याच्या गप्पा ! 
आज सकाळीं बाल्कनीत बसून उषा नि मी चहा घेत बसलो होतो निवान्त, नेहमीप्रमाणे  अक्षरही न बोलतां. मौन सोडत मी तिला ‘शिळोप्याच्या’ गप्पा या शब्दाचा अर्थ विचारला. त्यावर ती उत्तरली की तीं असतात गतकालीन आठवणींची उजळणी. पूर्ण पटले मला ते. 

खरेंतर आमच्याही आधीच्या पिढ्यांत सांजवेळेस देवापुढे दिवाबत्ती झाल्यावर ओसरीवर बसून गप्पा रंगत. दिवसभराची कामें उरकून हातपाय धुतल्यावर परवचा, रामरक्षा, भीमरूपी वगैरे स्तोत्रे म्हटल्यावर आज्जी दररोज नवनवीन गोष्टी सांगे, कधीकधी जास्त आवडलेल्या पुन्हा ऐकायचीही फर्माईश होई. पुन्हा चुलीजवळ जाण्या आधीं लेकीसुना गप्पाटप्पा करीत तर वडीलधारी मंडळी विडीकाडी ओढत गप्पांचा आनंद घेई. 

कालांतराने शहरी रीतीरिवाज अंगवळणी पडले, ‘सातव्या आंत घरांत’ या नियंमाचे कधीच तीनतेरा वाजले. शिणेमाच्या नि नटनट्यांच्या गप्पा अधिक रंगूं लागल्या. बिनाका गीतमाला न चुकतां ऐकली जाऊ लागली. कधी क्वचित गोवा मुक्तिसंग्रामाच्या बातम्या रेडिओवर ऐकल्या जात आणि त्याही चर्चा घरीदारीं रंगत. 

आणखी नंतर टीव्ही आले नि संपूर्ण संध्याकाळ त्या ‘मूर्ख पेटी’समोर अक्षरश: वायां जाऊ लागली आणि फालतू सीरियल्स नि वाहिन्यांची रेलचेल झाली. घराघरांतला आपसातला संवाद कधीच नामशेष झाला आणि  शिळोप्याच्या गप्पांचा अर्थ विचारण्याची नौबत आली ! 

शिळोप्याचा गप्पा राहू  देत, खराखुरा दिलखुलास सुसंवादही खूपच विरळ झालाय आतांशा. मोबाईल, किंवा खरेतर स्मार्टफोन्सनी प्रत्येकालाच जणू एक्कलकोंडा करून टाकले आहे. दररोजचे शेकडो मेसेजेस वाचायला चोवीस तास अपुरे पडूं लागलेत. चांगली पुस्तके नि ग्रंथ हातीं घेणे दुरापास्त होत चालले आहे. आपण आपला आवडता छंदही हळूहळू विसरत चालले आहोत की काय असे वाटूं लागले आहे.

तरीही मला या सर्वाचे वैषम्य वाटत नाही, अप्रूप तर नाहीच नाही. ‘कालाय तस्मै न म:’ असे म्हणत दीर्घ सुस्कारा न सोडताही मी तिकडे चक्क काणाडोळा करू शकतो. होय तेवढी परिपक्वता तरी  कमावली आहे मी एव्हाना ! 

या वरून एक गहन सिध्दान्त मांडायचे धारिष्ट्य करीन म्हणतो. असे पहा, क्षणोक्षणी वर्तमान काळ भुतकाळांत परिणत होतो आहे आणि या क्षणी अनुभवलेले पुढच्याच क्षणीं ते शिळे होते आहे. मात्र भविष्याचे तसे नाही. पुढचा क्षण अनुभवूंच याची शाश्वती नाही म्हणून येणारा प्रत्येक क्षण  नित्यनूतनच असणार, त्याला शिळेपण माहीतच नाही. म्हणूनच उषा म्हणाली तसे गतक्षणींच्या आठवणी किंवा अनुभवच बोलता येतात, सांगतां येतात. भविष्यकाळाचे केवळ स्वप्नरंजन होऊ शकते, त्यांत वास्तवाची वानवा अधिक. 
(यांत नवीन ते काय असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे, मात्र माझेसाठी हा विचार फार मोलाचा आहे, क्रांतिकारक आहे. एऱ्हवीं मी भविष्याची चिंता करत नाही पण भूतकाळ मला विसरता येत नाही. ‘वर्तमानात जगा’ हा उपदेश प्रयत्नसाध्य असला तरी मला जमलेला नाही. खरंतर मी फारसा प्रयत्नच केलेला नाही कारण मी अजूनही भूतकाळात अधिक रमतो. माझ्या ॲचीव्हमेंट्स वर आनंद मानीत नि फॉलीज वर स्वत:शी हंसत - कारण आता दोन्हीही भूतकाळात गडप झाल्यात, केवळ स्मृती मागे ठेवून ! ! ) 

रहाळकर
२७ सप्टेंबर २०२१

Sunday, September 26, 2021

 

अवधान, व्यवधान वगैरे…….!

 

‘अवधान एकलें दीजे । मग सर्व सुखांसी पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥’असे माऊली आश्वासन देतात. 
ही ओंवी गुणगुणत असताना अवधान, व्यवधान, अनुसंधान, अनुष्ठान वगैरे कित्येक शब्द मनांत रूंजी घालू लागले आणि प्रत्येक शब्दाचा मागोवा घ्यावासा वाटला. तुम्हालाही या धांडोळ्यात सहभागी करून घ्यावे असे मनापासून वाटले म्हणून तुम्हाला तसदी देतो आहे, जमल्यास अवश्य सामील व्हावे ही प्रार्थना , इति प्रस्तावना ! 

वास्तविक यांतले कोणतेच शब्द समानार्थी नाहीत ही जाणीव असली तरी त्यात एखादे समान सूत्र असलेच पाहिजे असे मला वाटते. असे पहा, अवधान असले तरी त्यांत व्यवधान हे कधी ना कधी येणारच  आणि ते व्यवधान दूर करण्यासाठी काही तरी मार्ग म्हणजे  अनुसंधान घडणे क्रमप्राप्त ठरते.  अनुष्ठान घडण्यास वरील तीन किंवा इतर किती तरी घटक एकवटून येणे अपरिहार्य असावेत (असे मला जाणवते आहे. पहा, हा केवळ शब्दभ्रम उभारतोय असे वाटत असेल तरी हरकत नाही, यू मे क्विट ! पण माझी खात्री आहे की मी पाजळत असलेले दिवे तुम्हाला दुरून का होईना, पाहावेसे वाटतील - असा माझा (फाजील) आत्मविश्वास आहे ! ) 

तर मला असं म्हणायचंय की सर्वप्रथम ‘अवधान’ म्हणजे काय. डिक्शनरी अर्थ आहे लक्ष देणे. माऊली वारंवार विनवितात, ‘अवधारिजो जी’. मात्र हे लक्ष देणे वरवरचे नसून एकाग्र होणे होय. ‘व्यवधान’ म्हणजे अडथळा आणणे, ब्रेक लावणे, थांबविणे किंवा रोखणे अथवा एक इंटरव्हल, ए गॅप ! अनुसंधान म्हणजे शोध लावणे, विशेषत: अनोळखी, अज्ञात वस्तूचा, तर अनुसरण म्हणजे मागोमाग जाणे , मागोवा घेणे किंवा ईव्हन प्रारंभ करणे ! अनुष्ठान म्हणजे व्रत घेऊन ते तडीस नेणे ! अजून एक शब्द आठवला - ‘अनवधान’ , म्हणजे न कळत -  इनॲडव्हर्टंट !

आतां मला सांगा, हे सगळे शब्द निरनिराळे अर्थ दाखवीत असले तरी त्यांत कांहीतरी समान धागा दिसतोय ना ? 
अवधानांत व्यत्यय आला की होते व्यवधान आणि तो दूर सारण्यासाठी जे अनुष्ठान करायचे ते साधत असते अनुसंधानाने ! याच अनुषंगाने , जरासे अनवधान झाले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या ! 

खूप खूप घोळ होतोय् ना ? खरंतर ‘अवधान एकलें’ वर अनेक शब्दांचा भडीमार करून मी माझे (खरे) पितळ उघडे केले आहे. (मुळांत केवळ पितळ असलेल्या मला सुवर्ण असल्याचा माज होता, तो आज या निमित्ताने काहीसा दूर होईल अशी आशा करतो ! ) 

तथापि, शर्यत अजून संपलेली नाही. मी पुन्हा येईन काहीतरी चमचमीत घेऊन, वाट पहा अनवरत ! !

रहाळकर
२६ सप्टेंबर २०२१ 



Friday, September 24, 2021

 

गडी, घरगडी, रामा-गडी, देवराम वगैरे !

 गडी - घरगडी - रामागडी - देवराम वगैरे


आज हे काय भलतेच, असंच वाटलं ना तुम्हाला ? पण मला सांगा, आतांशा ती जमात लुप्त होतेय् असं नाही वाटत तुम्हाला ? एकेकाळी बहुतेक घरांत ही मंडळी राजरोस वावरत, अगदी घरचेच असल्यासारखी. कित्येकदा त्यांच्या कित्येक पिढ्या त्या त्या घरकुलांत सुखेनैव नांदलेल्या मला ज्ञात आहेत

मुंबईचे रामा-गडी सहसा कोंकणी, तर आमच्या मध्य भारतांतले बहुतांश देवराम राजस्थानी पल्लीवाल असत. दोन्ही जमाती अतिशय कष्टाळू नि प्रामाणिक. रामागडी कायम घाईत तर देवराम संथपणे मन लावून कार्यमग्न ! सततची बडबड मात्र रामा कडून ऐकताना प्रारंभीं खूप मजेशीर वाटे. त्याचे विविक्षित हेल काढून बोलणे नि प्रत्येक संवादांत नाक खुपसण्याची  त्याला भारी हौस


कालांतराने त्यांची जागा बहुतांश मोलकरीणींनी घेतली. आतांशा बहुतेक घरांत त्यांचीचहुकुमतचालते. कामाचे स्वरूप, मेहनताना, वेळा, सुट्ट्या आणिदांड्यात्यांचे मर्जीनुरूप ! बरं गृहिणींना फारसा पर्याय राहिलेला नाही कारण गेली दीड दोन वर्षेंअहो’, ‘ह्यांनी’  अशी बिरूदें मिरवणाऱ्या नवरोजींनीगडेकिंवा खरेतरगड्याचा रोल मारून मुटकून का होईना आदा करत आणलेला आहे ! (पटतंय् ? घर घरकी बात जो कह रहा हूं ! ) 

या निमित्ताने मला आठवताहेत रामलाल, चुन्नीलाल, भंवरलाल वगैरे आमचे पुख्तैनी देवराम. सणासुदीं सकट सर्व कार्यभार लीलया नि हंसतमुखाने उचलणारे. सहसा अत्यंत मनमिळाऊ असलेलेदेशाची याद येतांच त्यांचे डोळे डबडबून येत, कंठ अवरूध्द होई त्यांचा……! 

खरंच, आपल्या मातीची ओढ प्रत्येकालाच असते नाही ! आमचेच पहा ना. इन्दौरचा नुसता संदर्भ येताच आमच्या संवादात आपापल्या आठवणी अहमअहमिकेने सांगण्याची चढाओढ सुरू होते

जी व्यथा देवरामांची तीच रामा-गड्यांची. कधी एकदाचे गणपती येतात नि गांवीं पळतो अशी तुरबुर लागते त्यांना

आपलीही परदेशस्थ मुलें हाच भाव बाळगून असतील नाही ? मात्र त्यांनी इकडे आल्यावर केवळ इथल्या अडीअडचणी सोडवत बसतां या मातीचा भरपूर सुगंध मनसोक्त सांठवून घ्यावा आणि तो पुन:पुन्हा भरून घेण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी मायभूमीला भेट द्यावी (असे प्रत्येक म्हातारा-म्हातारीला वाटत राहते ). असो

(विनाकारण विषयांतर करायची खोड जडली आहे मला ! ) 


लिहिता लिहितां अचानक आठवलीवाऱ्यावरची वरातमधली पुलंचीएक रविवार सकाळ’. तो रामा-गडी किंवा लग्नसराइतला प्रत्यक्ष गडी नसलेला हरकाम्यानारायणही पात्रें ठसठशीतपणे रंगवणाऱ्या पुलंचे खरोखर कौतुक वाटते. खरं तर आपल्या अंवतीभंवती अशी अनेक पात्रें वावरत असतात. आपल्या जवळ जराशी तिरकस दृष्टी मात्र हवी. (आता माझेच पहा ना, ‘गड्यांवर किती सुंदर भाष्य करून मोकळा झालों ! ) 


रहाळकर

२३ सप्टेंबर २०२२


Saturday, September 04, 2021

 

कदम साब की बग्गी

 कदम साब की बग्गी 


सन् उनईस सौ पचास की बात कर रहा हूं मै, जब शिवपुरी .प्र. के डीएसपी कदम साब मेरे पिताजी के अक्सर अच्छे दोस्त हुवा करते थे. ऊंचे कद वाले तगडा बदन कदम साब पुलिस मे रहते हुए भी काफी खुशमिजाज और दिलदार आदमी थे. कभीकभार पिताजी उनके साथ शिकार पर चले जाते और देर रात तीनचार बजे वापिस घर लौटते. उन दिनों शिकार पर कोई पाबंदी नही थी और शेर का शिकार कुछ अलग एहमियत रखता था. खैर, कभी शेर तो हाथ नही लगा लेकिन छोटेमोटे जंगली जानवर पा कर वे लोग संतुष्ट रहते. असल मे शिकार के बजाय कदम साब की खानदानी दोस्ती को पिताजी ज्यादा तबज्जोह दिया करते थे. वाकई बडे उमदा दिल थे कदम साब

मुझे एक वाकया साफ साफ याद रहा है, जब एक अप्रैल को वहां के एक्जीक्युटीव इंजिनियर आठवले साहब को इन पांच छै अफसरों ने शानदार तरीके से एप्रिल-फूल बनाया था. उन दिनों प्रदेश के राज्यपाल को राजप्रमुख कहा करते थे और वे छुट्टी मनाने कभी कभी शिवपुरी सर्किट हाऊस मे मुकाम करते थे

शिवपुरी के डिप्टी कलेक्टर रहालकर, डीएसपी कदम, ट्रेजरी अफसर साहेबराव देसाई, सिविल सर्जन डाक्टर रानडे, डिग्री कालेज प्रिन्सिपाल देशपांडे सर, डीएफओ भोसले साब (सबके सब चट्टे बट्टेऔर कुछ अन्य अफसरों ने प्लान बनाया और राजप्रमुख का शिवपुरी दौरा झूटमूट ऐलान कर दिया. चूंकी सर्किट हाऊस की जिम्मेवारी आठवले साब की थी, उन्हे आगाह कर दिया गया की राजप्रमुखबडा खानायाशाही खानापसंद करेंगे और जिले के सभी अफसरान के साथ उसका लुफ्त उठायेंगे ! राजप्रमुख का नकली लेटरहेड बनाया गया और चीफ सेक्रेटरी के हुबेहूब हस्ताक्षर से इतल्ला दी गई. आगे का हाल आप खुद समझ जाएं ! (Of course it was all fun only and even Mr. Athawale had a hearty laugh —- later on ! ) 


कदम कदम मिलाए जा’  यह गीत उन दिनो काफी मशहूर था और बचपन से ही पहले शाखा और फिर एनसीसी की वजह से कदम मिलाकर चलेन की आदतसी हो गई

जिंदगी मे बहोत बार कदम साब की बग्गी से सफर किया. कभी साईकल पंचर होने के कारण, कभी कार घने जंगलों मे अड जाने के कारण, कभी उफनती नदी पार करवाने के लिये और अभी अभी हवाई अड्डेपर व्हीलचेअर या ट्राली समय पर ना मिलने की वजह से


वैसे मुझे पैदल चलना हमेशा अच्छा लगता था, केवल जबरदस्ती चलना पडे तब मै खुद से लड लेता. लोग अक्सर ग्यारह नंबर की बस का बखान करते हैं जब पैदल चलने के सिवा कोई रास्ता ही ना हो, लेकिन एक असलियत बता ही दूं ! लंदन मे ग्यारह नंबर की बस राईड मुझे बेहद पसंद है, चूंकी वह मेरे फेवरिट इलाकों से गुजराती है - मसलन् चेलसी, विक्टोरिया, पार्लियामेंट स्क्वेअर, टेन डाउनिंग स्ट्रीट, ट्रॅफलगार वगैरह ! ! 


(मेरे इस हिन्दी प्रयास को जरूर लाईक कीजिये और सब्स्क्राईब करना ना भूलें ! )

डाक्टर रहालकर

पुने 

  सितंबर २०२१ 


This page is powered by Blogger. Isn't yours?