Sunday, May 14, 2023

 

अवचिता परिमळु……!

 अवचिता परिमळु……! 


आज अवचितपणे ज्ञानदेवांची ही विरहिणी कानीं पडली आणि मन सैरभैर जाहले. या संतश्रेष्ठाच्या अंत:करणातील भगवद् भाव खरोखर शब्दात मांडण्यासारखा नाही कारण तेच प्रत्यक्ष भगवंत आहेत याची प्रचीती वारंवार येत राहते. तथापि, जसे स्वामी म्हणत, ‘I separated Myself from Myself in order to Love Myself !’ ,  ज्ञानदेवांच्या विरहिणी तशाच असाव्यात


आधी ते समग्र कवन पाहूया नि मग जमल्यास त्यातले तात्पर्य किंवा गर्भितार्थ . ते म्हणतात,


अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु मी म्हणे गोपाळु आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघालें ठकचि मी ठेलें काय करूं   

मज करा कां उपकारू अधिक ताप भारू सखिये सारंगधरू भेटवा कां

तो सांवळा सुंदरू कासे पीतांबरू लावण्य मनोहरू   देखियेला

भरलिया दृष्टी जंव डोळां न्याहाळी तंव कोठे वनमाळी गेला गे माये

बोधुनी ठेलें मन तंव आलें आन सोकोनि घेतले प्राण माझे गे माये

बापरखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा तेणे कायामनेंवाचा वेधियेलें ‘ 


स्वैर भावांतर

मी आपल्या मंदिरांत असतांना सुगंध शीतल वायूची सहज झुळुक आली नि माझ्या मनाला असे वाटले की हा वारा नाही हो, गोकुळातला गोपाळच आहे ! म्हणून त्याला पाहावे या इच्छेने चाचपडत चाचपडत हलकेंच बाहेर आल्यें. परन्तु मी चक्क ठकल्यासारखी  झाल्यें काय करूं ! खरेतर मी शांत व्हावे म्हणून तुम्ही उपचार करताय सख्यांनो, पण त्या पासून मला अधिकच ताप होतोय् ना ! मला तो शारंगधर वनमाली  आणून भेटवा हो ……!  काय त्याचे वर्णन सांगूं, तो सांवळा सुंदर सकंकणु, कंबरेवर पितांबर नेसलेला, लावण्याची तर जणू खाणचनि पाहताक्षणीं चित्त चोरून घेणारा

आणि अशा मनोहारी श्रीकृष्ण परमात्म्याला डोळे भरून पाहू म्हटले तेव्हा तो कोणीकडे गेला कळे, त्याने मला दर्शन देऊन माझे मन आपल्या स्वरूपात बांधून ठेवल्यामुळे माझ्या शरीरातील प्राणच शोषून घेतले गे माये ! ! 

शिवाय रखुमादेवीवर, सुखस्वरूप बाप श्री विठ्ठलाने तर माझे शरीर, मन नि वाणीही वेधून टाकली की गो माये ! ! ‘ 

अद्वैतातून द्वैतात नि द्वैतातून पुन्हा अद्वैतात शिरण्याची हातोटी किती सहज दाखवून जातात नाही श्री ज्ञानेश्वर महाराज ! त्यांच्याविराण्यासुध्दा किती उत्कट, भावपूर्ण आणि आनंददायी असतात हे वेगळ्याने सांगण्याची अजिबात गरज नाही, म्हणून स्वल्पविराम

रहाळकर

१४ मे २०२३







Wednesday, May 10, 2023

 

आमरस पार्टी

 आमरस पार्टी !


सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वीचे प्रसंग आहेत हे. कित्येकांना आता ते अप्रासंगिक वाटले तरी मला नि माझ्या भावंडांसाठी ते अनमोल खजाने आहेत हे आता ऐंशी पार केल्यावर अधिकाधिक जाणवूं लागले आहे. त्या काळी आम्ही मनसोक्त अनुभवलेले ते प्रसंग कदाचित तुमचे थोडेबहुत मनोरंजन करतील अशा (अजूनही) भाबड्या समजुतीने ते सांगायचा प्रयत्न करीन, वाटल्यास यू मे क्विट राइट नाऊ


तर मी सांगत होतो त्या काळच्या आमरस पार्ट्यांबद्दल. त्या काळी राजरोसपणे संध्याकाळीजरा बसूंयाअसे घडणे दुर्मीळ असे. मात्र आमरस किंवा दालबाटी पार्ट्या हमखास रंगत. दोन्हीसाठी मुळांत खवैय्येगिरी आणि त्यासाठी लागणारी पूर्वतयारी नि भरपूर वेळ साहाजिकच अत्त्यावश्यक असे

आंबे खरेदीसाठी काही विशिष्ट व्यक्तींवरच ती जबाबदारी सोपवली जाई. अर्थात बरोबर आम्ही लहान बालकें नि बालिका आवर्जून जात असूं. ‘मार्केटमधले कित्येकठेलेवालेप्रत्येकाच्या हातावर चव दाखवण्यासाठी भरपूर रस पिळत निरनिराळ्या आंब्यांचा. बरीचशी घासाीस करत पाचसहा मोठाल्या पिशव्या भरून आंबा खरेदी होई. त्या काळीं आंबेशेकड्यानेविकत. एक शेकडा म्हणजे दोनशेबारा नग ! आक्षरश: शेकडोंनी आंबे विकत घेतले जात


माझ्या वडिलांचे सात जिवलग मित्र होते - नि तेबी सेव्हनया नांवाने ओळखले जात. बहुतेक सर्व बालपणापासूनचे मित्र असल्याने त्यांचे संवाद किंवा दंगामस्ती पाहून आम्हालाही आश्चर्य वाटे ! आर्थिक दृष्ट्या सर्वांमध्ये खूप विषमता असली तरी त्यांची मैत्री कित्येक वर्षें, नव्हे पिढ्या कायम राहिली हे विशेष

मला स्पष्ट आठवत आहे डॉ. दातार काकांचे सरकारी क्वार्टर. ती क्वार्टर्सलाल अस्पतालतेएलोरा टॉकीजच्यादरम्यान दोन्ही बाजूस होती. त्यांच्या राहत्या क्वार्टर मधे सातही मित्र सहकुटुंब सहपरिवार जमले होतो. पुरूषांनी दोन मोठाली पातेली भरून रस पिळला होता आणि आम्हा मुलांना सालीकोयी चोखायला बसवले होते. दरम्यान त्या सातही मित्रांची भरपूर थट्टामस्करी सुरू होती नि स्त्रीवर्ग तोंडाला पदर लावून त्या थट्टामस्करीचा आनंद लुटत होता


अशीच एक डाळबाटी पार्टीराऊयेथील मिनी-बंगल्यात झालेली स्मरते. राऊ रेल्वेस्टेशन नजीक रेल्वे ट्रॅकला लागून या सात पैकीं पाच जणांनी दोन दोन हजार रूपयांत एकसारख्या अशा पाच मिनी-बंगल्या बांधून घेतल्या होत्या आणि दर दोन बंगलीं दरम्यान एकेक विहीर देखील. तिथे राहायला कोणी गेल्याचे माहीत नाही पण तिथे सर्व मित्रपरिवाराने रंगवलेली दाल-बाफले-बाटी पार्टी चांगलीच आठवतेंय. रणरणीत उन्हात बाहेर पेटवलेली कंड्यांची झगरी, त्यांत अडीच तीन तास खरपूस भाजलेल्या बाट्या आणि तिखटजाळदालकधीच विसरणे शक्य नाही

पुढे कित्येक वर्षें ट्रेनने जातायेतां ती पाच टुमदार घरें पाहतांना जीव नकळत व्याकूळ होई

रहाळकर

१० मे २०२३



This page is powered by Blogger. Isn't yours?