Sunday, April 23, 2017

 

निगूढ मन

निगूढ मन
मन या शब्दावरच इतके शब्द लिहिले-बोलले गेले आहेत की त्यांत आणखी काही शब्दांची भर पडली तर फारसे बिघडणार नाही ! संत, कवी, तत्वज्ञ, तर्कट, तसेच मनोवैज्ञानिकांची समस्त कुळी या मनाचा शोध घ्यायला सरसावली; मात्र स्पष्टपणे  कुणालाच याचा थांगपत्ता लागला असावा असे वाटत नाही. तसे झाले असते तर माणसाचे जिणे अवघड होऊन बसले असते कारण इतरांच्या मनाचा मागोवा सहजपणे घेतां आला असता आणि कोणाचीच ‘गुपितें’ गुप्त राहिली नसती; खरें तर आयुष्याला फारसा अर्थही राहिला नसता !
चिंता, भय, हुरहूर हे केवळ मनाचेच उपद्व्याप आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्भवणारे बहुतांश आजार ‘मना’कडे अंगुलीनिर्देश करतात.
तर मग, हे “मन” म्हणजे नक्की काय आहे ? कुणी म्हणतात, ‘ It’s a bundle of thoughts and desires’! -विचारांचे भेंडोळे, वासनांचा गुंताडा !! “गीता” म्हणते - सहावें इन्द्रिय - अदृष्य, पण ‘असलेलं’!
म्हणजे, त्याचे अस्तित्व आहे तर . मग तें कसे असतं; कुठे असतं?  काय करतं नि कसं निर्माण होतं आणि कसं नष्ट होतं .....? ते सरळ राहूं शकतं की त्याला वाकवितां येते ? निदान वळवतां तर नक्कीच येत असेल नाही ? ते कसं फोफावतं नि कसं ऊन्मळून पडतं ? त्याला आटोक्यात ठेवतां येते का ? (आणि तें जर इन्द्रिय असेल तर त्याचे आरोपण  -‘ट्रान्स्प्लॅंट’ करता येईल काय ?!!!) (एका परीने तें अदृष्य असतं हे बरेच आहे म्हणा, कारण या ‘हाय-फाय’ टेक्नॉलॉजीच्या युगात कधीच एकाचे काढून दुसऱ्यावर ‘फिट्’ करून टाकले असते! तसे पाहूं गेल्यास  हवा, वीज नि इंटरनेटसुध्दा  अदृष्यच असतात की !! असो !!! )

आधीं पाहूंया या मनाच्या जडणघडणीचे शास्त्र ! स्वामी दृष्टान्त देतात कापडी वस्त्राचा. एकएक उभा-आडवा धागा विणून बनविलेले वस्त्र, एकेक धागा विस्कटून टाकल्यावर वस्त्र शिल्लकच राहात नाही ; अगदी तस्संच मन विणलं गेलंय एकेका विचाराचे, वासनांचे, इच्छा नि आकांक्षांचे. एकेक करून त्या काढून टाकल्या तर थियरॉटिकली मन संपविणे शक्य व्हावं. पण खरंच तें शक्य आहे कां ? कारण ही वीण वारंवार झालेल्या संस्कारांमुळे, आघातांमुळे आणि काळाच्या हातोड्यांमुळे इतकी घट्ट, चिवट झालेली असते की तिला उकलणे किंवा विस्कटणं अशक्यप्राय व्हावं ! पिळावर पीळ बसून भक्कम झालेल्या मनाला अधिक पीळ बसूंच शकत नाहीत ; तें निर्ढावतं , नि म्हणून मराठीतला वाक्प्रचार - ‘त्याच्या मनाला काही पीळ पडला नाही’!

मात्र या मनाचं एक बरं असतं - त्याला गोडी लागली तर ते सोकावतं ! ( कां जे यया मनाचें एक निकें । जे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजें ।। ( ज्ञा. ६/४२०) .
म्हणूनच मनाच्या घडणीला महत्व . आदर्श अशी उत्तम संस्कारांची, उत्तम विचारांची जडणघडण लाभली तर ते महद्भाग्यच. आपल्या धर्मशास्त्रांप्रमाणे पुनर्जन्म गृहीत धरून सुसंस्कारांचं, सद्वासनांचं गाठोडं घेऊन पुढील जन्म “शुचीनां श्रीमंतां गेहे......” या उक्तीप्रमाणे सम्पन्न करणे शक्य आहे ; पण आत्तां या जन्माचे काय ? आत्तां तरी मला याच मनाबरोबर जगणे क्रमप्राप्त, नव्हे अनिवार्य आहे ! आणि म्हणूनच केवळ जिज्ञासा म्हणून नव्हे तर गरज म्हणून थोडं अधिक ‘गंभीरपणे’ या प्रकर्णाकडे पाहिलं पाहिजे.

या मनाबद्दल देवांनी, संतांनी, सत्पुरूषांनी काय थोडं सांगून लिहून ठेवलंय ? ‘मनाचें श्लोक’, ‘मनोबोध’, ‘मन:शांती’, ‘मनोनिग्रह’ नि ‘मनोविकार’सुध्दा !
बरं, हे मन तरी प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असलेले असेल काय ? बहुधा नाही . कारण जगांतील इतर कित्येक मनांबरोबर जोडलेले, निगडीत, ‘लिंक्ड’ ; त्या एकाच अतिविशाल विश्वमनाचा एक अंश!

मनाचें तीन घटक (components) वर्णन करता येतील ; त्रिगुणात्मक – सत्व, रज नि तम.
सत्व-गुणांत स्थैर्य, दया, क्षमा, शांती इत्यादींचा समावेश ;
रजो-गुणांत चांचल्य, धडपड, क्रोध, मोह इत्यादींचे प्राबल्य ;
तर तमो-गुणी सहसा त्रासदायक, स्वत:चे नि इतरांचे अहितच करणारा !
तीन स्तर – (levels) – जागृत, अर्धजागृत आणि अतिजागृत (conscious, sub-conscious and super-conscious ) .
चार कार्यें – संशय, निश्चय, स्मरण आणि अहंभाव !
पाच अवस्था – (१) क्षिप्र – सगळीकडे विखुरलेली,
(२) मूढ – भ्रष्टाचारी ; (३) विक्षिप्त ; (४) एकाग्र – अखंड तैलधारावत् आणि (५) निरूध्द (प्रतीकात्मक) !

मनाचें स्वरूप ? – सूक्ष्म देहाचं बनलेलं – गतिमान, शक्तीशाली.
खरं तर स्थूल आणि सूक्ष्म देहांमध्ये केवळ स्पंदनांचा फरक. Matter and Energy are in different ‘forms’, but are ‘inter-changeable’.
मनाच्या घडणीवर ‘अन्ना’चा विलक्षण प्रभाव सांगितला गेला आहे. जसं अन्न तसे मन. अन्न किंवा आहार म्हणजे केवळ तोंडावाटें पोटांत जाणारे नसून कान, डोळे, नाकाद्वारे शरीराने घेतलेला आहारदेखील ! म्हटलंच आहे –‘नजर चंचल, मन चंचल ; नजर स्थिर, मन स्थिर’! मनाला वासनेचा मसाला लावल्याशिवाय मन कोणत्याही गोष्टीच्या आहारीं जाऊं देत नाही. नजर बिघडली तर मन बिघडतं आणि अस्थिर मन एकाग्र होऊं शकत नाही !

मन इतकं चंचल, की त्याला माकडाची उपमा दिली -Monkey mind ! आणि सळसळणाऱ्या नागिणीचीसुध्दां . ‘विषयांचं मद्य, विषयाचा डंख, नागमोडी चाल, दोन विखारी दात- “मी नि माझं” ! तरीपण मन नागाप्रमाणे “नादा” बरोबर डोलतं – ओंकारनाद, नामस्मरण!!
 मग अशा मनावर अंकुश ठेवतां येईल ? मनोनिग्रह शक्य आहे? होय ; भगवन्त म्हणतात, “अभ्यासानं – वैराग्यानें”!
आणि मनोलय, मनोनाश, मन जाळणे ? – केवळ ज्ञानाग्नीतच!! (तुम्हांआम्हाला सोपं नाही !)
मग मनाला थोपवतां येईल -ब्रेक लावतां येईल ? निदान वळवतां तर येईल ? नक्कीच ! मनाला वर्तुळाकार वळवीत राहिलं तर त्याचा वेग मंदावेल आणि हळूहळू तें स्थिर करतां येईल.
आपल्या अनावर इच्छा-वासनांना हळूहळू आवर घालता आला तर? अन्न, पैसा, वेळ, शक्ती यांचा दुरूपयोग टाळायला शिकलो तर या अमूल्य बाबींची बचत तर होइलच नि मनाला तसे वळण लागेल. आणि या गोष्टींचा अति आणि अनिर्बंध वापर म्हणजे एकाप्रकारें हिंसा नव्हे काय ? कारण यापैकी प्रत्येक गोष्टीचा गैरवापर होत असतांना आपण वंचितांवर अन्याय करीत आहोत ही भावना अशा प्रकारच्या अपरोक्ष हिंसेपासून आपल्याला रोखूं शकते !

ज्ञानाचा नित्य वैरी म्हणजे इच्छा-आकांक्षा-वासना. म्हणून वासनांवर नियंत्रण आवश्यक. वासनांना रोखा, नियंत्रित करा, बंधन घाला, सुसूत्र करा, शुध्द करा – हा आहे दिव्य संदेश !
एकाग्रतेसाठी दोन बंध महत्त्वाचे – शिस्त व संयम. ध्यान म्हणजे चिंतन नव्हे – तर दोन विचारामधील गॅप किंवा अंतर – निर्विचार असणे !
मौनसाधना मनाला भरकटण्यापासून थोपवून शकते. म्हणूनच नि:शब्द, प्रशांत वातावरणात मनाचेंही व्यापार स्थिरावतात. मौनाला आध्यात्मिक साधनेत प्रचंड महत्व आहे.
‘एकान्त’ अतिशय पोषक आहे मन स्थिर करायला. स्फुर्ती-प्रतिभेसाठी एकान्त आणि अभिव्यक्तीसाठी लोकान्त – हे सूत्र आहे. समर्थ रामदास म्हणत, ‘जयाला एकान्त मानवला, सर्वकाही सुचे त्याला’. तुकाराम महाराज साधकांना उपदेश करतात, ‘बैसोनी निवान्त शुध्द करी चित्त, तया सुखा अन्त पार नाही’’
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या सुंदर इंग्लिश शैलीत सांगतात, ‘Solitude of the soul is the birthplace of religion’!
जेव्हा मनाच्या साऱ्या शक्ती एकाच विषयावर केन्द्रित करणे आवश्यक असते, तेव्हा एकान्ताशी नातें जोडावेच लागते. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘शहरांतील माणसे सतत गर्दीत वावरत असतात ; त्यांच्या चित्त्ताची व्यग्रता वाढते ; तीं बहिर्मुख होतात ; त्यांना दिसेल ते पाहायला आवडूं लागते, मिळेल ते खाणे आवडूं लागते. आपल्या मनांत काय चालले आहे ते अभ्यासणे अवघड वाटते ; आपल्या मनोदेवतेची हाक त्यांना ऐकता येत नाही. थांबण्यापेक्षा धांवणे व पोहोचण्यापेक्षा परत फिरणे आवडूं लागते. कशाची तरी हाव नि त्यापायी धावाधाव असे जीवनाचे रूप होते.’

खेड्यापाड्यांत एकप्रकारचा सुखद एकान्त लाभतो ; रानामळ्यात निसर्गसहवास लाभतो. या सहलींत एकप्रकारचा गतिमान एकान्त मिळतो ; चालताचालतां वाट सोडतां येते, बाजूला होता येते, पुन्हा वाट वहिवाट होते! आकाशांत पक्षी भरारी घेतात. त्यांना दिशा असते पण वाट नसते. थव्याथव्याने आपले अस्तित्व न विसरतां परस्परांचें सहचर होतात, सहभागी होतात. माणसांनाच हे जमले पाहिजे. सतारीची प्रत्येक तार आपला स्वर आपल्याच ठायी ठेवून योग्य त्या क्षणी स्वरसंभारात तो समर्पित करते. माणसांनी आपले व्यक्तिमत्व जपावे, जोपासावे, पूर्णत्वाला न्यावे. जेव्हा सामाजिक संदर्भात गरज निर्माण होईल तेव्हां सर्वस्वानिशी त्या कोंदणांत प्रगट व्हावे. गरजेशिवाय गर्दींत घोटाळत राहणे, एखाद्या कोंडाळ्यात अडकून पडणे किंवा एखाद्या जल्लोशांत भान हरवून बसणे – ही समाजशीलता नव्हे. पंचतारांकित जीवनाकडे पाठ फिरवणे व धृवताऱ्यावर नजर ठेवून जीवनयात्रा पुरी करणे – हा स्वधर्म झाला पाहिजे. या धर्मपालनामुळे लाभणारी सिध्दी ही समाजसेवेसाठी उपयोगात आणली पाहिजे.
रामकृष्ण परमहंस म्हणत, ‘मन मुख एक करो’. म्हणजे योग्य कळतं, पण आचरणांत येत नाही – अयोग्य कळतं पण केल्याशिवाय राहवत नाही ! किंवा, व्यभिचार स्वत:शीच – जो सोचते हैं वह करते नही, लेकिन करते हैं बिना सोचे !!

स्वामी म्हणत, मनाला योग्य वळण लावण्यासाठी – ‘या क्षणींचा मोह टाळा ; आत्तां नाही – postpone ! वर्तमानात जगा. साक्षीपणाने बघा. उच्च विचारांचे चिंतन करा – विचार अतिशय महत्त्वाचे, शब्द नाही. आचारसिध्द विचार, कृतिप्रधान विचार खरा विचार !

‘मन’ या विषयावर लिहायला बसलो खरा, पण जसजसे विचार डोक्यात गर्दी करूं लागतात तसतसे माणसांच्या आचारविचारांवर , म्हणजेच परिणामी कृतीवर गाडी घसरतेच. कारण मनाच्या प्रेरणेशिवाय कृती घडणे अशक्यच.
कवीचे मन प्रतिभेच्या स्वरूपात उत्तुंग भराऱ्या घेते आणि कित्येकदां ‘जो न देखे रवि – वो देखे कवी’ ही उक्ती सार्थ करते.
चिंता करताना तेच मन वैरीही चिंतणार नाही अशा कल्पना करते. अतिशय चिवट, चिकट म्हणून मन वढाळ वढाळ म्हटलं जातं, नि तेच पाखरासारखं भिरभिरायलाही लागतं !
परमेश्वर म्हणतो, ‘मला पाहायचं असेल तर समाजांत शिरा आणि स्वत:ला पाहायचं असेल तर एकान्तांत बसून स्वत:ला न्याहाळा ! म्हणजे साक्षी बनून आपल्या मनाचें सर्व उपद्व्याप शांतचित्त होऊन पहा !
हें मन आपल्या अहंगंडाला, न्यूनगंडाला, अभिमान, मत्सर, तिरस्कार, क्रोध आणि निराशेला कारणीभूत नि तेंच आनंद, समाधान, संतोष, शांती आणि ऋजुता यांचेही माहेरघर. समाजांत आचरण करताना हे मनच – ‘सुखी लोकांशी मैत्री, दु:खितांविषयीं करूणा निर्माण  करते , पुण्यवानांबरोबर आनंदी असते नि पापी लोकांची उपेक्षा घडवून आणते’ !!

शेवटीं एकच विद्या महत्वाची – मनावर नियंत्रण ठेवण्याची ! जसं मन तसाच माणूस ; मन ठिकाणावर तरच समस्त मानव जातीचं अस्तित्व ; ते बिघडलं तर बाकी सर्व शून्य !!
मनावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व उपाय खरे तर तात्पुरते असतात, या विधानावर दुमत असणे शक्य आहे, मात्र अनुभवून पाहाण्यासारखा एक प्रकार म्हणजे आपले मन, बुध्दी ईश्वरचरणीं, सद्गुरूचरणीं किंवा आपल्या उपास्याप्रत वाहून टाकणे. याचा अर्थ निष्क्रिय होणे नव्हे, तर सर्व विहित कर्में करीत राहून फळाची अपेक्षा न करता उपेक्षा करणे, निराश न होतां निराशी होणे !
असे काही अनुभव मनाला गोड लागतात, मन सोकावते पुन:पुन्हा तसा अनुभव घेण्यासाठी; कारण सद्गुरूचरण उपासता उपासतां मन शिल्लकच राहात नाही आपल्या माकडचेष्टा करायला ! (म्हणौनि हें अनुभवसुखचि कौतुकें / दावीत जाइजे // - ज्ञानेश्वर महाराज)

इति शम् !
प्र. शं. रहाळकर
पुणे २३ एप्रिल २०१७


Sunday, April 02, 2017

 

A Cool Pilgrimage 

A Cool Pilgrimage 

We had a cool, satisfying and extremely rewarding pilgrimage into Konkan during this week. In fact, entire Maharashtra is being literally roasted for the last couple of weeks, temperatures shooting past forties.
We were advised not to undertake this journey in view of extremely hot weather. However, my young and energetic Mama (just eighty-six years in age !) arranged a seven-seater brand new car with owner himself as Chauffeur and six of us ‘elderly’ citizens embarked on our ‘adventure’ one fine (sic. Hot and humid) morning. 

The drive was indeed comfortable, quite cool and cozy within the car. We reached our destination well in time, much before sunset. Paavas near Ratnagiri happens to be located just in the heart of Konkan. It’s indeed beautiful, tranquil, rich in flora and fauna and most importantly inhabited by simple, pious, hard working village folk. Moreover, it has been the very abode of a great enlightened Saint, Swami Swaroopananda. 
An active freedom-fighter during his youth, Swamiji spent over forty years confined in a small room practicing Yoga and ‘So-ham sadhana’. He wrote scores of books on spirituality, Dnyaneshwari and Amrutanubhava in particular, which he translated into simple lyrical Marathi. 
A very sacred and pious ambience fills entire environs of the region. Entire milieu cannot be adequately described in words; it is indeed a divine experience everyone visiting the place would wish to undergo oftener. Swamiji passed away during the eighties and his followers erected a grand Samadhi Mandir where his mortal remains were put to rest. 
Oh ! I have  yet to see such a beautiful, tranquil, spiritually charged place (of course apart from Prasanthi Nilayam !) that cools, drenches and invigorates ones’ very being ! Although I have visited this place more than a dozen times, visiting yet again and still again remains on my wish list ! 
Well, what really pulls me to that ambience ? Is it only the scenic beauty, cool tranquil aura of the place ? Yes of course, something much more nevertheless. I feel engrossed, literally one with the entire landscape. Although visiting this place as a tourist with all sorts of likes and dislikes, it turns out to be a holy pilgrimage in retrospect. My own Sadguru was initiated here into ‘So-ham Sadhana’ by Swamiji, which perhaps makes it all the more nearer to my heart. Besides, it was Swamiji’s “Abhanga-Dnyaneshwari”that was reproduced into English by this humble servant.

Whatever the reason, I feel blessed while gingerly spending every moment here undoubtedly. The Samadhi Mandir precincts are heavily surrounded by umpteen variety of flower bushes such as Jai-Jui, Mogaraa, roses, Kailaspati, Sonchapha and so on. There is also a pond full of Lotuses with different hue and colour. Therefore entire atmosphere is pleasant and mildly fragrant, without need to burn artificial incense sticks or the likes ! 
Entire portico is made of white granite adorned by marble statues of eminent personalities belonging to the Naath Sect. There are huge portraits of distinguished Saints and Sages. Entire campus is spic and span, clean and pleasant. Sanctum Santorum of the Mandir houses bewitching sculptors of Vitthal Rakhumai just behind the nicely decorated slab adorning bust of Swamiji. 

Swami Swaroopananda was a man with few spoken words and therefore there used to be a peculiar practice prevailing during those days. The visitor would be asked to open any book kept there and browse any page he or she would like to and on most occasions the visitor would get clarifications of his unspoken doubts, queries or worries ! There was no need to ‘ask’ for Swamiji’s counsel or guidance as such !! (We are welcome to browse through any book kept in the hall and most earnest seekers do find solutions on the spot ; however, one needs to be earnest and inquisitive enough !!) 

There is no limit to this entire narration. Suffice it to say that we enjoyed this supremely cool, pleasant, invigorating excursion in spite of inclement weather conditions. 

We also visited Ganapati Pule and passed through our ancestral village “ Nevre” en route. More of it later. 

Dr. P. S. Rahalkar
Pune.      1st April 2017 


This page is powered by Blogger. Isn't yours?