Monday, October 30, 2017

 
Friends,

These are some stray thoughts and I sincerely wish and hope that you will very graciously give it some concrete shape by offering your candid comments, suggestions and even criticism if deemed fit to.

In fact, this is a global problem, which is particularly evident in India. Let me spell out the problem straightaway. You see, there are larger numbers of old, decrepit people who are literally waiting and praying for ‘Death’. No Nation on the planet has yet been able to ‘Legislate’ ‘Voluntary Death’ and ‘Mercy-killing’. Overall longevity of the elderly is certainly on the rise, may be due to various palliative measures along with some cures as well, which is most commendable.

However, there are still large numbers who are beyond recovery, in fact ‘incurables’. Both the elderly as well as his/her close relatives literally get ‘fed-up’ with the pitiable condition of the elderly sick. In a very big majority of the cases in India, close relatives try to do their best to keep the elderly and the sick in particular, as much comfortable as possible. However, more often than not they are frustrated, tired and ultimately tend to lose patience while looking after them at home.

In such cases there is just no alternative but to get the elderly sick ‘admitted’ in a hospital. 
Now, the ‘hospital’ must play its role to come to a ‘diagnosis’ by ordering various types of ‘Investigations’, ‘Expert’s opinions and so on, which are expensive, cumbersome and truly speaking useless in most of the cases. They must keep poking, pricking and ‘exploring’ the admitted ‘patient’; moreover, they must ‘administer’ treatment as well, otherwise there is no point in admitting a ‘case’!

I am a Medical man and therefore can understand the ‘ethics’ behind the entire paraphernalia’; however, I fail to understand the ‘rationale’. Why can we not accept the fact, that we can never avoid the inevitable, that is, Death? Why should we not allow such cases just to ‘die’ comfortably and peacefully, rather than ‘torturing’ them to death? 

I am aware that the Constitution and Law does not permit to do so. Therefore, there is need to consider and find out some via-media, whereby the Law is not broken and the ‘case’ dies peacefully and comfortably. I wish to offer a solution that is likely to be practical.

There can be centre or centers in every town meant to cater to the Terminally Sick, the ‘Terminal Care Centers’. 

1). Such a centre could be located in the hospital itself, where there is provision of just Nursing care, appropriate diet and calm, tranquil atmosphere. No ‘active’, ‘aggressive’ or ‘invasive’ treatment is advised or carried out. At the most, adequate pain-relievers or sedation may be used. 
   Such cases should be ‘selected’ by a qualified medical person before transferring to the Terminal Care Unit and very naturally he would certify death when the inevitable happens ultimately.

2). Philanthropic persons or organizations after duly honoring provisions of the Nursing Home Act can run such centers.
Those could be in the form of ‘old-age homes’ with entire amenities for food, shelter and entertainment with added Nursing care under Medical supervision but without any ‘active’ treatment as mentioned above. 

(I am aware that I am looking ‘confused’ at this stage! In fact, that is the exact reason for seeking your counsel, comments, words of caution etc. Let there be a debate at various levels, so that we can find some solution to the confronting problem!!)

With warm regards,

Dr.P.S.Rahalkar
10 February 2010.



 

स्मृतिगंध

स्मृतिगंध
आता ऐंशीचे वेध हळूहळू लागूं लागलेत् नि दररोज वार्तालाप करणाऱ्या काही सुहृदांचा आग्रह आहे की मी माझे आत्मचरित्र लिहायला घ्यावे. थांबा, मी तसे करणार नाही कारण अनेक प्रसंगीं ते लिहून बोलून झाले आहे. म्हणून पुन्हा त्याच गोष्टी नि प्रसंग तुम्हाला अजिबात सांगणार नाही.
माझे एक ज्येष्ठ स्नेही आज म्हणाले की डॉक्टर तुम्ही चिंतन-मननांत जरा कमी वेळ घालवतां, बाह्य जगाचा विचार किंवा लिखाण तुमच्याकडून भरपूर प्रमाणांत दिसत असले तरीही.
खरं तर माझा पिंड तसा नाही. मी आत्म-चिंतन वगैरे फारसे करूच शकत नाही; मी आहे एक “उचल्या”, बाहेरचे काहीही उचलणारा अर्थात् थोडे तारतम्य बाळगून !
चिंतन मनन वगैरे घडलेच तर गतकाळाच्या आठवणींतच मी रमून जातो. भविष्याचा विचार फारसा नसतो नि सांप्रतचा काळ तर जगतोच आहे इतर सगळ्यांसारखा !
बरं, इहलोक-परलोक वगैरेंचा विचार करण्याइतपत मी गंभीर प्रकृतीचा नाही किंवा प्रबुध्द देखील नाही ! म्हणजे तेही ‘चिंतन’ बारगळले कीं !
मी आहे स्वच्छंद, भिरभिरणारा (भरकटलेला मात्र नव्हे !) जीवन्मुक्त जीव ! (??) म्हणूनच आज आस्वाद घेणार आहे माझ्या स्मृतिगंधाचा. यू टू आर वेलकम !
हाऊएव्हर,
“अवधानरूपी मिळे जरी खाजें (खाऊ) । वक्तृत्व (सांगणे) पुष्ट होय ॥
आणि वक्तृत्वाचिया अक्षरांसी दोंदें (बहर) । सुटती स्वच्छंदें प्रमेयांची (भावार्थ) ॥ ………….ज्ञानेश्वरी !!!

नाही नाही, मला काहीही अवघड सांगायचे नाहीये. जरा ओंवी आठवली एवढेच !
त्या निमित्ताने अचानक आठवतात श्री प्र. गो. घाटे नि त्यांची वक्तृत्व शैली, अक्षरश: मंत्रमुग्ध करणारी. मग ते शारदोत्सवात केलेले व्याख्यान असो, त्यांनी संचालन केलेला परिसंवाद किंवा अतिशय रसाळ ज्ञानेश्वरीचे निरूपण. मग आठवतात कविवर्य अनिल, मंगेश पाडगावकर नि तत्सम कविश्रेष्ठ ज्यांनी माझे भावविश्व मोहरून काढले होते. राजा रविवर्म्याची नि मुळगावकरांच्या अप्रतिम चित्रकृती आणि खूप उशीरा पाहता आलेली यूरोपमधली मायकेलएन्जेलो नि लिओनार्डो डा व्हिन्सीची ‘डेव्हिड’ सारखी पाषाण शिल्पें. ल्युस्सर्न मधले ‘लॉयन् मॉन्युमेंट’ मला कधीच विसरतां येणार नाही. सागर-दर्शन तसे अनेक वेळा घडलें आहे पण कॉर्नवॉलचा जायगॅन्टिक ॲटलांटिक पाहून डोळ्यांचे पारणें तर फिटलेच पण आपली दृष्टी किती विशाल होऊं शकते याची झलक अनुभवतां आली.

आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगसाठी आलेल्या विंदा करंदीकरांनी ‘कवी’ ची अतिशय सुलभ व्याख्या केली होती. ‘ज्याला कविता कळते तो कवी ‘! (तेव्हापासून मी स्वत:ला कवी समजूं लागलों). मी कल्पनेतून एका वेगळ्याच विश्वांत सहज विहार करू शकतो. (पण त्यालाही ‘चिंतन’ वगैरे म्हणतां येणार नाही, कारण तें विश्व क्षणार्धात बदलते नि हाती निखळ आनंदाशिवाय काहीच ‘मौलिक’ वगैरे शिल्लक राहात नाही !

मी हाडाचा ‘खवैया’ आहे (सगळेच असतात, थोडे मान्य करतात) म्हणूनच मला जवळ जवळ प्रत्येक व्यंजनाने भरभरून समाधान दिलेले आहे. मला झोप देखील अत्यंत प्रिय आहे. म्हणून माझी एकच विनवणी त्या जगन्नियंत्यापाशी – माझी भूक नि झोप कायम जागृत राहू देत – असो.
स्मृतिगंधाच्या निमित्ताने आत्मस्तुती होणार हे ओघाने आलेच. तथापि, मला विलक्षण आनंद, समाधान आणि जगण्याची ऊर्मी नि ऊर्जा देणारी अशी काही मंडळी पाहतां ऐकतां आली की ज्यांमुळे मी कृतकृत्य झालो. माझे दोन्ही पितामह, आई-वडील, भावंडें, पत्नी, मुलें, नातवंडे, मित्र, सुहृद, हितचिंतक (आणि माझा असंख्य वाचकवर्ग !) हीं सर्व तर आहेतच पण माझे सद्गुरू, माझ्या वडिलांचे सद्गुरू, प्रत्यक्ष भगवन्त श्री सत्यसाई इत्यादि सर्व सत्पुरूषांचा माझ्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे हे मला कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच पाहिजे.

स्मृतिगंध आठवतांना या सर्वांचें विस्मरण होणे कसे शक्य आहे ?

प्र. शं. रहाळकर
पुणे
३० । १० । २०१७






Sunday, October 29, 2017

 

आरोग्य धाम (खंड तिसरा)

आरोग्य धाम (खंड तिसरा)
त्या वृध्देच्या एकंदर दुखण्यांचा डाक्टरांनी मनातल्या मनांत आढावा घेतला. म्हातारपणा शिवाय तिला संधिवात नि अपचनाच्याही तक्रारी आहेत. मोडलेला पाय तर एक निमित्त आहे. खरंतर आता ती मरायला मोकळी आहे, पण तिला नाही मरायचंय एव्हढ्यांत. जगात कदाचित् अशी एकही व्यक्ती नसेल जी मृत्यूला शांतपणे सामोरे जाईल !
बिचारी अज्ञान नि मुलगा, सून, नातवंडं, इतकेच नाही तर घरदाराच्या मोहात पूर्णपणे गुंतून पडलीय्. पण तिला जावेच लागणार आहे, प्राप्त परिस्थितीत तेच श्रेयस्कर ठरेल.

त्यांची शरीरयष्टी मजबूत आहे नि शरीराचा भार पावलागणिक सहज लक्षात येणारा. शेजारच्या घरांवरून ते चालत असतांना लोक सहज ओळखतात महाशयांना त्यांच्या  विशिष्ट चालण्यामुळे ! हलक्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखल झालाय् नि निसरडे पण. त्यांना डोळ्यात तेल घालून प्रत्येक पाऊल टाकणे भाग आहे. त्रासदायक आहे असे चालणे, पण त्याला इलाज नाही. घसरून पडले तर पाय मोडल्याशिवाय राहणार नाही. किती विचित्र आहे नाही, जेव्हा लोक धरणीला ‘सस्य-श्यामला’, मृदु, धरणीमाता वगैरे नावांनी संबोधतात, पण एकदा घसरून पडल्यावर कळते ती कितपत ‘मृदु’ वगैरे असते ते !! अन् या विचाराने त्यांना हसूं फुटले !
चालता चालतां ते थबकले. रस्त्याच्या कडेला सांचलेले पाणी दोन मुलें एकमेकांवर उडवण्यात रंगून गेली होती. पण महाशयांना पाहतांच त्यांनी स्वत:ला आवरले ; या भागांत जीवन महाशयांचा सगळेच आदर करीत.
‘बाळांनो, तुम्ही हे काय करताय ?’ त्यांनी विचारले.
‘आम्ही मासे धरतोय् ! पहा ना किती मोठाले आहेत इथे !! ‘
‘तूं मदन घोष चा मुलगा ना रे ?’
‘होय् , मी मदनाचा मुलगा बदना, !’
‘असं का ! आपल्या वडिलांचा उल्लेख करायची ही काय रीत झाली ? मूर्ख मुलगा ! तूं म्हटलं पाहिजेस ,” मी आहे बदन लाल घोष, आणि माझ्या वडिलांचे नांव आहे श्री मदनलाल घोष “. कळलं का आतां ?
जरासे लाजत बदनाने मान डोलावली .
‘आणि हा दुसरा मुलगा कोण? ‘ डाक्टरांनी विचारले. त्यांना हा देखणा मुलगा पाहुणा वाटला. तो नाही, पण बदन त्याच्याऐवजी बोलला.
‘तो त्याच्या आजोळीं आलाय, सरकार यांच्या घरी. ‘
‘ओह समजलो ! म्हणजे तू अतसी चा मुलगा आहेस तर ! म्हणजेच अतीन्द्र सरकार चा नातू . ‘
त्या मुलाने दोनदा मान डोलावून म्हटले, ‘होय साहेब’!
‘घरीं जा बाळांनो, नाहीतर तुम्हाला सर्दी होईल. ताप नि डोकेदुखी नकोय ना तुम्हाला ?’
‘मग तुम्ही का बाहेर पडलांत भर पावसात ?’ बदनाने विचारले.
डाक्टर जोरात हसले. ‘मी डाक्टर आहे खट्याळा ! ताप माझ्याजवळ फिरकू शकत नाही. पळा आता किंवा माझ्याबरोबर चला वाटल्यास. त्यांना ही सोबत मजेशीर वाटली.
आपल्या समाधाना खातर ते मुलांबरोबर चालूं लागले . सिताबला यायला वेळ लागला तर या मुलांशी बोलण्यात वेळ चांगला जाईल. ते बोलत राहिले, ‘ तुम्हाला माहीत आहे का, आम्ही डाक्टर मंडळी तुम्हाला कैऱ्या वगैरे खाऊ देत नाही, खूप आंबट असल्याने आजारी पडाल म्हणून . मात्र आम्ही त्या खातोच !!’
त्यांचा मित्र सिताब मुखर्जी आधीच आरोग्य धाम मधे येऊन बसला होता.
‘कुठे होतास इतका वेळ ? नन्द किंवा इन्दीर पण दिसले नाहीत.’
डाक्टरांनी मुलांना जायला सांगितले आणि मग त्यांनी बाहेर जायचे प्रयोजन सांगितले. ‘मोतीच्या आईला ‘बोलावणे’ आलंय्. एक मिनिट थांब, मी आत जाऊन चहा करायला सांगतो. तोंवर तू ही चिलीम पेटवून ठेवतोस का ? इन्दीर बहुधा बाहेर गेला असावा.’
जेवणानंतर एक नोकर गुडगुडी भरून ठेवत असे आणि मग सिताब बरोबर खूप उशीरा संध्याकाळपर्यंत बुध्दिबळाचा डाव ते मांडत. खूप वर्षांपासून बुध्दिबळाची गोडी दोघांना लागली होती आणि तारूण्यांतला उत्साह आता कमी झाला असला तरी ते डाव अवश्य मांडीत.

गुडगुडी भरून चहाचे फर्मान सोडतांच ते खेळायला सुरूवात करीत आणि आत्तां तर ते गढून गेलेत् त्यांत. खेळीत रंग भरेल आतां कारण महाशयांनी सिताब ची राणी काबीज केलीय्. बाहेर पावसाचा जोर वाढलाय् नि आभाळ चांगलेच भरून आलंय्. बहुतेक पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत ही.
अंमळ स्तब्धतेनंतर सिताबने अचानक घरांत जाऊंया म्हणून सुचवले. ‘मला थंडी वाजतेय् जीवन ‘ तो उद्गारला.
‘थंडी ? मला तर इथे खूप प्रसन्न वाटतंय् ‘
‘तुला तसे वाटतंय् ते तुझ्या भरपूर चरबीमुळें ! शिवाय, मला बरं पण नाहीये. ‘
‘काही बोलूं नकोस ! मला तुझी नाडी पाहूं दे .’
‘आभार ! पण नको !! मलासुध्दा कळते नाडीपरिक्षा. जरासा ताप आला आहे एवढेच. काहीही गंभीर नाही. चल, आत जाऊं. ‘ सिताबने आपला हात मागे घेतला.
डाक्टर असे हरणार नाहीत. त्यांनी पुन्हा हात हातांत घेतला. चांगलाच तापलाय् सिताब. त्यांनी नाडी पहायचा प्रयत्न केला पण सिताबने हिस्सा देऊन सोडवणूक करून घेतली.
‘जीवन, जाऊं दे मला.’
‘मूर्खपणा करू नकोस, नाडी पाहू दे मला. ‘
‘नाही, कदापि नाही ! ‘ सिताब ओरडला.
त्याचे असे वागणे जरा विचित्रच आहे.
‘जाऊ दे मला, जाऊ दे मला ‘ असे म्हणत सिताब उठून चालायला लागला, आपला कंदील उचलत न पेटवताच.
‘तुझी छत्री राहिलीय् सिताब ‘, डॉक्टरांनी साद घातली. सिताब परतला, छत्री घेतली आणि कंदील पेटवून तो परत बाहेर पडला भर पावसात. ‘तू तुझीच नाडी पाहात बस इतरांच्या ऐवजीं, ते कधी मरणार हे सांगत. स्वतःच बघ तू किती दिवस जगणार आहेस ते ! ‘

अशा प्रकारचे कटाक्ष ते नेहमीच ऐकत आलेत म्हणून त्यांनी तो भडिमार मुकाट्याने ऐकून घेतला.
उद्या ते सिताबकडे जातील ; तोसुध्दां मनांत किंतू न बाळगता त्यांचें स्वागतच करील नि वर दिलगिरी दर्शक म्हणेल, ‘मी तुमच्याकडेच येणार होतो ‘!
घरात जाताजातां त्यांच्या मनांत विचार आला की त्याचे असे वागणे कदाचित् जास्त तापामुळे असावे. त्याची नाडी तपासली असती तर बरे झाले असते. आत्तांच जाऊं का सिताबच्या घरी ? पण नकोच. तो खरंच खूप आजारी असला तर अधिकच हेकटपणा करेल आणि तपासूं पण देणार नाही.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांनुसार अशा प्रकारची लक्षणे कुठल्या तरी गंभीर आजारा कडे अंगुलिनिर्देश करतात. सिताबचे आजचे वागणें त्या लक्षणांशी जुळणारें आहे. खरंच सिताब खूप आजारी आहे. कां जाऊं दिले मी त्याला अशा पावसांत ? ताप नि असा अनियंत्रित राग आधीच वाईट, तशांत त्याला सर्दीपडसें यांनीसुध्दां ग्रासले तर आजार गंभीर वळण घेऊं शकतो.
सिताबचे तसे वय झालंय् हे खरे आहे आणि त्याच्यावर बायकोखेरीज  घरचे काही पाश नाहीत. आणि ती देखील तशी समर्थ आहे स्वत:ची काळजी घ्यायला ; कदाचित् नवरा नसला तरी तिचे फारसे अडणारहि नाही. सिताबची उणीव केवळ डाक्टरांनाच जाणवेल. इतक्या चांगल्या मित्राविना जगणे खरंच खूप कठीण असेल.
त्या दिवशीं ते लवकर उठून झटपट तयार झाले सिताबकडे जाऊन त्याला तपासण्यासाठी. एरव्हीं ते अंथरूणात पडून राहणे पसंत करीत, जोंवर पत्नी अतर बहु ऊर्फ ‘दुर्गा’ चा राग ओसरत नसे. नावाला साजेशा लढाईच्या मूडमध्येच ती बहुधा जागी होत असे, दहा हातांत दहा शस्त्रें घेतलेली दुर्गा, कोणालाही न जुमानणारी !
आज तिने घरकाम करणाऱ्या बाईवर खूप तोंडसुख घेतलंय् भांड्यांवरच्या माती नि राखेवरून ! ‘त्या मोलकरणीला कळत कसं नाही की प्रत्येक वस्तु झिजून अखेर राखेत परिणत होते ते , शरीरसुध्दां ! अगदी सत्पुरूष देखील मरणाला टाळू शकत नाहीत जर कुणी त्यांचे डोक्यावर हाणले तर ! मग त्या बिचाऱ्या भांड्यांची काय कथा ? त्यातून पितळ्याची भांडीं किती महाग झालीत आतांशा ! ‘

जरासे खाकरून आपण आल्याची चाहूल डाक्टरांनी दिली नि जरा शेताकडे जाऊन येत असल्याचे त्यांनी हलकेच सांगितले. त्यांनी बाहेर जायचे कारण मुद्दामच लपवले कारण तिच्या जळजळीत कटाक्षाने त्यांचीच राखरांगोळी झाली असती ना !
आपली छत्री घेऊन ते सिताबच्या घरीं पोहोचले नि त्यांनी त्याला हाक मारली. सिताब आधीच उठून बाजेवर तंबाखू ओढत बसला होता.
‘बरं वाटलं तुला पाहून. ‘
डाक्टर त्याच्याशेजारी बाजेवर बसले ; आपल्या मित्राला व्यवस्थित पाहून त्यांना आनंद झाला. ‘मला वाटतं की तुझा ताप पळालाय् !’
‘तूच बघ’ हात पुढे करीत सिताब म्हणाला.’
‘तुला वाटतंय् तसं ?’
‘बघच ! आणि सांग तुझी भविष्यवाणी ! मी तर कंटाळलोय या जगराहाटीला नि जजगण्याला पण. ‘
‘माहीत आहे ! काल रात्री तर माझ्यावर खूप संतापला होतास. ‘
 ‘काल रात्री तर माझ्या म्हातारीने मूठभर पोहेसुध्दा खाऊ दिले नाहीत ! मी सांगितले तिला की मला ताप आलाय नि सर्दीपण झालीय्. म्हणून जीवन महाशयांनीच मला दूध-पोहे खायला सांगितलंय. पण त्याहूनही पौष्टिक आहार म्हणजे तळलेल्या पुऱ्या ! मला माहीत आहे की घरांत साजुक तूप नि कणीक पण आहे, जरी बाजारात मिळत नसली तरी. पण ही म्हातारी तर मला तुपाचा थेंबही दिसू देत नाही, स्वतः मात्र खाते ! मी जेव्हा पुऱ्या तळायला सांगितल्या तर माझ्यावर उखडली. इतकेच नाही तर तुझासुध्दा उध्दार केला !
म्हणून मी असा बसलोंय्, उपाशी ! पोटांत खांडव वन पेटलंय् ! ती काहीच खायला देत नसल्यामुळे तंबाखू ओढत बसलोंय् ! ‘
डाक्टररांनी हात लावून पाहिलं ; ताप खरंच उतरला होता. ‘तुझ्या बायकोने योग्यच केले. आतां ताप ओसरलाय्, चहाबरोबर काहीतरी खाऊन घे. मी लवकर जेवण्याची आणि सूप-भाताची शिफारस करीन.’
‘काही तरी खाऊन घे !’ सिताबने त्यांची नक्कल केली. ‘मग पूजा कोण करेल, तू का मी ?’
‘सांग कुणाला तरी आजच्या दिवस’
‘कसला आशावाद आहे हा ! कोणाही तरूणाला विधिपूर्वक पूजा करता येते का आतां ? आणि त्या मूर्ख मुखर्जींला तर अजिबात बोलावणार नाही पूजा करायला. मी आधीच खाल्लं आहे हे कळताच तो चक्क आठ आणे मागेल ! ‘
‘ तर मग दे की ! आरोग्य आधीं सांभाळायचे, प्रिय मित्रा ! तू किती भुकेला आहेस ते माहिताय् मला. चहा बरोबर थोड्या पोह्यांनी नुकसान नक्कीच नाही. मी कुणाला तरी धाडडून देतो गावातून तुझे काम करून द्यायला.’
‘एक कृपा अजून करशील ? तिला थोडा शिरा करायला सांग ना !’


डॉक्टरांना गंमत वाटली. हे जोडपे खाण्यावरून एकमेकांशी सतत भांडत  असते नि डाक्टरांना नेहमी मध्यस्थी करावी लागते. स्वत: खादाड असूनही नवऱ्याला कायम खादाड म्हणून डिंवचत असते ! “जा आपली जीभ कापून टाक खादाड कुठला“, असे म्हणत त्याची टवाळी करते.

‘का हंसतो आहेस तूं‘, सिताब आता चिडतोय्.
‘तुला भविष्यवाणी हवीय ना ? ‘ पण त्याचा भेदरलेला चेहरा पाहून ते म्हणाले, ‘नाही, कोणतेच भविष्य मी सांगणार नाही. आत्तां तर नक्कीच नाही, कारण अजून बरीच वर्षें आहेत तुझ्यापाशीं. पण ताप पूर्णपणे जाऊ दे, शिरा थांबूं शकतो ! आजच्या दिवस सूप-भातच उत्तम राहील. जरा तुझी नाडी पाहूया. ‘
त्यांनी नाडी तपासली. ‘काही हरकत नाही, उद्या शिरा खायला’. पण शिराच काय म्हणून ?
‘चहा किंवा पोह्यांसारखे बेचव काहीच नकोय्. तिला निदान बिस्किटे तरी सांग ना द्यायला चहासोबत !’
सिताबची बायको लगेचच युक्तिवाद करेल कीं बिस्किटांपेक्षा पोहे कसे अधिक गुणकारी आहेत ते, किंवा जेव्हा बिस्किटें अस्तित्वातच नव्हती तेव्हा आजारी माणसांना काय दिले जायचे खायला. पुरूष असती तर ती नक्कीच चांगला वकील झाली असती. ती कधीही आरडाओरड करीत स्वत:चे संतुलन बिघडूं देत नसे आणि म्हनूनच तिच्याशी युक्तिवाद सोपा नसे. आजच्या स्त्री-स्वातंत्र्याच्या काळात ती जन्मली असती तर बरेच काही मिळवू शकली असती. हल्लीच्या स्त्रिया वकील, न्यायाधीश आणि चक्क कलेक्टर पण होतात.
डाक्टरांनी थोडा विचार केला नि म्हणाले की तुझ्या बायकोला नाही सांगणार पण कोणाकरवीं बिस्किटें धाडून देतो ; तू इथेच थांब.’
आपल्या आवडीचा पदार्थ मिळणार म्हणून सिताब निर्धास्त झाला. डाक्टरांचा हात धरून तो म्हणाला, ‘जरा थांबून चहा तरी घेऊन जा’.
‘मग तुला बिस्किटे कोण पाठवेल ? शिवाय, माझी इतरही कामे खोळंबली आहेत, माझ्याच कर्माचे फलित. पेशंट वाट पहात असतील, मला निघायला हवे. ‘
आता सिताबची काळजी नाही . ‘परमानंद माधव’ असे हलक्याने गुणगुणत ते चालायला लागले.
चालतांना त्यांनी उघडी छत्री जरा तिरपी धरली, जेणेकरुन वाटेत भेटणाऱ्या अशा लोकांना टाळतां येईल ज्यांचे घरी कुणी आजारी व्यक्ती असेल आणि जाताजाता त्याला पाहून जाण्याचा हट्ट पुरवावा लागेल.
अशा लोकांच्या भरपूर स्तुतीला ते जुमानत नसत, त्यांच्या ‘फी’ टाळण्याच्या युक्तीला भाळून ! नव्हे, परंपरेप्रमाणे मोफत इलाज करण्यासाठी त्यांची ना नव्हती, आजवर त्यांनी तसे अनेकदा केलेही आहे. पण आतांशा लोक मेडिकल डिग्री नसलेल्या डॉक्टरकडे तुच्छतेने पाहतात. त्या थंड हवेतसुध्दा त्यांच्या कानाच्या पाळ्या तापल्या. त्यांना काही लोक वैदू समजू लागले होते, असा वैद्य जो आता कालबाह्य झालाय !
त्यांना पशु-डाक्टर म्हणण्याइतपत काही लोकांची मजल गेली होती.
ते झरझर चालत राहिले इस्पितळावरून. एक नवीन आरोग्य केन्द्र उभारलं जातंय्. दिवसाची गडबड नुकतीच सुरू झालेल्या त्या केन्द्राकडे नजर टाकण्याचा मोह त्यांना आवरला नाही. भंगी नि त्याची बायको झाडलोट करीत होते, पेशंट वऱ्हांड्यात गोळा होऊं लागलेत, नर्सेस त्यांच्या क्वार्टर्स बाहेर पडून मुख्य इमारतीकडे चालल्यात. या नवीन आरोग्य केन्द्राची इमारत खूप मोठी असेल अनेक खाटांची नि विविध डिपार्टमेंट्स असलेली. त्यांत लहान मुलांसाठी, सांसर्गिक आजारांसाठी, शस्त्रक्रिया नि सामान्य रूग्णांसाठी  निरनिराळे विभाग असतील. खरंतर अशा प्रकारची सोय होणे कधीपासूनच अपेक्षित होतं. ज्या वेगाने देशांत आजार बळावताहेत तितक्याच प्रचंड प्रमाणांत मार्ग काढणे काळाची गरजच होती. डॉक्टरांना स्मरण झाले पहिल्या धर्मादाय चिकित्सालयाचे, बहुधा एकोणीसशे दोन किंवा तीन सालीं सुरू झालेले. त्याच्या आधीं ……. काय बरें ?
“प्रणाम डाक्टर मोशाय ! व्हिजिटवर गेला होतांत ?”
डॉक्टरांनी वळून पाहिले ; शेजारी खैराती दवाखान्याचा कंपाऊंडर हरिहर पॉल आपली सायकल सांभाळत उभा होता. डॉक्टरांना पाहूनच तो आदरपूर्वक  सायकलवरून उतरला होता. डॉक्टरांनी त्याला प्रेमाने विचारले, ‘कसा आहेस हरिहर?’
‘ठीक चाललंय महाशय !’
‘सगळं चांगलं आहे ना ?’
‘चांगलंच म्हणायला हवं !’
त्याचे खरें तर छान चाललेय्.
‘हल्लीं खूप पेनिसिलीन वापरतोस म्हणें. आता तर पेनिसिलिनचेच युग आहे ना ?’
‘खरंय ते महाशय ; आणि खूप उपयुक्त पण आहे ते .’ बोलताबोलता त्याची नजर डाक्टरांच्या मागून येणाऱ्या व्यक्तीवर पडली.
 ‘डॉक्टर साहेब येत आहेत, बहुधा तुमच्याच गावाकडून। मोती कर्माकरच्या आईला पहायला गेले असावेत. मोती काल रात्री आला होता.’
म्हणजे मोतीचा महाशयांवर विश्वास नव्हता तर ! त्याला या तरूण डाक्टर चा सल्ला घ्यावासा वाटला. जीवन महाशयांना धक्का बसला. त्यांनी वळून पाहिले ; हॉस्पिटलचा तो नवीन डॉक्टर सायकलवर बसून नजीक येत होता.
‘नमस्कार !’ जीवन महाशय म्हणाले.
तरूण डाक्टर सायकलवरून उतरले. ते होते कलकत्त्याहून आलेले प्रद्योत बोस. त्यांनी फुलपॅंट आणि बुशशर्ट परिधान केला होता, डोक्यावर कॅप नि डोळ्यांवर गॉगल्।
‘नमस्कार, कसे आहांत ?’
‘मला काहीच झालेले नाही, म्हणून मी बराच म्हणायचा ! तुम्ही मोतीच्या आईला पाहायला गेला होतात ना ? ‘
‘होय, मोतीने आग्रह केला तसा. तिला विलक्षण वेदना होत आहेत. ती पडली तेव्हा हॉस्पिटल मध्ये आली होती. पण नंतर ती बरेच चालली असावी नि दुखणे वाढवून बसली. तुम्ही कालच पाहिलंय तिला, म्हणून तुम्हाला कल्पना असेलच.’
‘होय. म्हणूनच तुम्हाला काय वाटते ?’
‘नक्की सांगतां येणार नाही एक्स-रे शिवाय. कदाचित् हाडाला भेग पडली असेल किंवा टवका उडाला असेल. एक्स-रे विना पर्याय नाही पण काही गंभीरसुध्दा नसावे,’ काहीशा बेफिकिरीने तो उद्गारला !

महाशयांनी मनोमन विचार केला; फ्रॅक्चर किंवा हाडाला दुखापत झालेली नाही कारण सूज एकाच ठिकाणी टिकून नाही. अर्थात् मला सर्जरीचे फारसे ज्ञान नाही. मला केवळ नाडीचे ज्ञान आहे. मला वाटतं हे दुखणे म्हणजे दुसऱ्याच आजाराचे लक्षण असावे, जो असेल…….’ त्यांनी जाणीवपूर्वक तो विचार सोडून दिला.
पण प्रद्योत आढ्यतेने मधेच बोलून गेला, ‘आणि तुम्ही सल्ला दिलात तिला गंगेवर नेण्याचा ! मला तर ती इतकी भेदरलेली दिसली की ती हा प्रवास सहनही करू शकणार नाही ; स्टेशनवर जाताजातांच ती मरून जाईल. ‘ तो मोठ्यांदा हसून म्हणाला. ‘पण मी तशी वेळ येऊ देणार नाही. ती बरी होण्याची मी पराकाष्ठा करीन. मोती काही रकम भरायला तयार आहे, उरलेले पैसे हॉस्पिटल सोसेल. मी कुणाला मारूं देणार नाही!’

ते शब्द महाशयांना बाणाप्रमाणे चाटून गेले, मात्र त्याचा विखार त्यांना चांगलाच झोंबला. तो विखार प्रत्यक्ष बाणापेक्षाही भयानक होता.

‘मला कोणाला मारायची गरज नाही डाक्टरबाबू, ती म्हातारी आपल्याच मरणाने मरेल तीन ते सहा महिन्यांत. तिला अनेक जुने आजार होते जे आता बळावले आहेत…….’
 प्रद्योतने आकाशाकडे पाहात म्हटले, ‘कृपा करून अशा प्रकारची भविष्यवाणी करायचे बंद करा. अखेर आजचे युग पेनिसिलीन नि स्ट्रेप्टोमायसीन चे आहे. आता तुम्ही तसे करू शकत नाही, अमानवीय ठरेल ते. तुमचे गंडेदोरे नि टोटक्यांच्या बरेच पुढे गेलेय् हे जग आता.
जीवन महाशयांना बोलण्याची संधी न देतां तो म्हणाला, ‘ नमस्कार, मला जायला हवे ; आधीच उशीर झालाय्’. तो घाईने निघून गेला जरासा नाराज होत आपल्या उद्दंडतेवर .

पण तो लगेचच परत फिरला. ‘ तुम्ही एकदा मुद्दाम या हॉस्पिटल पहायला, म्हणजे तुम्हाला झालेला विकास प्रत्यक्ष पाहता येईल. मी तुम्हाला अशा विलक्षण केसेसबद्दल रिपोर्ट्स दाखवीन मेडिकल जर्नल्स मधे छापून आलेले. एक काळ होता असा, जेव्हा भोंदू वैदू सगळीकडे उच्छाद मांडीत. पण आता नाही ! आता वैज्ञानिक पध्दती आहेत आणि लोकांचा त्यांचेवर हक्क आहे. तुमच्या जुनाट नि टाकावू पध्दती किती दिवस सहन करायच्या ? चूक आहे ते सर्व. इतर देशांत याबाबतीत शिक्षा होऊं शकते ! ‘
जीवन महाशय अवाक् होऊन पाहात राहिले त्या आरोपांवर आरोप करणाऱ्या तरूण डाक्टरच्या चेहऱ्याकडे . तर मग ते दोषी आहेत, शिक्षेला पात्र !!
या तरूण डाक्टरला कसं आवरावं ? ते आपल्या जागीं खिळून राहिले, आंत जाणाऱ्या रूग्णांच्या नजरांकडे दुर्लक्ष करीत. त्यांनी स्वत:ला शांत ठेवायचा खूप प्रयत्न केला.
यांत नवीन असे काहीच नव्हते. आपल्या दीर्घ कारकीर्दींत त्यांनी खूप शिकलेल्या डाक्टर्सकडून अशी अवहेलना सोसली होती. इतर डाक्टर्स बरोबर मतभेदही झाले होते, मात्र प्रत्येक वेळी तेच बरोबर ठरत आले आहेत.
त्यांचे निदान होत असे नाडी च्या ठोक्यांवरून नि ते कधीच चुकणारे नव्हते. जीवन महाशयांना आठवले ते दिवस जेव्हा त्यांचे आजोबा दीनबंधू दत्त यांना तें ज्ञान प्रथम प्राप्त झाले होते.

त्यांनी आपले चालणे पुन्हा सुरू ठेवले………!

(क्रमश:…..





Saturday, October 21, 2017

 

आरोग्य-धाम (खंड दुसरा )

आरोग्य-धाम (खंड दुसरा)
इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या श्रावण महिन्यातल्या दुपारीं जीवन महाशय जराश्या आळसटलेल्या नजरेने आभाळाकडे टक लावून पाहात होते आणि अचानक रस्त्यावरून कोणी तरी साद घातली.
“प्रणाम, डाक्टर मोशाय”
“कोण आहे ते ? ओह , मोती ! कुठे निघालास ?”
कोळश्याच्या धुळीने माखलेला मोती कर्माकर त्याच्या तोकड्या पेहेरावात लगबगीने चालला होता, नक्कीच कुठल्यातरी तातडीमुळे. डाक्टर त्याचे वडील ‘गोशा’ ला ओळखत होते नि त्यांचेवर डाक्टरांचा लोभ होता ;  गोशा ला देखील त्यांचे विषयी खूप आदर होता. रघुवीर भारती नावाच्या एका संन्याशाने तापावर उपाय म्हणून काही मुष्टियोग गोशाला शिकवले होते . ते मुष्टियोग जीवन महाशयांना देण्याची गोशा ची इच्छा होती, मात्र तो उपाय त्यांनी स्वीकारला नव्हता ; उलट तेच आपले रूग्ण कधीकधी गोशाकडे उपचारासाठी पाठवित. ते मुष्टियोग वारंवार चढणाऱ्या तापावर आणि एक किंवा दोन दिवसांआड येणाऱ्या मलेरियान / कालाआझार तापांवर रामबाण ठरत, जेव्हा इतर उपचार, अगदी क्विनाईन सकट सर्व निष्फळ ठरत.
आता ते गुपित मोती ला ज्ञात झाले आहे आणि तो त्यांचा उपयोग करू लागलाय् . पाण्यांत उगवलेली कुठलीतरी मुळी बारीक कुटून एका हळदीने माखलेल्या ओल्या कापडात गंडाळून ती पुरचुंडी रूग्णाला हुंगायला द्यायची नि चुटकीसारखा ताप गायब !  ही संजीवन चिकित्सा खरोखर विलक्षण म्हणायला हवी !
या विलक्षण मुष्टियोगांमुळे गोशा नि महाशयांदरम्यान घनिष्ट संबंध निर्माण झाले हे निर्विवाद. काही विशिष्ट संन्याशांकडून अशा प्रकारचे अनेक मुष्टियोग शिकण्याची ऊर्मी महाशयांना आली होती मात्र त्यांना वैद्यकी शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना त्यापासून परावृत्त केले होते. “ तूं आधुनिक उपचार पध्दत शिकला आहेस, म्हणून वैद्न्यानिक दृष्ट्या जे तर्कसंगत नाही त्याचा अवलंब तू करू नयेस. “

‘मी तुमच्याच कडे येत होतो काका’ मोती उद्गारला.
अखेर कोणीतरी बोलायला मिळाल्याचा महाशयांना आनंद झाला. ते आपल्या आसनावर स्थानापन्न झाले नि जवळचा तकिया जवळ ओढत म्हणाले, ‘ये, बसून घे ; कसं आहे सगळे काही ?’
‘कृपाकरून तुम्ही ताबडतोब माझ्याबरोबर चला’
‘कशासाठी ?’
माझ्या आईला पाहण्यासाठी.’
‘आता काय झालंय् तिला ?’
‘अहो, ती मागच्या महिन्यात तलावाच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडली आणि जायबंद झाली ; मी तिला लगेचच इस्पितळात नेले. त्यांनी मलमपट्टी करून काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितले. दुखणे कमी पडले पण गेल्या आठवड्यापासून वेदना खूपच वाढल्या म्हणून तिला पुन्हा इस्पितळात नेले. त्यांनी निश्चित निदानासाठी एक्स-रे काढायला सांगितले. पण एक्स-रे तर खूप महाग असतो, म्हणून तुमच्याकडे यायचे ठरवले मी !’
जीवन महाशयांनी स्नेहपूर्वक स्मित केले. ‘बिचारा मोती ! त्याच्या म्हाताऱ्या आईला मानेचे दुखणे आहे ; अजूनही तो लहान मुलासारखी तिच्यावर अतोनात माया करतो नि लोक त्यासाठी त्याची टवाळी करतात तरीही. त्याला तिच्या वेदना पाहवत नाहीत पण एक्स-रे चा खर्च देखील त्याला झेपणारा नाही. अशा द्विधा मनस्थितीत त्याला साहाजिकच  मोशाय काकांची आठवण झाली .
‘ठीक आहे, मी तिला उद्या पहायला येईन. ‘
‘ नको नको, काका, तुम्ही आत्तांच चला ! तिचे किंचाळणे ऐकवत नाहीये हो ! तिचे बोलणे तर अक्षरश: पिळवटून काढतेय् मनाला . माझ्या जागीं तिला मुलगी असती तर तिने अधिक काळजी घेतली असती असं म्हणते ती ! तुम्हाला तर माहीतच आहे ना, की मी तिची हयातभर किती काळजी घेतलीय् ते ! आणि पहा माझ्या नशीबीं काय येतेंय् तें !! ‘ दुःखातिशयाने त्याला अश्रू आवरत नव्हते .
‘ चल, निघूंया तर मग ‘ डाक्टर उद्गारले नि होते तसेच शर्टही न घालतां चालूं लागले.
‘ तुमच्यासाठी छत्री आणू काय ‘ मोतीला त्यांची फिकीर होती.
‘ नको, ही नुसती रिमझिम आहे, काही वाकडे करूं शकणार नाही ‘.
डाक्टर संथगतीने चालतात नि त्यांची पाउलें भारी. ‘तुमची हरकत नसेल तर मी पुढे होतो काका’ असे म्हणत तो धावत सुटला. जीवन महाशयांनी ओळखले, त्याला पुढे जाऊन घर जरा नीटनेटके करायचे आहे ते ! कदाचित् आईच्या अंगावरचे फाटके वस्त्र झाकायचे असेल . मोतीच्या घरची परिस्थिती त्यांचेपासून लपलेली नव्हती. घराजवळ पोहोचताच ते किंचित खाकरले, ते आल्याची चाहूल देण्यासाठी .
‘मोती, तू आत आहेस ना ?’
‘आलोच काका ‘. त्याचा अर्थ त्याला अजून थोडा वेळ लागेल !
डाक्टरांनी ते मनावर घेतले नाही. त्यांनी तो वेळ रस्त्याचा मुआयना करण्यात घालवला, जेथून त्यांचा मित्र सिताब मुखर्जी त्याची पांढरी छत्री, हातांत कंदील नि काखेंत बुध्दिबळाचा पट मारून चालत येत असणार. पण कुठे आहे तो आज ?
दरम्यान, मोतीने त्यांना आत बोलावले.
ती वृध्दा खरंच खूप त्रासलेली होती ; मोतीने उगाच फार बाऊ नव्हता केलेला. डाक्टरांनी तिच्या गुढघ्यावर हात ठेवताच ती जोरात ओरडली. त्यांनी हात बाजूला केला ; तिला बराच ताप चढला होता म्हणून त्यांनी तिची नाडी तपासली.
‘ताप कधीपासून येतोय् ? ‘
‘तिला ताप आहे ?’ मोतीला कल्पना नव्हती.
‘अर्थात्, तिला ताप आहेच’
‘पण त्यात विशेष काही नाही, दुखणं थांबलं की ताप पण उतरेल’, मोतीची आई संकोचून उद्गारली आपला घुंगट वर न सरकावतां .
‘अं, खरंय् ते ; वेदनेसह ताप नि तापासकट वेदना !’
‘मात्र तापासाठी मी कुठलेही औषध घेणार नाही, तो आपोआप जाईल. मला फक्त वेदनेवर काही तरी द्या, तापाची चिंता करू नका. क्विंनाइन किंवा इंजेक्शन नकोच, आणि हो मला खाल्ल्याशिवाय राहवत नाही’ ती लाजून बोलायची थांबली.
‘काळजी नको, मी तुला उपाशी ठेवणार नाही’, डाक्टर हसत म्हणाले. ‘तू नववधू असल्यापासून ओलखतोय् मी तुला नाही ? तुला जेव्हा टायफॉईड झाला होता तेव्हा गोशा तुला मध्यरात्री स्वयंपाकघरातून गुपचुप खायला भात नि मासळी आणून देत असे. आणि म्हणूनच मी तुला ‘पोरेर-भात’ खायची परवानगी दिली होती. (पोरेर-भात म्हणजे मातीच्या भांड्यांत घट्ट झांकण लावून मंद आंचेवर शिजवलेले खूप जुने तांदुळ )
ते मोठ्याने हसूं लागले.
मोतीच्या आईने लाजून जीभ चावली ; खरं तर ती स्वत:च स्वयंपाकघरात लपून छपून जात असे ; तिच्या नवऱ्याने एक दिवस तिला पकडले आणि दुसऱ्या दिवसापासून डाक्टरांनी तिला शिजवलेला भात खायची परवानगी दिली होती !
‘आता काय खावंसं वाटतंय् तुला ?’
ती लाजेने चूर झाली ; काय बोलणार ती !
‘असूं दे ! जे खावंसं वाटेल ते खा’
‘पण औषधांचे काय ? मोतीने चिंतातुर होत विचारले.
‘काही विशेष नाही ; तिला फक्त नीट खायला-प्यायला दे. फार तर काली मंदिरातल्या मातीचा लेप दे जखमेवर नि शेकत राहा.’
‘मला वेदनेमुळे मरूं देणार की काय ?’ आता घुंगट वर करीत ती गरजली !
‘शेक देण्यासारखा उत्तम उपाय नाही, असं शास्त्र सांगते. मिठाच्या पुरचुंडीने शेकून सुध्दा आराम पडेल’.
‘म्हणजे ? औषध नाही, हवे ते खायची परवानगी, म्हणजे मी लवकरच  मरणार की काय ?’ घुंगट पूर्णपणे बाजूला करत नि डाक्टरांच्या नजरेला नजर देत तिने विचारले. तोच मूलभूत प्रश्न तिच्या डोळ्यात स्पष्टपणे तरळत होता, शेवटचा नि अंतिम !
केवळ तीनच प्रकारचे लोक अशा नजरेला सामोरे जावूं शकतात.  एक असतो न्यायाधीश, ज्याला मृत्युदंड सांगायचा असतो ; जर आरोपीने विचारले की मला मरावेच लागेल का ? तर त्याला ठामपणे सांगणे भाग आहे, होय नक्कीच ! दुसरा असतो जल्लाद, जो त्याला फासावर लटकवतो. आणि तिसरा असतो डाक्टर !
खूप जुन्या काळीं साठ-सत्तरी पार केलेल्या रूग्णांना ते सांगत, ‘काय उपयोग आहे आता जगत राहण्याचा ? तुम्ही पुरेसे जगून घेतलंय् असं तुम्हाला वाटत नाही काय ? आता नवीन पीढीला तुम्ही निरोप द्यायची वेळ आलीय्’, ते स्मित करून म्हणत !
त्यांचे वडील म्हणत, ‘ प्रार्थनेंत रमून जा ग़ोविन्द गोविन्द गोविन्द म्हणत ; भवसागर तरून जायचा तो सर्वोत्तम मार्ग होय !’
पण त्यांचे गुरू डाक्टर रंगलाल हे एक वेगळेच रसायन होते ; आपल्या रूग्णांदेखत ते मृत्युचे नावही काढत नसत . रूग्ण जेव्हा आग्रहाने विचारीत तेव्हा ते एवढेच म्हणत, ‘औषधाने आजार बरा होऊं शकतो पण त्याने मृत्यु टाळतां येत नाही’ आणि ते पट्कन घराबाहेर पडत.

जीवन महाशयांनी त्या वृध्देकडे पाहिले नि विचारले, ‘तुला कसला पश्चात्ताप होतोय का ? तुझा मुलगा, सून, नातवंडें सगळे जगणार आहेत; त्यांचा आनंदाने निरोप घे. वाटल्यास तीर्थयात्रा कर.’

मोती त्यांना मधेच अडवीत उद्गारला , ‘ व्वा ! तीर्थयात्रा ! ती रईसी आम्हाला परवडेल काय ? तीर्थयात्रा म्हणें !! ‘
‘वीसच मैलांचा तर प्रश्न आहे ; ट्रेनने जा नि एखादे घर भाड्याने घ्या. कितीसा खर्च येणार त्यात ? ‘कटोआ’ ला खूप शरणार्थी भरलेलेत. त्यापेक्षा उध्दरणपूर बरे राहील. मोकळीं हवा नि गंगामैया ; दररोज डुबक्या मारा, ज्यायोगें तिला नवीन आयुष्य मिळेल. बरं वाटलं तर महिन्याभरात, नाही तर ….! ‘ ते आपलं बोलणे पूर्ण करू शकले नाहीत घराबाहेर पडता पडतां.
‘ हात धुवायला जरा पाणी दे मोती !’

(क्रमश:……..






Saturday, October 14, 2017

 

आरोग्य-धाम (खंड पहिला)

“ आरोग्य-धाम “  (खंड पहिला)
अनेक वर्षांपूर्वी एक सुंदर कादंबरी वाचली होती स्व. ताराशंकर बंद्योपाध्याय यांची नि तिचे शीर्षक होते ‘आरोग्य निकेतन’. मी नुकताच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एका जिल्हा रूग्णालयांत असिस्टंट सर्जन म्हणून रूजूं झालो होतो. आमच्या वयस्कर घरमालकाने हे पुस्तक मला भेट म्हणून दिले आणि याचा तुला निश्चितपणे फायदा होईल असा भरभरून आशीर्वादही दिला. मी ते पुस्तक अनेकवेळा वाचले. व्यावसायीक लाभ मिळाला नसला तरी आदर्श रूग्णसेवा कशी असावी याचा वस्तुपाठ मला निरंतर मिळत गेला हे आता पन्नास वर्षांनी मागे वळून पाहतांना मला प्रकर्षांने जाणवत आहे.
पश्चिम बंगालमधल्या एका दूरच्या खेड्यात ही कहाणी आकार घेते ; काळ मागच्या शतकातील पस्तीस-चाळीस सालचा नि एकंदर वातावरण शान्त, बऱ्यापैकी सुखासीन. मात्र दारिद्र्य देखील पाचवीला पुजलेले . त्यामुळे वर्गसंघर्ष होताच पण दारिद्ऱ्याबरोबर असणारे अज्ञानही अफाट होते. त्यामुळे अंधश्रध्दा चांगलीच फोफावलेली. या आणि अशा अनेक बाबींचा समावेश त्या कादंबरीत पाहायला मिळाला. या पुस्तकासाठी ताराशंकर बंद्योपाध्याय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला गेला (नि ‘गणदेवता’ या पुस्तकासाठी ‘ज्ञानपीठ’ देखील )
मात्र हे पुस्तक मराठीत उपलब्ध असल्याचे समजूं शकले नाही ; सबब या सुंदर पुस्तकाचा गोषवारा देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. हे भाषांतर वा रूपांतर नाही, म्हणून शीर्षकात किंचित बदल केला आहे. तथापि, एकूणच कादंबरीचा विषय इतका भावला की मराठी सुहृदांपर्यंत तो पोहोचवावा या तळमळीतून ही दीर्घकथा !

डॉ. प्र. शं. रहाळकर

भूमिका
स्व. ताराशंकर बंद्योपाध्याय यांची ही कादंबरी बंगालमधल्या लाल मातीच्या बीरभूम जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यात फुलते. नव्या-जुन्यातला संघर्ष, पारंपरिक उपचार पध्दती आणि पाश्चिमात्य ॲलोपॅथी यांतील विसंवाद, तसेच नवनिर्माणाचे वाहात असलेले वारे यांचा सुरेख समन्वय या निर्मितींत आढळेल.
पारंपरिक आयुर्वेद म्हणजे अक्षरश: जीवनाचा वेद, आयुष्याचा वेद, हा भारतीय तत्वज्ञानाच्या पुनर्जन्माच्या संकल्पना आणि मृत्यूच्या प्रतिष्ठेवर आधारलेला आहे. हिंदूंची धारणा अशी आहे की मृत्यू हा जीवनांत अव्याहतपणे चालणाऱ्या पुनर्निर्मितीचाच एक अविभाज्य भाग आहे, एक दुवा ! मात्र आजचा कोणीही डॉक्टर मृत्यूला एक सहजसुंदर, स्वाभाविक बहिर्गमन मानायला तयार होणार नाही ; झुंज दिल्याशिवाय मृत्युला  सामोरे जाऊं देणे त्याला अनैतिक वाटेल.
नेमका हाच मुद्दा ग्रंथकाराने अतिशय हळुवारपणे माणसाच्या दुर्बलतेवर अधोरेखित केला आहे आणि मृत्यूभय दूर करण्याचा विलक्षण प्रयत्न अतिशय प्रभावी रीतीने मांडला आहे.



ग्रंथारंभ
आरोग्य-धाम किंवा देवीपूरच्या मोशाय (महाशय) कुटुम्बाने तीन पिढ्यांपासून चालवलेला दवाखाना / इस्पितळ  कोणत्याही दृष्टीने खैराती किंवा मोफत कधीच नव्हते. जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वी सुरू केलेले हे क्लिनिक आता मोडकळीला आले आहे. चुनामातीच्या भिंतींना तडे गेलेत, शाकारलेल्या छपराचे सांधे खिळखिळे झालेत, जमीनीवर मधोमध खळगा पडलाय - एखाद्या कुबड आलेल्या मानेसारखा ! खरे तर ते केव्हाही कोसळू शकते.
मात्र या वास्तूच्या मालकाचा, म्हणजेच ‘जगत् बंधू कविराज महाशय’ यांचा होरा जरा वेगळा होता ; “जोंवर ही पृथ्वी, चंद्र, सूर्य आहेत तोंवर ही वास्तू टिकेल असे म्हणण्याचा अतिरेक मी करणार नाही, पण जोंवर माझे कुटुंब या गावात राहील तोवर ही वास्तू धडधाकट आणि सुरक्षित राहील” असे ते आपला अंतरंग मित्र ठाकुरदास मिश्रजवळ बोलून दाखवीत. “आणि लक्षात ठेव, ही पोकळ बढाई नाही” असे म्हणताना ते खळखळून हंसत.  दोन्ही हात जोडून कपाळावर अतिशय नम्रपणे टेकवीत ते म्हणत, ‘हा व्यवहार निव्वळ फायद्याचा आहे, जितके तुम्ही द्याल तितके तुम्हाला मिळेल, जसे साजूक लोणकढ्या तूपाचे मोल दिवसागणिक वाढत जाते . खरंतर जगातला हा सर्वात फायदेशीर व्यवसाय होय. दोघांचाही फायदाच – देणारा नि घेणारा ; यांत  कुणाचेच नुकसान असे नाहीच !’
गावच्या पाटलाचा हिशेबनीस असणारा मित्र ठाकुरदास मिश्रा अधिक व्यवहारीक होता ; कठिणातल्या कठीण बेरजा-वजाबाक्यांना तो गडबडत नसे, तसेच कोर्ट-कचेऱ्यांच्या बाबतीतही तो निर्धास्त राहात असे. मात्र तत्त्वज्ञान विषयक कोणताही विषय त्याच्या आवाक्याबाहेर होता. छद्मीपणे हंसत तो उद्गारला,  “जाऊ दे, जाऊ दे ! निव्वळ नाडी पाहून नि कुठल्यातरी बुटीचा काढा देऊन तूं नव्वद टक्के नफा कमवतोस अशी माझी खात्री आहे. पण त्या रूग्णांचे काय ? त्यांना फायदा कसा ? मित्रा जगत्, तूं असे कसे म्हणतोस ? त्या बिचाऱ्यांना तर कर्ज काढून तुझी ‘फी’ देणे भाग पडते ! खरोखर ते आरोग्य नि पैसेही गमावून बसतात !”
‘तू खरंच विचित्र आहेस ‘ जगत् बंधू त्याला मध्येच थांबवत उद्गारले ; ‘पैशांचा व्यवहार नंतरचा ; मी सांगितलेला फायदा पैशांचा नसून आयुष्यातल्या अति मौल्यवान अशा आरोग्याचा आहे. एकाला आरोग्यप्राप्ती नि दुसऱ्याला रूग्णसेवेने मिळणारी ईश्वरकृपा ! आरोग्यप्राप्ती ही माणसाला मिळणारी सर्वोत्तम लाभदायक देणगी आहे हे विसरू नकोस .
महाभारतात एक कथा येते – यक्षरूपात आलेला धर्म युधिष्ठिराला काही प्रश्न विचारतो. त्यातला एक – ‘ सर्वोत्तम फायदा कुठला ?’  युधिष्ठिर उत्तरतो , ‘ आजारातून बरे होणे हा सर्वोत्तम लाभ होय !”
त्यांच्या मित्राला मात्र ते पटले नाही आणि त्याने केवळ स्मित केले ; “असं म्हणतात ना की भाजीपाल्याच्याt टोपलींत दडवलेली  मासळी लपून राहात नाही ; तसंच तुझ्या संस्कृतप्रचुर भाषणातून पैशांचा दर्वळ लपू शकत नाही !” तो आपल्याच विनोदावर मोठ्याने हंसला.
मात्र दुर्दैवाने त्याला काही दिवसांनंतर संधिवाताने जखडले आणि तो तीन महिने पंगू राहिला. त्याच्यावर वयस्क मोशायने उपचार करून खडखडीत बरे केले. बरा झाल्यावर मिश्राने त्याचे आभार मानले आणि ‘ तूं मला जीवनदान दिले आहेस ; तुला गरज पडली तर तुझ्यासाठी मी माझा प्राणसुध्दा देईन !’
‘तर मग, आजारमुक्त होणे हा सर्वोत्तम लाभ आहे असे तूं  मानतोस?’ ‘होय, निश्चितपणें !’ क्षणाचाही उशीर न करतां तो उत्तरला !
दुसऱ्या दिवशी मिश्रा एक ब्रश आणि तेलात बुडवलेला शेंदूर घेऊन क्लिनिकवर आला आणि त्याने भिंतीवर ठळक अक्षरांत लिहिले, “आजारमुक्ती हाच सर्वोत्तम लाभ” !

आताचे आरोग्य-धाम हे नाव तेव्हा रूढ नव्हते ; लोक ‘महाशयांचे घर’ किंवा महाशयांचा दवाखाना असे संबोधत.
हे नांव रूजले दुसऱ्या पिढींत, जेव्हा जगत् बंधु महाशयांचे पुत्र जीवन  महाशय यांनी आपला पुख्तैनी वारसा पुढे चालवायला सुरूवात केली. तोंवर काळ बदलला होता. शहरांमध्ये नवीन बदल घडायला कधीच सुरूवात झाली होती, मात्र खेड्यांमध्ये ते हळूहळू जाणवूं लागले होते. जीवन महाशयांनी क्लीनिकचे “आरोग्य-धाम” असे नामकरण केले आणि एका मोठ्या लाकडी बोर्डवर ठळक काळ्या अक्षरात ते लिहून बाहेरच्या व्हरांड्याच्या दर्शनी भागांत बसवले.  इतरही काही जुजबी बदल त्यांनी केले. पारंपरिक आसन आणि मोठा जाजम अंथरलेला दीवाण तसाच ठेवला मात्र चार-दोन खुर्च्या, एक टेबल नि रूग्णांसाठी बांकडी वाढवली.
डुगडुगणारे ते फर्निचर अजून तसेच आहे, खुर्च्यांच्या हातांशिवाय. मात्र बांकडी अजून तग धरून आहेत !
डळमळणारी इमारत तिच्या नावाच्या पाटीसह आणि तिचा मालक जीवन महाशयांना तुम्ही आजही पाहूं शकाल, काळाशीं झुंज देत ! शहरापासून अदमासें शंभर मैल ब्राडगेज रेल्वेने तुम्हाला प्रवास करावा लागेल. जंक्शनवाल्या स्टेशनपासून एक लहान फाटा तुम्हाला दहा मैलांवरच्या एका सधन खेड्याकडे घेऊन जाईल. या खेड्यात काही मोजक्या टॅक्सी, बसेस, सायकल-रिक्षा आणि बैलगाड्या आढळतील, बदलत्या काळानुरूप.  आरोग्यधाम इथून फार लांब नाही, फक्त एकाध मैल. एवढे अंतर रिक्शा किंवा बैलगाडीने सहज जाण्यासारखे, पण चालत जाणे अधिक सोयीस्कर कारण चालतांना जुने टाकून नवे स्वीकारत असलेले ते निरागस लहानसे गाव आपल्याला जवळून पाहता येईल.
ही लाल मातीची पाऊलवाट  एकेकाळच्या सधन जमीनदारांच्या जुनाट घरांवरून, अस्ताव्यस्त झालेल्या मळ्यांवरून, शेवाळ्याने माखलेल्या मंदिरांवरून, इतस्थता पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगांजवळून आणि ओसाड माळरानांवर अमाप वाढलेल्या तणांमधून वाट काढत जाते. बाजूला तुटलेल्या पायऱ्या अनेक तळीं नि डबक्यांकडे नेतात. सर्वदूर घाणीचे साम्राज्य दिसेल.  एक अवाढव्य वडाचे झाड लक्ष वेधून घेईल वाळलेल्या फांद्यांचे. त्या वडाच्या बुंध्याभोवती सिमेंटचा पार असेल, जिथे कधीकाळी पूजाअर्चा होई. पायवाट येथे संपते आणि सुरूं होतो एक पक्का खडीचा रस्ता.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस काही दुकानें लागतील विविध प्रकारची. हा मुख्य बाजार आहे इथला, कायम गजबजलेला नि गोंगाट असणारा, विलक्षण दर्प असलेला. आताशा हे मार्केट बरेच वाढले आहे. थकल्याभागल्या वाटसरूंसाठी चहा नि खाण्यापिण्याचे पदार्थ मिळण्याची आता चांगली सोय झाली आहे. सर्वोत्तम चहा तुम्हाला नवग्राम मेडिकल स्टोअर च्या शेजारच्या दुकानात मिळेल. हे मेडिकलचे दुकान चटकन नजरेला पडते त्याच्या रंगीबेरंगी पाट्या नि जाहिरातीच्या फलकांमुळें. हे दुकान आणि त्यांतील फर्निचर नवे असल्याने लक्ष वेधून घेईल. पॅंट आणि बुशशर्ट घातलेला नि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेला डाक्टर हिरेन इथल्या फार्मसीवर देखरेख ठेवतो.
एक फाटा उत्तरेकडे जातो आणि एकावेळी एकच वाहन जावू शकेल इतकीच त्याची रूंदी आहे. इथून पुढे तीनचार फर्लाँग रस्ता दाट झाडे असलेल्या सावलीचा. आंबा, जांभुळ, शिरीष आणि चिंचेची झाडें आहेत  शेजारी मोठी तळीं आहेत, पक्कया पायऱ्या अससणारी.
याच्या पुढे मात्र अतिशय रम्य चित्र तुम्हाला खिळवून ठेवील. हल्लीची प्रगत वास्तुकला दर्शवणारे काही नवीन बंगले दिसतील ; त्यांत कालवा बांधणीवरचे इंजिनियर्स नि वरीष्ठ अधिकारी राहतात. त्या बंगल्यांच्या पलीकडील सुंदर घरांच्या रांगा आहेत. तिथे कनिष्ठ अधिकारी नि इतर सेवकांचा निवास असतो. मधोमध कालव्याचे सुसज्ज कार्यालय आहे. या नवीन कालव्याच्या खोदाई बरोबरच उर्वरित घरांचेही काम जोरात सुरू आहे, गवंडी त्यांच्या कामात मग्न आहेत नि त्यांच्या बायका छतांवर चढून त्यांची मदत करीत आहेत मोठ्याने गाणी गात गात ! हॅट, फुलपॅंट नि जॅकेट  घातलेल्या इंजिनियर्सची लगबग ध्यानात येईल, ते आपापल्या  सायकलींवर फिरत कामांची देखरेख आणि सूचना देतांना आढळतील. पुढची ती नवी इमारत होऊं घातलेल्या हास्पिटलची आहे नि त्याच्याजवळच डाक्टर आणि कम्पाउंडर साठी क्वार्टर्सची देखील सोय होणार आहे. नर्सेस साठी काही मातीची घरें उभारली जातील. या सर्वांहून  थोडे अधिक पुढे मोती या भंग्याची झोपडी आहे.
मात्र या सगळ्यांपासून वेगळी पण हास्पिटलशी निगडीत अशी एक भव्य वास्तू लवकरच आकार घेणार आहे, या प्रदेशासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकणारे नवीन आरोग्य-केन्द्र ! इथे थोडा अधिक वेळ रेंगाळायला तुम्हाला नक्कीच आवडेल कारण इथे भविष्यातील एक दिव्य स्वप्न आकार घेत असल्याचे तुम्हाला जाणवेल. नूतन कालखंड अवतरतोय, नवनवीन कल्पना स्वप्ने आणि आशा-आकांक्षांना टवटवीत करीत !

तथपि, आपण आपल्या मूळच्या उद्दिष्टाला विसरूया नको – जुने आरोग्य-धाम पाहण्याचे !!
तर मग, आपण तब्बल मैलभर पुढे जाऊंया या सुंदर इमारतींच्या पुढे. तो लाल खडीचा रस्ता कणिसांच्या शेतांना वळसा घालीत देवीपूर गावात पोहोचतो. इथेच आहे जुने आरोग्य-धाम.
खरं तर, गरिबी आणि जुनाटपणाचे कढ सोसणारे देवीपूर अजिबात पाहण्यासारखे नाही.  घरांवर सावली धरणारे वृक्ष अतिप्राचीन आहेत, युवकांना प्रफुल्लित करेल अशी सुंदर हरियाली नावालाही नाही ! वाळके बकुळीचे रस्त्यालगत पडलेले खोड सर्वप्रथम नजरेस पडेल. त्याच्याखाली एक भग्न देवस्थान असेल जिकडे आता कोणी ढुंकूनही पहात नाही. सतत ठोकापीटी चालणारे लोहाराचे दुकान जवळच आहे आणि त्याचा प्रतिध्वनी थेट नवीन आरोग्यकेन्द्रापर्यंत ऐकू जातो.
शेतकरी मंडळी या लोहार दुकानाभोवती गर्दी करतात. लाकडाच्या ठिणग्या इतस्तथा उडत राहतात . बांबूच्या वनाभोवती पक्षांचा  किलकिलाट एरव्हीं गुडीगुप असलेल्या वातावरणाला छेद देत असतो.






खूप उंच वाढलेले अर्जुन वृक्ष घारी अन् गिधाडांना आश्रय देतात आणि त्यांचे कर्कश किंचाळणे कानठळ्या बसवते. दुसरीकडे रस्त्यावर चिमण्यांचा चिवचिवाट नि त्यांची आपसांतली भांडणे चित्त विचलीत करत राहतात. मात्र वाटेत एखाद दुसराच इसम भेटेल अन् तो देखील आजारी नि थकलाभागलेला. भेटलेला इसम तुमच्याकडे जरा संशयाने पाहील आणि पुढे गेल्यावर वळूनवळून पाहात राहील. त्याच्या मनांत तुमच्याविषयी प्रश्न येतील , कोण असावा हा नि कुठला ; काय हवे असेल याला ; उजव्या विचारसरणीचा की डाव्या : किंवा मतं मागायला आलेला की कशासाठी  वर्गणी मागणारा ?
पण जुन्या काळी जेव्हा आरोग्यधाम नुकतेच उदयाला आले तेव्हां लोक काही न्यारेच होते. त्यांची कोठारें धान्याने गच्च भरलेली असत ; दूध नि  गूळाची राब मुबलक असे आणि तलावांत खूप मासे ! लोकांना खाण्यापिण्याची ददात नव्हती आणि ते पूर्ण ताकदीने भरपूर कष्ट देखील करीत. ती जातकुळी काही और होती; सशक्त, निरामय नि आनंदी ! वेषभूषेबाबत त्यांचा आग्रह नसे नि जेमतेम गुडघ्यांपर्यंत त्यांचे धोतर पोहोचूं शके. शर्ट किंवा बुटांचा वापर नाहीच. मात्र झपाट्याने चालताना त्यांची उघडी शरीरयष्टी ठळकपणे नजरेत भरत असे.
कधीकाळी एखादा परीटघडीचे कपडे घातलेला शहरी गृहस्थ त्या खेड्यात आलाच तर ही साधीसुधी गावकरी मंडळी त्याला वाकून अभिवादन करीत आणि नम्रपणे पृच्छा करीत, ‘ कुठून येणे केलेत महाराज, काय काम होते देवा ? ‘ आणि जेव्हा आरोग्यधामला भेट द्यायला आल्याचे त्यांना कळे तेव्हा ते उद्गारत, ‘ होय अर्थातच ! तुमच्यासारख्या गृहस्थाने भेट द्यावी अशी आरोग्यधाम ही एकमेव वस्तु या गावांत आहे ! असेच पुढे चालत राहा महोदय, काली मंदीराच्या जरा पुढे किराणा दुकानाच्या डाव्या बाजूला आणि पक्क्या बांधलेल्या विहिरीच्या उजवीकडे तुम्हाला जीवन मोशाय यांचे क्लिनिक ‘आरोग्यधाम’ सापडेल ! ‘ तिथे अनेक बैलगाड्या नि बरीच गर्दीही आढळेल. जा, असेच पुढे जा महाराज.


मात्र आता ही जागा बरीचशी विराण भासेल. इथे कधीकाळी खूप गर्दी होत असे ही कल्पनासुध्दा आता अविश्वसनीय वाटेल. काही मोजके रूग्ण सकाळच्या प्रहरी येवून जातात.  डाक्टर त्यांची नाडी तपासून कागदावर औषध लिहून देतात. औषधांची कपाटें आता रिकामी असतात. त्यांच्यावर भरपूर धूळ साचलेली आहे. कपाटांची दारेंसुध्दा खिळखिळी झालींत. आता येथे औषधें मिळत नाहीत. पेशंट्स केवळ प्रिस्क्रिप्शन घेऊन जातात. उर्वरित दिवसभर चिटपाखरूंही तिथे फिरकत नाही.
दुपारचे वेळी जीवन महाशय तिथे एकटेच बसलेले दिसतील, झावळ्यांचे छत असलेल्या त्यांच्या घरातल्या फरशी अंथरलेल्या सज्जांत. हा सज्जा घराचा संपूर्ण दर्शनी भाग व्यापून आहे. मात्र तिथेही धुळीचे साम्राज्य आहे नि तो सुध्दा मोडकळीला आलेला ; तीन बाजूंची भिंत खचली आहे.
ओलिएंडरची दोन झुडुपं वाऱ्याच्या झोक्याने झुलतात नि त्यांच्या  लालभडक टवटवीत फुलांचे झुपके हिंदोळत राहतात.

जीवन महाशय याच फुलांकडे टक लावून पहात विमनस्क अवस्थेत बसलेले दिसतील. एखाद्या म्हाताऱ्या हत्तीप्रमाणे वृध्द नि अंगभर सुरकुत्या पडलेले . सत्तर वर्षांचे ऊन-पावसाळे पाहिलेले त्यांचे भारीभरकम शरीर मात्र आता बरेच थकले आहे. एकेकाळी अतिशय कणखर  असलेल्या बरगड्या आता वर आल्यात. त्यांचे हात आणि पाय तेव्हा चांगलेच भारी होते. पायांजवळच त्यांचे मोठ्या आकाराचे झिजलेले पायताण आहे. कपडे मळलेले नि ठिगळं लावलेले. मात्र जमेची बाजू म्हणजे त्यांची पांढरीशुभ्र लांब दाढी नि मिशा आणि खूप छाटलेले पांढरे केस !
एका ठेंगण्या लाकडी आसनावर बसून त्या फुलझाडांकडे एकटक पाहात असलेले जीवन महाशय आपल्या विचारांत गुरफटून गेले होते.
त्यांच्या मनांत माणसें नि झाडें यांच्यातील चैतन्याचा विचार तरळून गेला. ती फुलझाडें त्यांच्या वडिलांनी जवळ जवळ साठ वर्षांपूर्वी लावली होतीं, पण त्यांचेवर वार्धक्याच्या कुठल्याही खुणा अजून दिसत नव्हत्या.
एका विलक्षण अपरिचित आवाजामुळे त्यांची तंद्री मोडली ; कुणीतरी मोडक्यातोडक्या शब्दांत बोलत होता. त्यांनी आजूबाजूचा कानोसा घेतला पण कुणीच दृष्टिपथात नव्हते. मग त्यांच्या लक्षात आले की तो आवाज हत्कुरो नावाच्या एका कोळ्याच्या पाळीव पक्षाचा होता (बहुधा काकाकुवा) आणि ते स्वतःशीच हसले. त्या पक्षाने कदाचित कुणा आगंतुकाला पाहून त्याच्या संवईनुसार “ आज मासळी नाही, आज मासळी नाही, आज मासळी नाही” असा नेहमीचा घोषा लावला असावा. हा पक्षी मात्र होता विलक्षण. सर्वच पिंजऱ्यातले पक्षी त्यांना बाहेर सोडल्यावर पुन्हा कधीच आपण होऊन पिंजऱ्यात परत जात नाहीत. मात्र हा पक्षी सकाळी पिंजऱ्याबाहेर काढल्यावर संध्याकाळी पुन्हा न चुकतां पिंजऱ्यात आपण होऊन जाऊन बसत असे. पण कधी पिंजऱ्याचे दारं उघडले नसेल तर पिंजऱ्यावर बसून तो म्हणत राही “ मां, मां , ए म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या “ ! नि हा म्हातारा म्हणजे हत्कुरो कोळी, कारण त्याची बायको त्याला याच नावाने बोलवित असे !! त्या पक्षाने तिच्याचकडून हे शब्द उचललेले होते. कदाचित तो पक्षी आत्तां त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करीत असावा, असे जीवन महाशयांना काहीशा आश्चर्याने वाटले. लोक म्हणत की या पक्षाच्या पूर्वपुण्याईमुळेच  त्याला ही विलक्षण देणगी मिळाली आहे. तर काही म्हणत पूर्वजन्मी हा नक्कीच माणूस असला पाहिजे आणि मागील जन्मातील कुठल्यातरी पापामुळे आता पक्षी झाला आहे.

आपली पांढरी दाढी कुरवाळत जीवन महाशयांचे विचारमंथन सुरू झाले जन्म नि पुनर्जन्मांवर. जरा ‘हट् के’ विचार होता हा. खरंच ! कल्पना- —विश्व कसे झपाट्याने बदलत जाते नाही ? ते आपली दाढी कुरवाळत राहिले. अधूनमधून बारीक कापलेल्या डोक्यावरच्या केसांतून हात फिरवीत ; ते टोकदार केस हातांना गुदगुल्या करीत. खरंतर त्यांना तो स्पर्श हवाहवासा वाटे. एकाएकी त्यांना सिताब आठवला. काय झालंय् त्याला?  तो जेव्हा येई तेव्हा वेळ घालवण्यासाठी समोर मांडलेला बुध्दिबळाचा डाव हमखास रंगत असे.
आजचे वातावरण बरेचसे ढगाळ नि पावसाळी आहे नि दुपारी तर एक मोठी सर येऊनही गेलीय. किंचित् अंधारून पण आलंय बाहेर. मात्र सिताबची उघडलेली पांढरी छत्री न दिसण्याइतपत गडद नक्कीच नाही. वयाच्या मानाने जीवन महाशयांची दृष्टी अजून खरंच छान आहे, लांबवर असलेले दृष्य त्यांना सहज दिसते, विशेषत: छत्रीसारखी मोठी वस्तू; अर्थात् सुईंत दोरा ओंवण्याइतपत नाही !
सिताब मुखर्जीची प्रकृतीसुध्दा अजून ठणठणीत आहे. अधूनमधून जीवन महाशय त्याची नाडी तपासतात नि अजून तरी त्याचा अंत निकट आला नसल्याची खातरजमा करून घेतात. अजून घोडदौड चालू राहणार, ते उद्गारतात !
याचे कारण जीवन महाशयांना नाडी परीक्षेवरून मृत्यूची चाहूल कळत असे. ती त्यांना प्राप्त झालेली पारंपरिक विद्या होती, “हेरिडेटरी” !  पारंपरिक वैद्यकी करणाऱ्या कुटुंबात पाश्चात्य वैद्यकी शिकणारे ते पहिलेच होत. मात्र त्यांना पारंपरिक भारतीय वैद्यकीची सुध्दा चांगली जाण होती आणि प्रसंगानुरूप कोणत्या साधनाचा अवलंब करावा याचे तारतम्य देखील त्यांना होते. तथापि त्यांची खासियत होती नाडी परिक्षेच्या बाबतींत. नाडी परीक्षेवरून ते रोगाचे निदान, त्याची व्याप्ती, बरे होण्यासाठीचा कालखंड आणि मृत्यू नजिक आहे किंवा कसे याचा निश्चित होरा सांगूं शकत, केवळ नाडी परिक्षेवरून !!
अशा प्रकारच्या भविष्यवाणीमुळे त्यांचा लौकिक दूरदूरवर पोहोचला होता. तो लौकिक अजूनही अस्तित्वात आहे. आपल्या खूप मोठ्या वैद्यकीय कालखंडांत त्यांनी अनेक वेळा केलेले मृत्यूचे भाकीत खरे ठरत आले आहे.
अनेक चेहेरे नि प्रसंग त्यांच्या नजरेसमोर तरळून गेले. एक चेहरा मात्र बराच वेळ दिसत राहिला एका रूग्णाच्या तरूण बायकोचा, तिचा नवरा लवकरच मरणार आहे असे सांगितल्यानंतरचा. रूग्णाचे नाव होते शशांक,    सुरेन मिश्राचा मुलगा. त्यांना अजून आठवतोय तिचा संतापाने कृध्द झालेला चेहरा नि तिने त्यांना वाहिलेली शिव्यांची लाखोली !

अशा अनेक प्रसंगांना आठवत त्यांनी एक दीर्घ नि:श्वास टाकला.
खूप कठीण, दु:खद नि जीवघेणे आजार तसेच अनेक मृत्यू त्यांनी अगदीं जवळून पाहिले होते. अनेक वेळा त्यांना मृतदेह मागे ठेवून घराबाहेर पडावे लागले होते, त्यांच्या अथक नि शेवटपर्यंत केलेल्या प्रयत्नांना न जुमानतां. कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. मात्र अशा दु:खद प्रसंगी ते स्वतःच्या खोल विचारांत इतके गढून जात की समोरचे ओळखीचे चेहरेदेखील त्यांना दिसेनासे होत. आजार नि उपचार, तसेच मृत्यूबाबत ते सखोल विचारमंथन करीत. बाह्य जगाशीं पूर्ण ताटातूट करीत त्यांचे अंतर्मन वैद्यक शास्त्रातील पुस्तकांची
पानें धुंडाळत राही. दूरवरच्या एकाकी खेड्यात, जिथे कुठल्याही प्रकारच्या जलद वाहतुकीची नेहमीच वानवा असे, अशा त्या खेड्यात शोकाकुल लोकांच्या मधोमध एका मोठ्या वृक्षासारखे ठाण मांडून बसत अविचल, तटस्थ. असं म्हणतात की डाक्टर मंडळी पाषाण-हृदयीं असतात. एका दृष्टीने ते खरेही असेल, कारण त्यांना दुःख नि वेदना पाहायची इतकी  सवय झालेली असते की त्यांच्या भावना सुन्न होऊन ते असंवेदनशील बनतात.

शशांकला जेव्हा जीवघेण्या आजाराने पछाडले तेव्हा सत्य वस्तुस्थिती सांगणे त्यांचे कर्तव्य होते, त्यामुळे सर्वांनाच खूप त्रास झाला असला तरीही आणि त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या बाबतींत ? ते खिन्नपणे हसले. मुलाच्या मृत्यूपूर्वी तीन महिने आधीच त्यांनी ओळखले होते, बायकोला सांगितले होते नि मुलाला सूचकपणे दर्शविले होते, जो स्वतःच डाक्टर होता.
त्यांना आता पश्चात्ताप होतोय त्यांनी तसे सांगितल्याचा. का बरे ते तसे बोलले ? व्यावसायीक अहंकारापोटीं ? मग त्यांना आतां पश्चात्ताप काय म्हणून होतोय् ?  त्या आठवणींनी त्यांना लाजिरवाणे कां वाटतेय् ?

डाक्टरांनी आपली नजर निळ्या आभाळाकडे वळवली. पण डाक्टरांनी खरें ते सांगायलाच हवे ना ? ते परंपरेने बांधलेले आहेत. अर्थात, ते परिस्थितीवर अवलंबून असायला हवे म्हणा .

(क्रमश:


Friday, October 13, 2017

 

Sri Dasbodh (2.6) तमोगुण लक्षण

Sri Dasbodh (2.6) तमोगुण लक्षण

The University Examinations proscribe three categories of students declared as successful, the first second and third. Likewise, Sri Samartha classifies the three traits as Satva, Raja and Tama. A person possessing Satva Guna is indeed truly human. In addition, the one with pure Rajo Guna can also be considered as Satva guni. The person having mixed Rajo Guna is fully engrossed in worldly matters ; even though he has no inclination unto spirituality, he leads his life enjoying all worldly pleasures. He indulges in good food, drink, sensuality, sports, dramatics, music and dance and even addictions. He enjoys being so and is overtly sensuous.
One possessing Tamo Guna nurtures all characteristics of mixed Rajo Guna ; in addition, he has individualism, hedonism and extremism too. Tamo Guna harbours sensuality like mixed Rajo Guna, but it is overmuch ; there is selfishness that is extreme ; there is attachment, which is extreme ; there is sense of worship, but it is hedonistic and penance too, which is horrible.
Such a person is useless for companionship. One has no option to label him as human.
His rage is extreme ; he is quarrelsome and his eating and drinking is enormous. He has penchant for sensuality, scuffles, extreme maliciousness leading to harming others and is never afraid of sin or sinful pursuits.
He is corrupt, harms people and is cruel.
Overall, he is most unwanted despicable individual .

                                “ Hari Om Tat Sat “


Thursday, October 12, 2017

 

Sri Dasbodh (2.5) रजोगुण लक्षण

Sri Dasbodh (2.5) रजोगुण लक्षण

Even while all humans are alike, each person is different from the other. Even Sri Dnyaneshwar Maharaj or Sri Samartha that were Divine incarnations behaved as per their attributes alone. It is the nature of nature to project the ordinary behind every special ! Therefore thinkers and philosophers strived to discover the common denominators behind different traits of human behaviour since long. Sage Kapilacharya postulated long back that whatever manifests in form is formed from three attributes Satva, Raja and Tama. Vedanta philosophy accepted the doctrine and incorporated it with its philosophy.
As per Kapilacharya, if entire visible world is woven in the three attributes, humans the best of creations must also be made of the three. Satva-Guna envisages Effulgence, Knowledge, Peace, contentment, unselfish love etc. The Rajo-Guna exhibits Passion and desires, struggle, toil, industriousness, fighting spirit etc. Whereas laziness, excessive sleep, lethargy, inertia, fascination etc are traits of Tamo-Guna. Every person harbours harbours all the three ; however, one of those is predominant and the person is identified accordingly.
It is true that entire Saints are at the same status from spiritual point of view ; however, those enjoying bliss of Self-Knowledge equally have transcended the three attributes. And therefore, while dealing in worldly matters they appear to behave as per attributes. Common man behaves under the influence of the three attributes alone and he needs trudging path of spirituality through those only.
Therefore Sri Samartha differentiated each of the attributes as pure and mixed (शुध्द आणि शबल). Pure attribute leads to spiritual leanings whereas the impure or mixed one unto worldly matters.

Sri Samartha describes the three attributes one by one in detail during next three chapters.

Basically human body is made of three attributes, namely Satva, Raja and Tama. Satva-Guna happens to be the best among the three.
Satva-Guna encourages developing devotion unto the Lord. Raju-Guna necessitates re-birth and Tamo-Guna leads to taking birth in non-human lower species.
He mentions 18th stanza from 14th chapter of the Bhagwat Geeta thus :-
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा: / जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा: ॥ १४/१८ ॥ It means, those humans possessing benevolent traits reach highest  pedestals of evolution; those with pleasure loving ones keep hanging around intermediate state, while the lazy indolent are doomed.
Qualities are distinguished as Pure and Mixed : I shall speak about both. Whatever clean, spotless, immaculate is Pure and whichever mixed is ‘Shabala’. Shabala is obstructive, harmful.
I shall enumerate characteristics of Pure and Shabala ; let thinkers listen to those intently. Pure traits are spiritual, whereas Shabala ones are worldly. A worldly person harbours all three attributes. ; while one predominates the other two are relegated. Life continues of the three attributes, namely Satva Raja and Tama.
I shall now demonstrate the way Rajo-Guna works.
Dynamism in life, penchant to overcome situations, enthusiasm for change etc should be considered as manifest form of Rajo-Guna. This trait is necessary to achieve anything big and lofty.. however, it is misused when  directed towards worldly matters. The wise should listen carefully as to how a person behaves when Rajo-Guna predominates. Rajo-Guna  questions very propriety in greatness of God when the house, worldly matters etc belong to the person alone. Indeed, the one that cares for mother, father, wife, children alone is Rajo-Guni. He craves to eat good, wear good and acquire things belonging to others. He abhors religion, charity, recitation and meditation. He does not bother about merit or sin. Moreover, he doesn’t engage in pilgrimages, vows and does not entertain guests or visitors. In addition, the one pursuing immoral actions is to be considered Rajo-Guni. Besides, even while possessing plenty of grain and money the one running after money and spending it miserly are the signs of Rajo-Guna.
The one considering himself as youthful, beautiful, powerful and clever is Rajo Guni. In addition, the one arrogant of his land, village, place of residence is Rajo Guna.
The one wishing ill of others vis a vis his own welfare is Rajo Guna. In addition, the one nurturing envy and malice is a Rajo guni. The one possessing passion and considering others as mean and negligible is Rajo Guna. The one nurturing extraordinary affection unto son, wife etc is Rajo Guna. When one is concerned about a close relative and feels sad, entry of Rajo Guna is certain. One is worried over travails in worldly matters and nurtures doubts about overcoming those ; such is the state in Rajo Guna. In addition, lamenting over pleasures enjoyed in the past and their unavailability presently makes him despondent. That is Rajo Guna  ! Moreover, witnessing wealth of others and its absence  with him brings in dejection; that too is Rajo Guna. Besides non-availability of whatever seen makes him sad ; it is Rajo Guna for sure.

The one engrossed in cheap humour all the time, engages in exotic songs and forgets his own self applauding and mimicking those is indeed a Rajo guni.
One engaging in calumny, ridicule and mockery and the one leading to argumentalism due to his talk is a Rajo guni indeed.
The one indulging in vice, laziness, addiction etc is Rajo guni. He is an artiste that dons various roles, nurtures penchant for drama and the likes and wastes money over trivial sports is Rajo Guna personified. He is fond of intoxicating things, loafing around and likes company of low and mean people.

A person with Rajo Guna is engrossed in worldly matters   all the time. Moreover, he is ever engaged in satisfying the body and senses alone.
Rajo Guna makes entire desires getting entangled in worldly matters and the only way to get rid of its clutches is Devotion unto the Lord. One should surrender his mind unto the Lord alone and learn to Love Him. Mixed Rajo Guna leads one toward worldly matters, whereas pure Rajo Guna unto devotion to Lord. One discovers characteristics of pure Rajo Guna in Satva Guna or benevolent traits, which indeed happen    to be the basis of Lord’s Devotion.
The audience have understood characteristics of Rajo Guna by now. Therefore, it would be useful to know those of Tamo Guna as well !

                                    “ Hari Om Tat Sat “


Wednesday, October 04, 2017

 

Sri Dasbodh (2.4) भक्ती निरूपण

Sri Dasbodh (2.4) भक्ती निरूपण
(Devotion Explained)
Sri Samartha now explains various aspects of Devotion. Earlier, he dealt with various attributes human humans possess. He also demonstrated misuse of human prowess while narrating despicable traits of men. Like all other Saints and Sages he too is extremely pained and distressed looking at dismal state of human behaviour, which has lost sight of the best, permanent and conducive to overall welfare of man and society at large.
According to Sri Samartha the very purpose of human birth is to know his own Self, which is nothing other than Divinity. He therefore describes path of devotion in his following discourse.

He says, one acquires human birth after innumerable noble actions performed in earlier sojourns and only the fortunate ones  tread the righteous path. Indeed, accumulated merit confers human birth in the first place and a noble ancestry followed by stipulated actions as enshrined in Vedas and Shastra ; moreover, noble desires and worship of the Lord occur by virtue of merits earned earlier. Devotion unto the Lord, along with company of Saints is yet more beneficial. Entire lifetime of such persons is fulfilled and that should be considered best benefit indeed. One should nurture true love of the Lord within his conscience and a group of Lord’s devotees outside. That leads to celebration of festivals, where glories of the Lord are sung incessantly and love unto the Lord becomes twice as much.
We have acquired human birth and we must fulfil it somehow. The very rare heaven comes to hand while doing so.
One should engage in ceremonial worship or pursue compassion, charity, service unto fellow humans; or else,  simply sing glories of the Lord. One may jettison worldly matters out of remorse or trudge path of devotion; or else, acquire company of Saints.
One should study various Scriptures in depth or at least undertake pilgrimages. Or else, engage in continuos recitals in order to atone sin.
One should engage in philanthropy (परोपकार) or pursue path of Knowledge; or else, discover quintessence of discourses heard from Saints and Sadguru.
One should obey dictates of Vedas , follow ritualistic worship or simple worship, which grants eligibility and authority to acquire Knowledge.
One should worship the Lord and fulfil his life through body, speech and mind ; moreover, by means of flower, leaf, fruit or even water alone.
One should strive to attain something worthwhile having acquired human birth ; however, his human sojourn is wasted if one fails to do so and he becomes a burden for the earth.
It is just apt for the human body to acquire something beneficial for one’s own Self (आत्महित). One should divert his mind and wealth unto the Lord as per his ability.
Indeed the one that does not follow any of the above is a corpse in spite of being alive. He has troubled his mother unnecessarily by taking this birth ! Such persons never indulge in worship, recitations, meditation, everyday’s religious and spiritual practices. Moreover, they do not engage in  devotion, loving service, allegiance, vows, God, religion and even guests!  In addition, they do not possess enlightened intellect, noble qualities, penchant to listen Lord’s glory and spiritual discourses. They do not have company of the good and godly, pure conscience and therefore they do not attain Moksha due to false pride and ego. They are devoid of morality, natural justice, means to acquire merit, eligibility to attain heaven and discriminative faculty that distinguishes just and unjust actions.
They do not possess learning, wealth, luxury of clever dealings, art and the beautiful attribute of Saraswati, namely wonderful speech and oratory.
Moreover, there is no peace, forgiveness, ability to fulfil vows, kinship, discretion of auspicious and inauspiciousness and Sadhana  with them.
They do not possess purity, righteousness, ability to pursue ordained duties, good thoughts and neither worldly or heavenly joys. They are just happy-go-lucky whimsical persons that behave errands.
There is nothing like righteous conduct, worship, knowledge (of the Self), detachment, Yoga, courage etc if tried to find in them.
There is neither asceticism, renunciation, equality,, noble values or love and respect unto the Lord. He is not happy witnessing good qualities in others ; he doesn’t have joy of philanthropy ; his inner conscience doesn’t demonstrate even an iota of God’s Love.
While looking at such persons they appear like living corpses ; holy persons should avoid even talking to them.
Devotion unto the Lord is available only to those possessing immense merit. People get the fruit as per their action ; they reap whatever they sow !

                                  “Hari Om Tat Sat”


This page is powered by Blogger. Isn't yours?