Friday, January 28, 2022
अमृतानुभव - पुष्प बारावें
अमृतानुफव - पुष्प बारावें
पुष्प बारावें
ओंवी क्र. दहा
‘जेणें देवें संपूर्ण देवी / जियेवीण काही ना तोगोसावी / किंबहुना येकोपजीवी / येकयेकांची//१०//‘
(गोसावी = स्वामी) (येकोपजीवीं = एकमेकांसापेक्ष )
शिवाच्या सत्तेवरच शक्तीला पूर्णत्व येते. मात्रनवल असे की शक्तिमुळेच शिवालास्वामीपणाचा मोठेपणा प्राप्त झाला आहे !म्हणूनच शिवशक्ती एकमेकांच्या आधारानेएकत्र नांदतात.
‘ज्या शिवामुळे प्रकृतीला प्रकृतिपण आहे तसेचशिवाचे शिवपण देखील प्रकृतिमुळेच आहे.प्रकृतीचे नामोनिशाण नसते तर शिवालाशिवपण येणे शक्य नव्हते, जसे सूर्याचे तेजत्याचे सूर्यपण टिकवते ! दोघांचे अस्तित्वएकमेकां मुळेच आहे, एकाचा नाश झाला तरदुसऱ्याचा होणारच.
म्हणजेच हीं पुरूष-प्रकृती परस्पर सापेक्ष होत.गूळ आणि गोडीचे जे नातें तेच या दोघांतआहे.
असे पहा, गोडव्याचे वर्णन करायला आधीकडवटपण काय ते माहीत हवे, किंवा प्रकाशदाखवण्यासाठी आधी अंधार तर हवाच ना !शहाणपणासाठी आधी वेडाचे अधिष्ठान असलेपाहिजे की ! किंवा, वेड शोधू म्हटले तर त्यालाशहाणपणाचे अधिष्ठान नको काय ? (थोडावात्रटपणा ! )
म्हणूनच पुरूष म्हटला की तिथे प्रकृतीअसणारच, कारण तीं एकमेकांचे ‘उपजिव्य’होत.
ओंवी क्र. अकरा
‘कैसा मेळु आला गोडिये / दोघें न माती जगींइये / कीं परमाणुही माजी उवायें / मांडिलीआहाती //११॥’
(मेळु = संयोग ; माती = मावणे ; उवायें =आनंदाने )
‘या दोघांच्या परस्पर प्रेमाचे कसे वर्णन करावे !त्याच्या व्यापकतेला त्रैलोक्यही अपुरे पडेल,मात्र परमाणूतही तीं दोघे आनंदाने नांदतअसतात.’
या ठिकाणी वस्त्राची उपमा सार्थ ठरेल. वस्त्रकितीही लहान किंवा मोठे असले तरी त्यांतएकच एक धागा आढळेल, तसे आहे यांचेपरस्पर प्रेम !
स्वामी स्वरूपानंद म्हणतात -
ह्यांचिया प्रीतीचा, असा काही मेळ, नटोनीकेवळ, जगद् रूपें ।
अणुअणूमाजीं, जरी ओतप्रोत, तरी उर्वरीत,राहती च ॥
ओंवी क्र. बारा
‘जिहीं येकयेकावीण / न कीजे तृणाचेहीनिर्माण / जियें दोघें जिऊप्राण / जिया दोघां //१२//‘
‘एकमेकंचया मदती शिवाय ही दोघे गवताचीकाडीही निर्माण करू शकत नाहीत, तींएकेकांची जीवप्राण होत.’
स्वामी म्हणतात -
‘ज्ञानवृत्तिरूप, शिवशक्तिविण, न हो निर्माण,तृण ते ही ।
दोघे एकमेकां, होती जीवप्राण, स्व-रूपींअभिन्न, राहोनयां ॥’
ओंवी क्र. तेरा
‘घरवातें मोटकीं दोघें / जैं गोसावी सेजे रिघे /तैं दांपत्यपणे जागे / स्वामिनी जे //‘
घरादारांत मोजकी ही दोघेच आहेत आणि पतीजेव्हा झोपी जातो त्यावेळेस ती एकटी जागीअसते. - या वाक्याचा मतितार्थ असा कीअखिल ब्रह्मांड या दोघांनीच व्यापलेले आहे.मात्र पती शिव जेव्हा झोपलेला असतो, अर्थात्अक्रिय असतो, त्या वेळेस देवी प्रकृतीच सर्वऐहिक आणि पारमार्थिक विस्तार जागी राहूनसांभाळते आणि परस्पर दांपत्यभाव निभवावते!
श्री दासगणू असे वर्णन करतात -
ही पुरूष-प्रकृती निर्घारीं । दोघेंच दोघें नांदतीघरीं । वडील धाकुटें कोणी दुसरी । कांही नसेते ठायां ॥ कुणाच्या लाजेची । भीती नसे तेथसाची । गाठ प्रकृति-पुरूषाची । कोणत्याहीअवस्थेंत ॥ पुरूष येतां सेजेस । वरी प्रकृतीजागृतीस । पती होतां निद्रावश । पत्नी जागीचपाहिजे ॥ तरीच ती पतिव्रता ॥ नातरी अवघेंवृथा । हे जाणूनियां चित्ता । जागी राहे प्रकृती॥
शिवाचे येणें शेजेकारण । तेच त्याचें तिरोधान। म्हणून प्रकृतीचे जागेपण । येत आहेअविर्भावा ॥ एक जेव्हा झांकते । तेव्हांचि दुसरेउदयास येते । पहा बहुरूप्याच्या सोंगातें ।विचार करून मानसीं ।।
असो जगत् शब्दें जे भासत । तेच प्रकृतीचेजागृतरूप । हे आणुनि ध्यानांत । विचार याचाकरावा ॥ ‘
क्रमश