Monday, November 08, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक एकशे एक ते एकशे पाच

 



१०१).         “ओम् अनादिर् भूर्भुवो लक्ष्मी : सुवीरो रचिरान्गद :  ।
                   जननो जनजन्मादिर् भीमो भीमपराक्रम :           ॥१०१॥”

भगवान् श्री महाविष्णुने हे विश्व निर्माण केले असले तरी त्या स्वत:ला इतर कोणी निर्माण केले नाही, कारण तो स्वयंभू, अजन्मा आहे - अनादि आहे ! 
‘भूर्भुवो’ या शब्दातील ‘भू:’ म्हणजे पृथ्वीसह इतर सर्व खगोल - म्हणजे ग्रह, तारे, नक्षत्रें वगैरे तर ‘भुव :’ म्हणजे सर्व प्राणिमात्रांसह अखिल ब्रह्मांडाचा एकमेव आधार अर्थात् परमेश्वर ! सर्व ब्रह्मांड त्याचेच चैतन्यतेजामुळे समृध्द आहे म्हणून ‘भूर्भुवो लक्ष्मी :’ ! (आत्मविद्येला सुध्दा लक्ष्मी म्हटले आहे  . वेदज्ञानाने अखिल विश्व ओतप्रोत भरून टाकणारा हा ईश्वर लक्ष्मीवान् आहे ! ) तो अत्यंत पराक्रमी असल्याने त्याला ‘सुवीरो’ म्हटले.  कर्म-ज्ञानरूपी त्याचे बाहू विश्वकल्याणार्थ झटणारे म्हणून त्याला’रूचिरांगद :’ म्हटले आहे. 
विश्वनिर्मितीचे भीमकाय कार्य संपन्न करणारा नि  वारंवार  विश्व प्रसवणारा हा  ‘जननो जन्मादि,   भीमोभीमपराक्रमो आहे ! 

१०२).         “ओम् आधारनिलयो धाता पुष्पहास : प्रजागर :         ।
                 ऊर्ध्वग : सत्पथाचार : प्राणद : प्रणव : पण :       ॥१०२॥” 

पंचमहाभूतें आणि त्रिगुण अशा अष्टधा प्रकृतीने निर्मिलेल्या विश्वाचा श्रीमहाविष्णु आधार आणि निलय म्हणजे निवासस्थान आहे. 
त्याला ‘अधाता’ म्हटले कारण तो निर्गुण निराकार परब्रह्माचा अविष्कार असल्याने,        जे शाश्वत  नि सर्वव्यापक आहे, त्याला  इतर कुठल्या आधाराची गरज नाही. मात्र तोच अखिल ब्रह्मांडाला ‘धारण’ करतो म्हणून त्याला ‘धाता’ ही म्हटले आहे. 
विश्वनिर्मिती करत असताना त्याला विलक्षण आनंद होत राहिला नि ते पूर्ण झाल्यावर, विशेषकरून मानव-निर्मितीनंतर त्याचे मुखावर विलोभनीय स्मितहास्य पसरले, एखाद्या टवटवीत ताज्या सुंदर फुलाप्रमाणे, म्हणून त्याला ‘पुष्पहास :’ म्हटले ! ! 
आपणच निर्मिलेल्या प्रजेला आत्मसुख देऊन त्यांना मोक्ष दिलवण्यासाठी सदैव जागरूक असलेला हा ‘ऊर्ध्वग: प्रजागर:’ आहे. 
हा ‘प्राणद :’ तर आहेच आणि ओंकार हे त्याचे मूळ स्वरूप आहे नि तिकडेच परत आणणारा हा ‘पण:’ म्हणजे निश्चयी आहे ! 

१०३).       “ओम् प्रमाणं प्राणनिलय : प्राणभृत् प्राणजीवन :        ।
                तत्वं तत्वविदेकात्मा जन्ममृत्यु जरातिग :          ॥१०३॥” 

जगन्नियंता भगवन्त हा स्वत: च्या ‘असण्या’चे स्वत:च प्रमाण आहे, तर प्रत्येक जीवमात्रांत प्राणरूपाने  निवास करणारा तो प्राणनिलय : आहे ! 
सर्व विश्वांत आत्मरूपाने विनटलेला हा विश्वरूप विश्वाचा प्राण आहे. प्राणवायू, अन्न, पाणी इत्यादि जीवनावश्यक तातडीच्या बाबी पुरवणारा हा ‘प्राणभृतप्राणजीवन :’ आहे ! 
‘तत्व म्हणजेच तथ्य, अर्क किंवा सार, सत्य आणि अमृत ही तीनही नावें परब्रह्माला उद्देशून आहेत. श्रीमहाविष्णुला तीं साहाजिकच तंतोतंत लागू पडतात ! 
तो ‘तत्ववित्’ म्हणजे तत्व जाणणारा नि अनुभवणारा म्हणून ‘तत्वंतत्वविदेकात्मा’ तोच आहे ! तो जन्म मृत्यू जरा व्याधी या सर्वांपलीकडचा शाश्वत परमात्मा आहे ! ! 

१०४).       “ओम् भूर्भुव : स्वस्तरूस्तार : सविता प्रपितामह :         ।
                यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन :             ॥१०४॥” 

‘भू:’ म्हणजे पृथ्वी किंवा मृत्युलोक, ‘भुव :’ म्हणजे पाताळलोक आणि ‘स्व:’ म्हणजे स्वर्गलोक या तीनही लोकांना तारणहार भगवान् श्रीविष्णु होय. (भूर्भुव:स्तरूस्तार :) 
सर्व लोकांना उत्पन्न करणारा म्हणून ‘सविता’, तर प्रपिता  अर्थात पितामह ब्रह्मदेवालाही उत्पन्न करणारा, विश्वाचा ‘आजोबा’ आहे - बाप का बाप ! 
विश्वनिर्मिती हाच मुळांत एक धगधगता यज्ञ आहे आणि तो स्वत:च यज्ञही असल्याने भगवंताला ‘यज्ञो’ म्हटले ! यज्ञाचा सर्वाधिपती तसेच यज्ञ करणारा ‘यज्वा’ही तोच ! अर्थात ‘यज्ञांगो’ देखील तोच तो. शिवाय यज्ञाचे उचित कर्मफल देणारा ‘यज्ञवाहन:’ हे ओघाने आलेच की ! ! 

१०५).         “ओम् यज्ञभृद् यज्ञकृद् यज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधन :       ।
                  यज्ञान्त कृत् यज्ञ गुह्यम् अन्नाद् अन्नम् एव  च           ॥१०५॥” 

विश्वनिर्मिती हाच एक मोठा यज्ञ असल्याचे आपण पाहिले. मात्र हा यज्ञ अर्थात विश्वाला धारण करीत त्याला सुखसमृध्दीने परिपूर्ण करणारा   म्हणून श्रीमहाविष्णुला ‘यज्ञभृद्’ म्हटले आहे, तर यज्ञ करणारा यज्ञी म्हणून यज्ञकृत्. शिवाय त्या सर्व क्रियांचा आनंद भोगणारा तो ‘यज्ञभुग्’ सुध्दा तोच आहे ! यज्ञसाधन दुसरे कुठले असणार ? वास्तविक ‘यज्ञानां जपयज्ञोsस्मि’ असे आधीच सांगितल्यावर दुसऱ्या कोणत्याही साधनाची निदान कलियुगांत तरी गरजच काय, हा प्रश्न स्वत:ला विचारून पाहावा ! मुळात या प्रकारचा यज्ञ अगदी गुप्त ठेवतां येतो ! (गुह्यम्) 
‘यज्ञान्तकृत्’ म्हणजे यज्ञ करणारा नि त्याचा शेवटही करणारा. 
‘अन्नम् अन्नाद् एव च ‘ म्हणजे आहुती स्वीकारणारा नि अन्नरूपांत फल म्हणजेच पुन्हा अन्नदाता, असा हा दयाळू भगवंत आहे. 

(अतिशय गुप्तपणे, गाजावाजा न करता केलेला नामजप आणि भुकेल्यांना अन्नदान यां सारखा सर्वोत्तम यज्ञ दुसरा नसेल असे माझे प्रांजळ मत आहे

Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?