Thursday, October 17, 2024

 

करुणा - Compassion !

 करूणा’ - Compassion ! 

आज कधीपासून एक सुंदर भजन सतत मनात घोळतंय्, जे मी कधीतरी गात असे अतिशय तल्लीन होत ! होय, मी गातसुद्धा असे कित्येक भजनें माझे ऐन जवानींत ! जवानीत भजने ? ? थोडंसं ऑड वाटलं तरी तोही प्रमाद घडलाय माझ्याकडून ! तसं पाहिलं तर त्याच्याही कितीतरी आधी मला चक्क भीमसेन म्हणत माझी भावंडें. कसचं कसचं ! !जाऊ देत झालंअसो

करूणाहा शब्दच मुळात इतका अर्थपूर्ण, नव्हे भावपूर्ण आहे की तो एकदा का मनात रूंजी घालू लागला की विचारांची बुलेट ट्रेन सुसाट धावत सुटते विनाथांबा. अगदी तेच घडतेंय या क्षणीं

करूणासागर महाराज, स्वामी कारुण्यानंद, करूणाष्टकें नि  करूणा-त्रिपदी अशी कित्येक करूणा शब्दाशी निगडीत नावें, विशेषणे वगैरे खूप गर्दी करत आहेत मनांत. सबब, आज या विषयाचा फडशाच पाडीन म्हणतो


वास्तविक करूणा, दया, क्षमा वगैरे दैवी गुण प्रत्येकाचा स्थायी भाव असतो, अगदी प्रत्येकाचा. मात्र तो व्यक्त होण्यासाठी एखादा प्रसंग, अनुभव किंवा आठवण पुरेशी असते. ईश्वराकडे करूणेची भीक मागण्यात काहीच गैर नसल्याने तशी वेळ कुणावर आलीच तर मागेपुढे पाहण्याचे कारण नसावे. मनापासून याचना करावी आणि तो दयासागर कधीच हात आखडून घेत नाही आपला. तथापि त्या याचनेंत आर्तता हवी, निकड असावी आणि मनोमन पूर्ण शरणागती

आमची कित्येक भजनेदया करो, कृपा करो, आनंद दोअशी वारंवार विनंती करणारी असत. उगीच नाही एखाद्या त्यागराजावर, मीरेवर, चैतन्य महाप्रभूंवर तो कृपासागर प्रसन्न झाला. अगदी जीझस देखील अशाच करूणेची महती गात राहिला नि अनुयायांकडून करवीत राहिलाय्. Matthew said, ‘Ask and you will get it ; Seek, and you shall find it ; Knock, and the doors shall open for you’ ! 


आपल्याला देखील एखाद्या अगतिक माणसाबद्दल अचानक करूणा दाटून येते. का बरें ? कारण निदान त्या क्षणीं आपण त्याच्या दु:खाशी किंवा अडचणीशी समरस होऊन जातो नि अंत:करणात दडून असलेली दया नि करूणा उफाळून वर येते, चार धीराचे शब्द आपसूक मुखरित होतात नि जमेल तेवढी मदत करायला आपण उद्युक्त होतो. यांचे कारण आपणही मुळात तो करूणासागर असतो. (अहं ब्रह्मास्मि चा प्रत्यक्ष पुरावा ! )


काही तर्कट मंडळी या उत्स्फूर्त प्रतिक्रियेला सत्व-रज-तमादि त्रिगुणांशी जोडण्याचा प्रयत्न करतील पण अतिशय तमोगुणी किंवा रजोगुणी असलेला माणूसही कधीतरी दयार्द्र असू शकतो हे कोण नाकारतील ?


गाडी तर्कटपणाच्या नि विसंवादाच्या रूळांवर वळण्याआधी थांबणे श्रेयस्कर !

रहाळकर

१७ अक्तूबर २०२४.      


Monday, October 14, 2024

 

आठवणीतले गणेशोत्सव !

 आठवणीतले गणेशोत्सव

एकेकाळी इंदूरमघील गणेशोत्सव म्हणजे सांस्कृतिक, मनोरंजक आणि प्रबोधक अशी त्रिवेणी साधणारे महोत्सव असत. आमचा सिख मोहल्ला, नजीकचा लोधी मोहल्ला नि काछी मोहल्ला मिळून अदमासें अडीच-तीनशे मध्यमवर्गीय कुटुंबे तिथे वास्तव्य करून होतीं, उच्च आणि कनिष्ठ यांसह. तथापि श्रीमंतीचा माज किंवा निर्धनांची लाचारी कधीच कुणी दाखवीत नसे. तोडीस तोड असे रामबाग-नारायण बागेचे गणेशोत्सव असत. तसे पाहिले तर महू आणि उज्जैनचे गणेशोत्सव देखील पूर्ण दहा दिवस छानपैकी साजरे होत

तथापि सिखमोहल्ला सार्वजनिक गनेशोत्सव म्हणजे इंदौरच्या सांस्कृतिक वारशाचे जणू प्रतिबिंब असे, एक दिमाखदार सोहोळा- संपूर्ण दहा दिवस चालणारा. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील आणि महिलांचाही भरपूर सहभाग असलेले कार्यक्रम खरोखर वैशिष्ठ्यपूर्ण होत असत


त्या जमान्यात सिखमोहल्ला नि लोधीमोहल्ला मिळून ऐंशी पंच्यांशी टक्के मराठी भाषिक असले तरी काही गुजराती, पंजाबी, सिंधी नि मारवाडी कुटुंबेंही बोटांवर मोजता येतील इतपत होती आणि तीही या आनंदसोहोळ्यांत सहभाग घेत

गणेशोत्सवाचे दहाही दिवस विविध उपक्रमांनी गच्च भरलेले असत. लहानग्यांसाठी निरनिराळ्या स्पर्धा, खेळ आणि विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तर असतच, पण एखादा धनिक माणूस त्या मुलांना भरपूर उत्तेजनात्मक बक्षिसांची लयलूट करून टाकत असे

महिलांसाठी कित्येक स्पर्धा दुपारनंतर असत तर किमान दोन तरी नाटकें हौशी मंडळी सादर करीत दर वर्षी  नि त्यांचीप्रॅक्टिसदोन अडीच महिने आधीच सुरू होई. विशेष करून आठवतेय  ते फक्त महिलांनी मिळून सादर केलेले तीन अंकी प्रहसन आणि त्यांत भरगच्च मिशा असलेल्या आणि पागोटें परिधान केलेल्या पाटीलाची भूमिका वठवणाऱ्या वर्तक काकू ! त्यांनी तर स्टेजवर चक्क चिलीम ओढलेली स्पष्ट आठवतेय मला ! प्रत्येक अंक सुरू होण्याआधी गजकुंडीचा धमाका कानठळ्या बसवित असे !


मुलामुलींसाठीही चित्रकला स्पर्धा, सुंदर अक्षर स्पर्धा, चमचा-लिंबू रेस नि तीन पायांच्या धाव-स्पर्धा खूप धमाल उडवीत

तरूण नि वयस्कांसाठी वादविवाद नि सिम्पोझियम, भावगीत नि सिनेसंगीत स्पर्धा वगैरे तर हमखास ठरलेल्याच. कधी कधी प्रथितयश मंजळींची व्याख्याने सादर होत. ‘फिश-पॉंडहा अभिनव आणि मजेशीर कार्यक्रम कित्येकांचीगुपितेंउघड करण्यात यशस्वी ठरत असे


आत्तां विशेषकरून आठवत आहेत ते सिम्पोझियमचे काही विषय. एका वर्षीईश्वर आहे की नाही’, ‘संभवामि युगे युगे’, ‘भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये’, ‘मध्य-भारतातील मराठीचे स्थान नि भवितव्यअसे एकाहून एक सरस विषय दर वर्षीं आघीपासून जाहीर होत आणि त्यांत इंदूर शहरातील नि बाहेरच्याही दिग्गजांना पाचारण केले जात असे

मला आत्ता आठवत आहेत आमचे दादा (थोरल्या बहिणीचे यजमान), जे आधीईश्वर आहेही बाजू मांडणार होते पणईश्वर नाहीही बाजू मांडणारा एक वक्ता वेळेवर येऊ शकल्याने दादांनी अगदी वेळेवर चक्क दुसरी बाजू लढवली नि फड जिंकला होता


म्हटलं ना, सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे कित्येकांची हृदयें हरवणारा तर काहींचीजुळवणारादेखील ठरत असे ! साहाजिकच प्रत्येक थरातल्या मंडळींना दर वर्षी तो कधी येतो अशी तळमळ असे ! !

रहाळकर

१४ अक्टूबर २०२४.     


This page is powered by Blogger. Isn't yours?